एक्स्प्लोर

Jallianwala Bagh massacre : हा आमच्या साम्राज्यावर लागलेला डाग! जालियनवाला बाग हत्याकांडावर सरकारने भारताची माफी मागावी; ब्रिटीश खासदाराची संसदेत मागणी

जालियनवाला बाग हत्याकांडासाठी आजपर्यंत एकाही ब्रिटिश पंतप्रधानाने माफी मागितलेली नाही. मात्र, याबाबत अनेक ब्रिटिश नेत्यांनी वेळोवेळी खंत व्यक्त केली असली तरी अधिकृत माफी मागितलेली नाही.

Jallianwala Bagh massacre : ब्रिटनमधील विरोधी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी ब्रिटिश सरकारने 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडासाठी औपचारिकपणे भारतातील जनतेची माफी मागावी असे सांगितले आहे. त्यांनी गुरुवारी संसदेत सांगितले की, ब्रिटिश सरकारने 13 एप्रिलपूर्वी माफी मागावी. पुढील महिन्यात जालियनवाला बाग हत्याकांडाचा 106 वा स्मृतीदिन आहे. ब्रिटनचे खासदार ब्लॅकमन यांनीही त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ब्रिटिश साम्राज्याला लागलेला डाग

ब्लॅकमन आपल्या भाषणात म्हणाले की, बैसाखीच्या दिवशी अनेक लोक शांततेने आपल्या कुटुंबियांसह जालियनवाला बागेत सामील झाले होते. जनरल डायरने ब्रिटीश सैन्याच्या वतीने आपले सैनिक पाठवले आणि निष्पाप लोकांच्या गोळ्या संपेपर्यंत त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. खासदार ब्लॅकमन म्हणाले की, जालियनवाला हत्याकांड हा ब्रिटिश साम्राज्याला लागलेला डाग आहे. यामध्ये 1500 लोकांचा मृत्यू झाला तर 1200 लोक जखमी झाले. सरतेशेवटी, ब्रिटिश साम्राज्यावरील या डागामुळे जनरल डायर कुप्रसिद्ध झाला.

ब्रिटनच्या एकाही पंतप्रधानाने अद्याप माफी मागितलेली नाही

जालियनवाला बाग हत्याकांडासाठी आजपर्यंत एकाही ब्रिटिश पंतप्रधानाने माफी मागितलेली नाही. मात्र, याबाबत अनेक ब्रिटिश नेत्यांनी वेळोवेळी खंत व्यक्त केली असली तरी अधिकृत माफी मागितलेली नाही. 2013 साली तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी 2013 मध्ये जालियनवाला बाग स्मारकाला भेट दिली होती. त्यांनी या हत्याकांडाला लज्जास्पद घटना म्हटले होते पण माफी मागितली नाही. यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी 10 एप्रिल 2019 रोजी या हत्याकांडाच्या 100 व्या स्मृतीदिनापूर्वी एक दिव आधी विधान केले. थेरेसा मे यांनी जालियनवाला बाग हत्याकांड हे ब्रिटीश-भारतीय इतिहासावरील सर्वात लज्जास्पद डाग असल्याचे वर्णन केले. त्यांनी खेदही व्यक्त केला, पण माफी मागितली नाही. 1997 मध्ये भारत दौऱ्यावर असताना ब्रिटीश राणी एलिझाबेथ यांनी हे दुःखद प्रकरण म्हटले होते.

खेद, पण ब्रिटिश नेते माफी का मागत नाहीत?

जालियनवाला बाग हत्याकांडासाठी ब्रिटिश सरकारने अधिकृतपणे माफी मागितल्यास अनेक कायदेशीर आणि आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. माफी मागितल्यास, पीडितांच्या कुटुंबीयांकडून नुकसान भरपाईची मागणी मजबूत होऊ शकते. ब्रिटनला असा आर्थिक भार टाळायचा आहे, कारण वसाहतवादी इतिहासात अशा अनेक घटना आहेत ज्यासाठी माफी मागितली जाऊ शकते.

रौलेट कायद्याचा निषेध करण्यासाठी लोक जालियनवाला बागेत आले

ब्रिटीश सरकारने भारतातील क्रांतिकारी कारवायांना आळा घालण्यासाठी रौलेट कायदा आणला होता. त्यात कोणत्याही खटल्याशिवाय नजरकैदेत ठेवणे आणि गुप्तपणे खटला चालवणे अशा तरतुदी होत्या. याबाबत भारतीय जनतेमध्ये संताप व्यक्त होत होता. याविरोधात जालियनवाला बागेत लोक जमले होते. या सभेत महिला, लहान मुले, वयोवृद्धही सहभागी झाले होते. ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायरने आपल्या सैन्याला कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार करण्याचे आदेश दिले. या सैन्यात गोरखा आणि बलुच रेजिमेंटमधील सैनिकांचा समावेश होता, जे ब्रिटिश भारतीय सैन्याचा भाग होते.

ब्रिटिश सरकारच्या म्हणण्यानुसार या हत्याकांडात 379 लोक मारले गेले. मात्र, मृतांचा आकडा 1000 हून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. जालियनवाला बागेतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता. रस्ता अरुंद असल्याने लोक बाहेर पडू शकत नव्हते. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली, जिथे त्यांचे मृतदेह नंतर सापडले. हे करण्यामागे डायरचा उद्देश निशस्त्र लोकांमध्ये दहशत पसरवणे हा होता, जेणेकरून स्वातंत्र्याची मागणी दाबली जाऊ शकते. या हत्याकांडाने भारतभर संतापाची लाट उसळली. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांचा 'नाईटहूड' सोडला आणि महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली. 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget