एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : पाशवी बहुमत, दिल्लीत बापजादे बसलेत, तरी फडणवीसांना भ्रष्ट मंत्र्यांना काढता येत नाही,दबाव आहे तरी कोणाचा? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

पाशवी बहुमत असताना, दिल्लीत बापजादे बसले असताना मुख्यमंत्री फडणवीसांना जर भ्रष्ट मंत्र्यांना काढता येत नाही, तर त्यांच्यावर नेमका दबाव आहे तरी कोणाचा? असा सवल करत उद्धव ठाकरेंनी सरकारकर हल्लाबोल केलाय.

Uddhav Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला असं वाटलं होतं की ते भाजपची परंपरा चालवतील. पुराव्यानिशी आरोप केल्यानंतर चौकशी करायची देखील गरज नाही त्यावेळी मंत्र्यांची हकालपट्टी केली जाईल, अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्री सांगतात की आम्ही त्यांना समज दिली. ही कुठली समज? म्हणजे पुढच्या वेळेला रमी नव्हे तर तीन पत्ती खेळ, पुढच्या वेळेला बार सावली नव्हे तर भर उन्हामध्ये बांध, पुढच्यावेळी बॅग उघडी नव्हे तर बंद करून ठेव, असा हा प्रकार आहे. हे काही योग्य नाही.

जर तुम्ही भ्रष्टमंत्र्यांना समज देऊन सोडून देणार असाल तर आमच्या उपराष्ट्रपतींचा राजीनामा घेऊन त्यांना तात्काळ वनवासात का पाठवलं? उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) सध्या कुठे आहेत? त्यांनी राजीनामा नेमका का दिला? असा सवाल करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली. पाशवी बहुमत असताना, दिल्लीत बापजादे बसले असताना मुख्यमंत्री फडणवीसांना जर भ्रष्ट मंत्र्यांना काढता येत नाही, तर त्यांच्यावर नेमका दबाव आहे तरी कोणाचा? असा सव करत उद्धव ठाकरेंनी सरकारकर हल्लाबोल केलाय.

शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि सभागृहात तुम्ही कशात रमता?

राज्यातला एक मंत्री डान्सबार चालवतोय, एक पैशाची बॅग घेऊन बसलय. असे असताना मात्र एक चांगली गोष्ट बघायला मिळाली, ती म्हणजे अभ्यास कोणताही असो, तुमची आवड कोणतीही असो, मात्र सरकार चालवताना तुम्हाला कोणतं तरी मंत्रीपद द्यावं लागतं. मात्र पहिल्यांदा असं झालं की एका नेत्याला त्याच्या आवडीचं खात मिळालं. ते म्हणजे रमी मंत्री, ते क्रीडामंत्री नव्हे. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला यांच्याकडे वेळ नाही आणि सभागृहात तुम्ही कशात रमता? असा सवाल करत माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

आजपर्यंतची राजीनामा घेऊन चौकशीला सामोर जाण्याची परंपरा होती, पण....

भ्रष्टाचारांच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. राज्यातील सत्ताधारी भ्रष्ट आघाडीने महाराष्ट्र भ्रष्टाचारात आघाडीवर तर विकासात सर्वात मागच्या रांगेत नेऊन ठेवला आहे. खरंच आम्हाला तुमची लाज वाटते. राज्यात आपले सरकार असताना ज्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते त्यावेळी मंत्र्यावर आरोप झाल्यास त्याचा राजीनामा घेऊन चौकशीला सामोर जाण्याची आजपर्यंतची परंपरा होती. मी देखील मुख्यमंत्री असताना काही मंत्र्यांचे राजीनामा घेतले. वनमंत्री असलेल्या नेत्यावर अतिशय वाईट आरोप होते. त्यांना देखील वनवासात पाठवले होते. अगदी केंद्रात देखील अशा घटना घडल्या आहेत. आरोप सिद्ध न झाल्यास पुन्हा मंत्रिमंडळात घेणे याला म्हणतात कारभार. याला म्हणतात जनताभिमुख कारभार. अलीकडचे सरकार हे जनता भिमुख नाही, तर पैसे गिळणारं सरकार आहे. अशी बोचरी टीका ही उद्धव ठाकरे यांनी केलीय.

 

आणखी वाचा

महत्त्वाच्या बातम्या

लातूरच्या जवळगा साकोळ यात्रेत भीषण अपघात, आकाश पाळण्यात केस अडकून 15 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी
लातूरच्या जवळगा साकोळ यात्रेत भीषण अपघात, आकाश पाळण्यात केस अडकून 15 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
जयकुमार गोरेंबाबत केलेलं वक्तव्य भाजपच्या जिव्हारी, मोहोळच्या अनगरमध्ये संजय राऊतांचा पुतळा जाळला, विरोधात जोरदार घोषणाबाजी
जयकुमार गोरेंबाबत केलेलं वक्तव्य भाजपच्या जिव्हारी, मोहोळच्या अनगरमध्ये संजय राऊतांचा पुतळा जाळला, विरोधात जोरदार घोषणाबाजी

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget