Imran Khan: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Imran Khan: गेल्या मंगळवारी मोठ्या संख्येने पीटीआय कार्यकर्ते इम्रान खान यांना भेटण्यासाठी गेले होते, परंतु तुरुंग प्रशासनाने कोणालाही त्यांना भेटू दिले नाही. यामुळे जनतेची चिंता आणखी वाढली.

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे पुत्र कासिम खान यांनी त्यांचे तुरुंगात असलेले वडील जिवंत आहेत याचा पुरावा मागितला आहे. त्यांनी म्हटले की इम्रान जिवंत आहेत की नाही हे कोणालाही माहिती नाही. कासिमने ट्विट करत लिहिलं की, त्यांच्या वडिलांना 845 दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. गेल्या सहा आठवड्यांपासून त्यांना "डेथ सेल" मध्ये एकट्याला ठेवण्यात आले आहे. कोणालाही त्यांची भेट घेण्याची परवानगी नाही, किंवा त्यांना कोणताही फोन कॉल किंवा संदेश आलेला नाही. कासिम म्हणाला की त्यांच्या बहिणींना सुद्धा भावाला भेटण्याची परवानगी नाही. हे कोणत्याही सुरक्षेच्या कारणास्तव नाही तर जाणूनबुजून केलेले कृत्य आहे. सरकार त्यांच्या वडिलांची खरी स्थिती लपवत आहे. दरम्यान, इम्रान खान यांना पाठिंबा देण्यासाठी रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात गेलेले खैबर-पख्तूनख्वा (केपी) चे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांना गुरुवारी पोलिसांनी मारहाण करून रस्त्यावर लोळवल्याची घटना घडली.
लष्कराच्या आदेशावर हल्ला झाला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांच्यावरील हल्ला लष्कराच्या आदेशावरून करण्यात आला. जेव्हा आफ्रिदी तुरुंगात पोहोचले तेव्हा कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती आणि पीटीआय समर्थकांची गर्दी सातत्याने वाढत होती. ते आल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली. पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांना पुढे जाण्यापासून रोखले. यावेळी पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांना जमिनीवर पाडले. पीटीआयने या घटनेचे वर्णन लोकशाही अधिकारांवर हल्ला असल्याचे म्हटले आहे.
तर रस्त्यावर उतरण्यास भाग पाडलं जाईल
सुहेल आफ्रिदी म्हणाले की, सरकारने इम्रान खान यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली पाहिजेत. जर असे केले नाही तर त्यांना जनतेसोबत रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले जाईल. आफ्रिदी यांनी आरोप केला की सरकार इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल अचूक माहिती देत नाही. त्यांनी इशारा दिला की जर इम्रान खान यांना काही झाले तर त्याचे परिणाम सध्याचे सरकारच जबाबदार असेल. त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर टीका करताना म्हटले की ते देशातील बिघडलेल्या परिस्थितीसाठी जबाबदार आहेत. आफ्रिदी म्हणाले की इम्रान खान यांच्यापर्यंत पोहोचण्यास प्रतिबंध करणे आणि त्यांच्या आरोग्याबद्दलची माहिती लपवणे हे जनतेच्या विश्वासाला धोका आहे.
🚨Chief Minister of Khyber Pakhtunkhwa, Suhail Afridi, was severely beaten by the 🇵🇰 military regime's militias.
— Afghanistan Defense (@AFGDefense) November 27, 2025
Pashtuns: It's time to seriously think about their dignity, honor, & the future of their next generation.
The time has come to stand up against the military regime. pic.twitter.com/8fPcBPEMTD
इम्रान खान यांच्या बहिणी काय म्हणाल्या
इम्रान खान यांच्या बहिणी नोरीन नियाझी यांनी माध्यमांना सांगितले की, पक्षाच्या नेत्यांनी तुरुंगात भेटींचे नियोजन केले होते, परंतु त्यांना आत जाऊ दिले गेले नाही. तुरुंग प्रशासन पूर्णपणे शांत असल्याने कुटुंबाला इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती नाही. त्यांनी असेही म्हटले की, भारतात इम्रान खान यांची हत्या झाल्याची बातमी पसरली, ज्यामुळे कुटुंब आणखी घाबरले. पोलिसांना कुटुंबाला रोखण्याचे आणि त्यांच्याशी वाटेल तसे वागण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असा नोरीन नियाझी यांचा आरोप आहे. त्या म्हणाल्या की, महिला, मुले आणि वृद्धांविरुद्ध अशी क्रूरता पाकिस्तानात यापूर्वी कधीही पाहिली गेली नव्हती. परिणामांची भीती न बाळगता लोकांना विनाकारण मारहाण केली जात आहे.
इम्रान खान तुरुंगात, बाहेर मृत्यूच्या अफवा
सोशल मीडियावर इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा तीव्र झाल्या आहेत. ऑगस्ट 2023 पासून इम्रान रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात कैद आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला आहे की त्यांची तब्येत ठीक नाही. गेल्या तीन आठवड्यांपासून, इम्रानच्या बहिणी त्याला भेटण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तुरुंग प्रशासन त्यांना परवानगी देत नाही. यामुळे इम्रान यांच्या आजारी प्रकृतीबद्दल अटकळ बांधली जात आहे. तणाव वाढल्यानंतर, तुरुंग प्रशासनाने म्हटले आहे की इम्रान खान पूर्णपणे निरोगी आहेत. इम्रान यांचा पक्ष, पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) ने देखील इम्रानच्या प्रकृतीबद्दलच्या अलिकडच्या अफवांबद्दल सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाची बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे.
तर आम्ही सहन करणार नाही
पीटीआयने आरोप केला आहे की इम्रान खान यांच्या मृत्यूच्या बातम्या परदेशी सोशल मीडिया अकाउंट्सवरून पसरवल्या जात आहेत, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होते. पक्षाने कडक इशारा दिला आहे की इम्रान खान यांच्या सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी आणि संवैधानिक अधिकारांसाठी सरकार थेट जबाबदार आहे. जर काही अनुचित घडले तर ते सहन केले जाणार नाही. पीटीआयने अफवा पसरवणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
इम्रान खान यांच्याबद्दल अफवा कशी सुरू झाली?
अदियाला तुरुंगात दर मंगळवारी कैद्यांना भेटण्याची परवानगी आहे. इम्रान खान यांचे कुटुंब आणि पीटीआय नेते म्हणतात की त्यांना गेल्या अनेक आठवड्यांपासून खान यांना भेटण्याची परवानगी नाही. गेल्या मंगळवारी मोठ्या संख्येने पीटीआय कार्यकर्ते इम्रान खान यांना भेटण्यासाठी गेले होते, परंतु तुरुंग प्रशासनाने कोणालाही त्यांना भेटू दिले नाही. यामुळे जनतेची चिंता आणखी वाढली.
इतर महत्वाच्या बातम्या























