एक्स्प्लोर

Israel-Hamas War : इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 2100 लोकांनी गमावला जीव, अडकलेल्या भारतीयांसाठी ऑपरेशन अजय सुरू!

Israel Palestine War : 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारताकडून आजपासून ऑपरेशन अजय सुरू करण्यात आले आहे.

Israel Palestine War Operation Ajay : इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात युद्ध सुरूच आहे. दोन्ही बाजूंनी आतापर्यंत तब्बल 2100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्त आहे. अनेक भारतीयही इस्रायलमध्ये अडकले आहेत. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, इस्रायलचे महावाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी सांगितले की, इस्रायलमध्ये 20 हजारांहून अधिक भारतीय आहेत. तर, इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारताकडून आजपासून ऑपरेशन अजय सुरू करण्यात आले आहे.

 

इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच गोळीबार 
कोबी शोशानी यांनी सांगितले की, शनिवारी हमासने हल्ला केला तेव्हा इस्रायलमध्ये आयोजित कार्यक्रमात अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. नुकतीच अभिनेत्री नुसरत भरुचा भारतात सुखरूप परतली आहे. या हल्ल्याची सुरूवात शनिवारी झाली, जेव्हा हमासचे अतिरेकी इस्रायलमध्ये घुसले आणि लोकांना लक्ष्य करू लागले. यामुळे, अनेक दशकांत प्रथमच इस्रायल देशात मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. दोन्ही बाजूंनी 2100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 

भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, सध्याची परिस्थिती पाहता भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी करण्यात आला आहे. आपत्कालीन क्रमांक 1800118797, +91-11 23012113, +91-11-23014104, +91-11-23017905 आणि +919968291988 आहेत. तसेच ईमेल : Situnationroom@mea.gov.in असा आहे.  इस्रायलमधील भारतीय दूतावासाचे आपत्कालीन क्रमांक +972-35226748 आणि +972- 543278392 आहेत.


परराष्ट्रमंत्र्यांकडून ऑपरेशनची घोषणा

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “इस्रायलमधून भारतात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी ऑपरेशन अजय सुरू करण्यात येत आहे. विशेष चार्टर विमाने आणि इतर व्यवस्था करण्यात येत आहे. परदेशात राहणाऱ्या आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत.'' एस. जयशंकर यांच्या पोस्टवर इस्रायलमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, ज्या भारतीय नागरिकांनी स्वतःची नोंदणी केली आहे त्यांना स्पेशल फ्लाइटसाठी मेल पाठवण्यात आला आहे. त्यानंतरच्या फ्लाइटसाठी इतर नोंदणीकर्त्यांना संदेश पाठवला जाईल.


सामान्य लोकांना केले लक्ष्य 

7 ऑक्टोबर रोजी सकाळी हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. या काळात हमासनेही घुसखोरी केली होती आणि सामान्य लोकांना लक्ष्य केले होते. यानंतर इस्रायलने हमासला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. एकीकडे इस्रायलकडून गाझावर सातत्याने हल्ले होत आहेत. दुसरीकडे हमासही इस्रायलच्या दिशेने रॉकेट डागत आहे.

 

भारताने याआधीही अशी मोहीम सुरू केली होती
युद्धक्षेत्रात अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी सरकारने ऑपरेशन सुरू करण्याची ही पहिलीच वेळ नाही. भारताने यापूर्वी आपल्या नागरिकांना युद्ध क्षेत्र, साथीचे रोग आणि नैसर्गिक आपत्तींमधून बाहेर काढले आहे. यापूर्वी भारताने युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन गंगा' सुरू केले होते. रशियन युद्धादरम्यान युक्रेनमध्ये सुमारे 20,000 भारतीय अडकले होते, ज्यांना ऑपरेशन गंगा अंतर्गत बाहेर काढण्यात आले.

 

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
Bangladesh Violence : बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, घर पेटवण्याचा प्रयत्न; हल्ल्यामागे शेख हसिनांचे दिल्ली कनेक्शन
बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, घर पेटवण्याचा प्रयत्न; हल्ल्यामागे शेख हसिनांचे दिल्ली कनेक्शन
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget