एक्स्प्लोर

Bangladesh : बांग्लादेशात उलथापालथ; आंदोलन, हिंसाचार, शेख हसीनांचा राजीनामा... पाच मोठे मुद्दे

Bangladesh Violence : आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंसाचार सुरू झाल्यानंतर शेख हसीना यांनी आता राजीनामा दिला असून सत्ता लष्कराच्या हाती जाणार आहे.

Sheikh Hasina Resigns : बांग्लादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं असून त्याची परिणती आता हिंसाचारामध्ये (Bangladesh Violence) झाली आहे. या आंदोलनात आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि देश सोडला आहे. त्यामुळे बांग्लादेशी लष्कर आता देशात अंतरिम सरकार स्थापन करणार आहे. 

बांग्लादेश हे भारताचे मित्रराष्ट्र असून शेख हसीना यांचे सरकार भारतधार्जिने असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. 

बांग्लादेशमधील उलथापालथीमागे असलेले पाच महत्त्वाचे मुद्दे, 

1. बांगलादेशमधील अस्थिरतेचे नेमके कारण काय? 

शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन चालू आहे. 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये 30 टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना 5 टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते.

2. आंदोलनामुळे हिंसाचार सुरू

आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी शेख हसीना यांचा राजीनामा मागितला. बांग्लादेशातील आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला आणि त्यामध्ये 300 आंदोलकांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले. त्यानंतर ढाक्यातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. पोलिसांकडून देशात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली.

3. शेख हसीना यांचा राजीनामा

शेख हसीना या 2009 पासून बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. बांग्लादेशातील हिंसाचाराने उग्र रूप धारण केल्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी देश सोडला. 

4. लष्कर अंतरिम सरकार स्थापन करणार

शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढच्या 48 अंतरिम सरकार स्थापन करण्यात येईल असं लष्कर प्रमुख वकार-उर-झमान यांनी सांगितलं. बांग्लादेशातील कर्फ्यु हटवण्यात आला असून हिंसाचार आटोक्यात आणण्याचा लष्कराचा प्रयत्न आहे. 

5. भारतावर काय परिणाम?

शेजारच्या बांग्लादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचाराचा परिणाम भारताच्या सुरक्षेवर होऊ शकतो. भारतात इस्लामी दहशतवादी सक्रिय होऊ शकतात अशी चिंता व्यक्त करण्यात येतेय. बांगलादेशमधील ताज्या घडामोडी लक्षात घेता सीमा सुरक्षा दलाने (BSF) भारत-बांगलादेश सीमेच्या 4,096 किमी परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

बांगलादेशातील हिंसाचारासंदर्भात भारताकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भारतीयांनी बांगलादेशमध्ये जाऊ नये, बांगलादेशचा प्रवास टाळावा अशा नव्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. बांग्लादेशमध्ये असणाऱ्या भारतीयांसाठी तीन आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आले आहेत. 

या आधी पाकिस्तान, श्रीलंकेमध्ये हिंचारार उफाळला होता, आता बांग्लादेशमध्येही तशीच परिस्थिती आहे. बांग्लादेशमध्ये निर्माण झालेली ही स्थिती संपूर्ण दक्षिण आशियासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे बांग्लादेशात शक्य तितक्या लवकर लोकशाही सरकार स्थापन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! सिडकोची घरे खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दसऱ्यात तब्बल 40 हजार घरांची लॅाटरी निघणार!
मोठी बातमी! सिडकोची घरे खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दसऱ्यात तब्बल 40 हजार घरांची लॅाटरी निघणार!
Chandrakant Patil On Rahul Gandhi : तुमचा नेता इंग्लंडमध्ये बसून आरक्षण घालवतो असं म्हणतो आणि आम्ही आरक्षण घालवणार अस सांगता; चंद्रकांत पाटलांची टीका
तुमचा नेता इंग्लंडमध्ये बसून आरक्षण घालवतो असं म्हणतो आणि आम्ही आरक्षण घालवणार अस सांगता; चंद्रकांत पाटलांची टीका
राज्यात सलग 11 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज, कधीपासून सुरु होणार पाऊस?
राज्यात सलग 11 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज, कधीपासून सुरु होणार पाऊस?
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Mumbai Seat : वादातल्या मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर लवकरचा तोडगा, दोन दिवस बैठक सुरु राहणारMVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण,  महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यताSalim Khan  Threat : सलमानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावे अज्ञात महिलेची धमकीJay Malokar Brother : जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं, भावाची प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! सिडकोची घरे खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दसऱ्यात तब्बल 40 हजार घरांची लॅाटरी निघणार!
मोठी बातमी! सिडकोची घरे खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दसऱ्यात तब्बल 40 हजार घरांची लॅाटरी निघणार!
Chandrakant Patil On Rahul Gandhi : तुमचा नेता इंग्लंडमध्ये बसून आरक्षण घालवतो असं म्हणतो आणि आम्ही आरक्षण घालवणार अस सांगता; चंद्रकांत पाटलांची टीका
तुमचा नेता इंग्लंडमध्ये बसून आरक्षण घालवतो असं म्हणतो आणि आम्ही आरक्षण घालवणार अस सांगता; चंद्रकांत पाटलांची टीका
राज्यात सलग 11 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज, कधीपासून सुरु होणार पाऊस?
राज्यात सलग 11 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज, कधीपासून सुरु होणार पाऊस?
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Embed widget