एक्स्प्लोर

COP 26 : जंगलतोड संपवण्यासाठीच्या करारवर हस्ताक्षर करण्यास भारताचा नकार

Climate Change : जगातील समृद्ध जंगलाचे जतन करण्यासाठी ग्लासगो येथील परिषदेत एक करार करण्यात आला. या करारामध्ये ब्राझिल, चीन, पाकिस्तान, नेपाळसारख्या शेजारी देशांसह शंभरहून अधिक देश सहभागी झाले

COP 26 : जंगलतोड संपुष्टात आणण्यासाठी करण्यात आलेल्या करारावर भारताने हस्ताक्षर न करता माघार घेतली आहे. ग्लासगो येथे  सुरु असलेल्या COP 26 या हवामान बदलासंबंधीच्या परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. ज्यामध्ये 2030 सालापर्यंत जंगलतोड संपवण्यासाठी शंभरहून अधिक देशांनी करार केला.  मात्र, भारतानं ह्या करारावर हस्ताक्षर केले नाहीत. 

जगातील समृद्ध जंगलाची निगराणी आणि त्यांचे जतन करण्यासाठी ग्लासगो येथील परिषदेत एक करार करण्यात आला. या करारत ब्राझिल, चीन, पाकिस्तान, नेपाळसारख्या शेजारी देशांसह शंभरहून अधिक देश सहभागी झाले . मात्र, भारतानं या करारावर हस्ताक्षर केले नाहीत.  कारण भारताला व्यापाराशी अंतिम मजकूरात जोडलेल्या संबंधांबद्दल काही चिंता होत्या आणि म्हणून भारतानं ह्या करारावर हस्ताक्षर केले नसल्याचं सांगितलं जातंय. 

जंगले कार्बन शोषून घेतात आणि त्यामुळे वाढत्या कार्बन उत्सर्जनापासून पृथ्वी वाचवायची तर आधी वने राखायला हवीतय. ग्लासगो येथे झालेल्या करारात जंगलाचे संरक्षण करणे, मातीची होत असलेली धूप थांबवण्यासाठी महत्त्वाच्या निर्णयावर सहमती झाली आहे. सोबतच ब्रिटन आणि 11 देश मिळून या करिता 2021-25 पर्यंत 12 अब्ज डॉलर्सपर्यंतचे आर्थिक सहाय्य विकसनशील देशांना देणार आहेत.  ज्यामध्ये जंगलांना लागणाऱ्या वणव्यांना हाताळणे, जंगलांचा ऱ्हास थांबून संवर्धन, जंगलातील जैववैविध्य टिकवणे आदी गोष्टींसाठी विकसनशील देशांना मदत होणार आहे.

Climate Change : COP 26 म्हणजे काय आणि जगाच्या भविष्यासाठी ती का महत्त्वाची आहे?

 दरम्यान, या अगोदरदेखील 2014 साली यासंबंधीचा करार झाला होता. ज्यात 2020 सालापर्यंत जंगलतोड अर्ध्यावर आणणे आणि 2030 सालापर्यंत ती संपवणे असे त्यावेळेस करारात म्हटले होते. मात्र, अनेक देशांकडून याची अंमलबजावणी झाली नव्हती. अशात, पुन्हा एकदा 10 वर्षाचा वेळ या करारासाठी दिल्यानं अनेक पर्यावरणवाद्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

COP 26 : पर्यावरणाच्या हानीसाठी विकसित देश जबाबदार, त्यांनी भारताला नुकसान भरपाई द्यावी; भारताची भूमिका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
Embed widget