एक्स्प्लोर

Jallianwala Bagh massacre : हा आमच्या साम्राज्यावर लागलेला डाग! जालियनवाला बाग हत्याकांडावर सरकारने भारताची माफी मागावी; ब्रिटीश खासदाराची संसदेत मागणी

जालियनवाला बाग हत्याकांडासाठी आजपर्यंत एकाही ब्रिटिश पंतप्रधानाने माफी मागितलेली नाही. मात्र, याबाबत अनेक ब्रिटिश नेत्यांनी वेळोवेळी खंत व्यक्त केली असली तरी अधिकृत माफी मागितलेली नाही.

Jallianwala Bagh massacre : ब्रिटनमधील विरोधी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी ब्रिटिश सरकारने 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडासाठी औपचारिकपणे भारतातील जनतेची माफी मागावी असे सांगितले आहे. त्यांनी गुरुवारी संसदेत सांगितले की, ब्रिटिश सरकारने 13 एप्रिलपूर्वी माफी मागावी. पुढील महिन्यात जालियनवाला बाग हत्याकांडाचा 106 वा स्मृतीदिन आहे. ब्रिटनचे खासदार ब्लॅकमन यांनीही त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ब्रिटिश साम्राज्याला लागलेला डाग

ब्लॅकमन आपल्या भाषणात म्हणाले की, बैसाखीच्या दिवशी अनेक लोक शांततेने आपल्या कुटुंबियांसह जालियनवाला बागेत सामील झाले होते. जनरल डायरने ब्रिटीश सैन्याच्या वतीने आपले सैनिक पाठवले आणि निष्पाप लोकांच्या गोळ्या संपेपर्यंत त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. खासदार ब्लॅकमन म्हणाले की, जालियनवाला हत्याकांड हा ब्रिटिश साम्राज्याला लागलेला डाग आहे. यामध्ये 1500 लोकांचा मृत्यू झाला तर 1200 लोक जखमी झाले. सरतेशेवटी, ब्रिटिश साम्राज्यावरील या डागामुळे जनरल डायर कुप्रसिद्ध झाला.

ब्रिटनच्या एकाही पंतप्रधानाने अद्याप माफी मागितलेली नाही

जालियनवाला बाग हत्याकांडासाठी आजपर्यंत एकाही ब्रिटिश पंतप्रधानाने माफी मागितलेली नाही. मात्र, याबाबत अनेक ब्रिटिश नेत्यांनी वेळोवेळी खंत व्यक्त केली असली तरी अधिकृत माफी मागितलेली नाही. 2013 साली तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी 2013 मध्ये जालियनवाला बाग स्मारकाला भेट दिली होती. त्यांनी या हत्याकांडाला लज्जास्पद घटना म्हटले होते पण माफी मागितली नाही. यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी 10 एप्रिल 2019 रोजी या हत्याकांडाच्या 100 व्या स्मृतीदिनापूर्वी एक दिव आधी विधान केले. थेरेसा मे यांनी जालियनवाला बाग हत्याकांड हे ब्रिटीश-भारतीय इतिहासावरील सर्वात लज्जास्पद डाग असल्याचे वर्णन केले. त्यांनी खेदही व्यक्त केला, पण माफी मागितली नाही. 1997 मध्ये भारत दौऱ्यावर असताना ब्रिटीश राणी एलिझाबेथ यांनी हे दुःखद प्रकरण म्हटले होते.

खेद, पण ब्रिटिश नेते माफी का मागत नाहीत?

जालियनवाला बाग हत्याकांडासाठी ब्रिटिश सरकारने अधिकृतपणे माफी मागितल्यास अनेक कायदेशीर आणि आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. माफी मागितल्यास, पीडितांच्या कुटुंबीयांकडून नुकसान भरपाईची मागणी मजबूत होऊ शकते. ब्रिटनला असा आर्थिक भार टाळायचा आहे, कारण वसाहतवादी इतिहासात अशा अनेक घटना आहेत ज्यासाठी माफी मागितली जाऊ शकते.

रौलेट कायद्याचा निषेध करण्यासाठी लोक जालियनवाला बागेत आले

ब्रिटीश सरकारने भारतातील क्रांतिकारी कारवायांना आळा घालण्यासाठी रौलेट कायदा आणला होता. त्यात कोणत्याही खटल्याशिवाय नजरकैदेत ठेवणे आणि गुप्तपणे खटला चालवणे अशा तरतुदी होत्या. याबाबत भारतीय जनतेमध्ये संताप व्यक्त होत होता. याविरोधात जालियनवाला बागेत लोक जमले होते. या सभेत महिला, लहान मुले, वयोवृद्धही सहभागी झाले होते. ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायरने आपल्या सैन्याला कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार करण्याचे आदेश दिले. या सैन्यात गोरखा आणि बलुच रेजिमेंटमधील सैनिकांचा समावेश होता, जे ब्रिटिश भारतीय सैन्याचा भाग होते.

ब्रिटिश सरकारच्या म्हणण्यानुसार या हत्याकांडात 379 लोक मारले गेले. मात्र, मृतांचा आकडा 1000 हून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. जालियनवाला बागेतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता. रस्ता अरुंद असल्याने लोक बाहेर पडू शकत नव्हते. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली, जिथे त्यांचे मृतदेह नंतर सापडले. हे करण्यामागे डायरचा उद्देश निशस्त्र लोकांमध्ये दहशत पसरवणे हा होता, जेणेकरून स्वातंत्र्याची मागणी दाबली जाऊ शकते. या हत्याकांडाने भारतभर संतापाची लाट उसळली. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांचा 'नाईटहूड' सोडला आणि महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली. 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget