एक्स्प्लोर

Internet Apocalypse : पृथ्वीवर धडकणाऱ्या सौर वादळामुळे इंटरनेट बंद पडणार? काय सांगतो अहवाल

Solar Superstorm : आतापर्यंत पृथ्वीवरील सर्वात मोठी सौर वादळं ही  1859 ते 1921 या काळात आली आहेत. त्यावेळी संदेशवहनाची प्रगती झाली नव्हती आणि इंटरनेट तर नव्हतेच. 

Internet Apocalypse : येत्या काळात पूर्वानुमान करता न येऊ शकणाऱ्या सौर वादळामुळे पृथ्वीवरील इंटरनेटची सेवा ही काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत बंद पडण्याची शक्यता आहे. सौर वादळं ही शक्यतो 100 वर्षातून एकदाच येतात पण त्यामुळे पृथ्वीवरील इंटरनेटसंबंधी पायाभूत सुविधा उखडून टाकल्या जातील, त्या बंद पडतील असं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. 

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या असिस्टंट प्रोफेसर संगिता ज्योती यांनी हा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल SIGCOMM (Association for Computing Machinery's Special Interest Group on Data Communications) 2021 मध्ये सादर करण्यात आला आहे असं लाईव्ह सायन्सने सांगितलं आहे. हा अहवाल अद्याप कोणत्याही जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला नाही, 

संगिता ज्योती यांनी केलेल्या संशोधनानुसार, येत्या काळात पृथ्वीवर येणाऱ्या सौर वादळामुळे इंटरनेट व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. जगातले इंटरनेट अनेक दिवस किंवा अनेक महिने बंद पडू शकते. आणि महत्वाचं म्हणजे या सौरवादळाचे पूर्वानुमान लावता येणं कठीण आहे. हे सौरवादळ पृथ्वीवर धडकणार याचे पूर्वानुमान केवळ एखादा दिवस आधीच लावता येणं शक्य आहे असंही या अहवालात सांगितलं आहे. 

जगभरात इंटरनेटचं जाळं पसरवण्यासाठी समुद्रातून केबल टाकण्यात आल्या आहेत. जर 19 व्या शतकात ज्या क्षमतेचे सौर वादळ आलं होतं त्याच क्षमतेचे सौर वादळ आता आलं तर या केबल्स निकामी होऊ शकतात. सध्या इंटरनेट संबंधी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी वापरण्यात आलेले सर्व साधने ही तितक्या क्षमतेची नाहीत. त्यामुळे या सौरवादळात इंटरनेट संबंधी सर्व साधने निकामी होऊ शकतात असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. 

काय आहे सौर वादळ? 
सौर वादळ हे सूर्यावरील चुंबकीय क्षेत्रातील अनियमिततेमुळे तयार होणारे वादळ आहे. सूर्यावर दिसणारे डाग कालांतराने मोठे होतात. सूर्याचं चुंबकीय क्षेत्र जेव्हा जास्त बलवान असतं तेव्हा सौर डागांची संख्या वाढते, मोठे झालेल्या डागाच्या ठिकाणी विस्फोट होऊन सौरवादळांची निर्मिती होते.

सौर वादळाचा मानवी शरीरावर प्रत्यक्ष परिणाम आढळत नसला तरी पृथ्वीवरील संदेशवहन यंत्रणा व वीजपुरवठा पूर्णपणे निकामी करण्याची ताकद सौरवादळांमध्ये असते. सौर वादळे सूर्याच्या पृष्ठभागावर निर्माण झाल्यानंतर त्याच्या लहरी बाहेर फेकल्या जातात. या लहरींच्या प्रसारणाच्या मार्गात पृथ्वी आल्यावर त्याचे परिणाम पृथ्वीवर होतात. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त व परिणामी सुर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त असे ढोबळमानाने म्हणता येईल. यांना विश्वकिरण असेही म्हणतात 

महत्त्वाच्या बातम्या

Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Embed widget