एक्स्प्लोर

Wardha To Kalamb Train : बहुप्रतीक्षित वर्धा ते कळंब रेल्वेगाडीचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ; मात्र सोयीअभावी प्रवाशांनी फिरवली पाठ

Wardha To Kalamb Train: बहुप्रतिक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. मात्र, या गाडीला हवा त्याप्रकारे प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

Wardha News वर्धा : बहुप्रतिक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांच्या हस्ते झाला. 29 फेब्रुवारीला वर्धा ते कळंब दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून ई-उद्घाटन केले. या विशेष गाडीने अवघ्या दहा रुपयांच्या तिकिटात वर्ध्याहून (Wardha News) कळंब येथे रेल्वेने पोहचता येतं. त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने हा रेल्वे प्रवास अतिशय उपयोगी ठरणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, असे असताना नव्याने सुरू झालेल्या या गाडीला हवा त्याप्रकारे प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. दोन लोको पायलट, एक गार्ड आणि गेटमनच्या सहाय्याने कळंबच्या दिशेने जाणारी ही ट्रेन सध्या रिकामीच धावत असल्याचे चित्र आहे.

सोयीअभावी प्रवाशांनी फिरवली पाठ 

वर्धा ते नांदेड या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे, पण याच मार्गात वर्धा ते कळंबपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. याचे ई लोकार्पण 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथून करण्यात आले. वर्धा ते कळंब दरम्यान पहिली लोकल रेल्वे गाडी सुरू करण्यात आली. ही रेल्वे सकाळी 8 वाजता वर्धा रेल्वे स्थानकावरून कळंबसाठी निघत आहे. पण सध्यातरी यात बसायला प्रवासी तयार नाही. एकतर वर्धा ते कळंब हा 42 किलोमीटर इतका कमी अंतराचा प्रवास आणि या मार्गावर जेथे रेल्वे स्थानके उभारण्यात आली ते ठिकाण गावापासून लांब आहे. देवळी , भिडी आणि कळंब ही रेल्वे स्थानके मार्गात येत आहे. पण येथे उभारलेली रेल्वे स्थानके गावापासून एक ते दोन किलोमीटर लांब आहे. स्थानकावर येणाऱ्यांची संख्या जास्त नसल्याने शेअरिंग आटो देखील उपलब्ध नसतो, त्यामुळे रेल्वेने वर्ध्याहून कळंबला जाणे जिकिरीचे ठरत असल्याने प्रवाश्यांनी या रेल्वे प्रवासाकडे पाठ फिरवली आहे.  

अवघ्या दहा रुपयाच्या तिकिटात 42 किमीचा प्रवास 

सध्या दहा डब्यांची लोकल गाडी डिझेल इंजिनच्या साहाय्याने 42 किमी अंतराचा टप्पा पार करीत कळंब येथे पोहचते. सकाळी आठ वाजता वर्ध्यातून निघालेली गाडी कळंब येथे सव्वानऊ वाजताच्या दरम्यान पोहचत आहे. तर दहा वाजता परत ती वर्ध्याच्या दिशेने रवाना होत आहे. लोको पायलट जी. एस. रोडे आणि सहाय्यक लोको पायलट रुपेश मानकर हे याचे चालक आहे. दहा रुपयाच्या तिकिटात वर्ध्याहून कळंब येथे पोहचणे शक्य असले तरी, अद्याप गाडी रिकामीच धावत असल्याचे चित्र आहे. देवळी आणि भिडी या दोन स्थानकावरून देखील फारसे कुणी या गाडीमध्ये बसले नाही. सध्या तरी गाडीची एकच फेरी पूर्ण केली जात आहे. 

लोकार्पण करण्याची घाई?

देवळी, भिडी आणि कळंब रेल्वे स्थानकावर तिकीट घराशिवाय, पिण्याचे पाणी आणि शौचालय उपलब्ध आहे. सध्यातरी कुणी फेरीवाला स्टेशनवर अथवा गाडीमध्ये आढळून आला नाही. खासदार रामदास तडस यांनी कळंब येथून या गाडीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. हाच शुभारंभ वर्ध्यातून करण्यात आला असता, अथवा वर्ध्यात या गाडीचे स्वागत करण्यात आले असते, तर त्याचा प्रचार प्रसार अधिक झाला असता. अशा प्रतिक्रिया भिडी येथील एका प्रवाशाने दिली. चार ते पाच प्रवासी घेऊन ही गाडी कळंबच्या दिशेने जाताना दिसते.  यवतमाळ पर्यत या मार्गाचे काम पूर्ण झाले असते आणि त्यानंतर या मार्गाचे लोकार्पण होऊन पुढे ही गाडी सुरू करण्यात आली असती तर वर्धा आणि यवतमाळ या दोन जिल्हा स्थळांना जोडणारी ही गाडी ठरली असती. लोकार्पण करण्याची घाई करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया देखील प्रवाश्यांनी बोलतांना व्यक्त केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget