Indian passengers stranded In Turkey : गेल्या 40 तासांपासून तुर्की विमानतळावर 250 हून अधिक भारतीय प्रवासी अडकले! कारण ऐकून धक्का बसण्याची वेळ
अडकलेल्या प्रवाशांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर त्यांच्या समस्या मांडल्या आहेत. विमानतळावर थांबलेल्या अडीचशेहून अधिक प्रवाशांसाठी एकच स्वच्छतागृह असल्याची अनेकांनी तक्रार केली.

Indian passengers stranded In Turkey : लंडन-मुंबई व्हर्जिन अटलांटिक विमानातील 250 हून अधिक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातील बहुतांश भारतीय आहेत. ते तुर्कीतील दियारबाकीर विमानतळावर 40 तासांपेक्षा जास्त काळ अडकून पडले आहेत. या प्रकरणावर, एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले की, 2 एप्रिल रोजी लंडनहून मुंबईला जाणारे फ्लाइट VS358 वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे दियारबाकीर विमानतळावर उतरवण्यात आले. मात्र, लँडिंग केल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. व्हर्जिन अटलांटिकच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमचे ग्राहक आणि क्रू यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही शुक्रवार 4 एप्रिल रोजी स्थानिक वेळेनुसार 12:00 वाजता दियारबाकीर विमानतळावरून मुंबईसाठी प्रस्थान करू
पर्यायी विमानाने मुंबईला जाण्याच्या योजनेवर काम करत आहोत
एअरलाइनने सांगितले की, "मंजुरी न मिळाल्यास, आम्ही आमच्या ग्राहकांना उद्या तुर्कीतील दुसऱ्या विमानतळावर पर्यायी विमानाने मुंबईला जाण्याच्या योजनेवर काम करत आहोत. व्हर्जिन अटलांटिकने सांगितले की, "दरम्यान, प्रवाशांना तुर्कीमध्ये रात्रभर हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय केली जात आहे. आम्ही समस्येचे निराकरण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत. नवीन अपडेट्स उपलब्ध होताच आम्ही सर्व ग्राहकांना कळवू.
My family along with 250+ passengers have been inhumanely treated by @virginatlantic .
— Hanuman Dass (@HanumanDassGD) April 3, 2025
Why is this chaos not being covered in the @BBCWorld or global media?? Over 30 hours confined at a military airport in Turkey.
In contact with the @ukinturkiye to please more pressure needed pic.twitter.com/TIIHgE07bb
कुटुंबीयांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले
अडकलेल्या प्रवाशांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर त्यांच्या समस्या मांडल्या आहेत. विमानतळावर थांबलेल्या अडीचशेहून अधिक प्रवाशांसाठी एकच स्वच्छतागृह असल्याची अनेकांनी तक्रार केली. एका प्रवाशाने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, प्रवाशांना थंडीपासून वाचवण्यासाठी ब्लँकेट दिले गेले नाहीत.
भारतीय दूतावास आणि विमान कंपनीची प्रतिक्रिया
तुर्कस्तानमधील भारतीय दूतावासाने भूमिका घेतली आहे आणि एअरलाइन, दियारबाकीर विमानतळ संचालक आणि तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. दूतावासाने या प्रकरणावर एक निवेदन जारी केले की प्रवाशांची योग्य काळजी घेतली जात आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आणि मुंबईला जाण्यासाठी पर्यायी विमान व्यवस्था करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत.























