एक्स्प्लोर

BJP : महाविकास आघाडीचा एकही खासदार निवडून येणार नाही अशी भीती: चंद्रशेखर बावनकुळे

Thane BJP : नरेंद्र मोदी पुन्हा यावे, ही भाजपची गरज नसून जनतेची गरज असल्याचं मत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केलं.

ठाणे : राज्यातील लोकसभेच्या सर्वच जागा महायुती जिंकणार असून महायुतीला त्यांची एकही जागा निवडून आणता येणार नाही असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. त्यांचा एकही खासदार निवडून येणार नसल्याची भीती महाविकास आघाडीला आहे असंही ते म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अजितदादा गेल्यामुळे त्यांना आता भीती वाटायला लागली आहे आणि त्यांचे एकही खासदार निवडून येणार नाही. जे काही निवडून येतील ते महायुतीचे खासदार निवडून येणार आहेत आणि बारामती मध्ये देखील प्रचंड मतांनी महायुती निवडून येणार आहे. म्हणून त्यांना भीती वाटत आहे. 

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून लोकसभा मतदारसंघनिहाय महाविजय 2024 संकल्प दौरा कार्यक्रम राबविला जात आहे. यानिमित्त आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात व जल्लोषात स्वागत केला.
        
या संवाद कार्यक्रमाची सुरुवात भिवंडीतील काल्हेर येथे युवा मोर्चा उपाध्यक्ष देवेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युवा मोर्चा वतीने भव्य स्वागत करण्यात आली. त्यानंतर कोपर , पूर्णा येथेही बावनकुळे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनतर शहरातील पद्मानगर भाजी मार्केट येथील भाजी व फळ विक्रेते,किराणा दुकानदार, उज्वला गॅस योजना, नाका कामगार, आयुष्यमान भारत, स्वनिधी लाभार्थी, मोफत धान्य मिळणारे लाभार्थी यांच्याशी संवाद साधत त्यांना 2024 मध्ये प्रधानमंत्री कोण हवेत अशी विचारणा बावनकुळे यांनी केली. या संवाद यात्रेत केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौघुले सहभागी झाले होते.  
या संवाद यात्रेचा समारोप करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी इंडिया आघाडीवर टिका केली. ते म्हणाले की, मुंबई येथे 28 पक्षांच्या इंडिया आघाडीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या सभेवर देखील टिका करत राज्यात मोदी यांच्या नेतृत्वाला भरघोस प्रतिसाद मिळत असून त्यामध्ये भिवंडी लोकसभे मधील संवाद यात्रा ही 23 वी आहे असे सांगत भिवंडीत 814 तर राज्यात तब्बल 35 हजार नागरिकांशी संवाद साधला. त्यामध्ये फक्त 13 जणांनी मोदी व्यतिरिक्त इतर व्यक्तीचे नाव घेतले अशी माहिती दिली.

काँग्रेसच्या 65 वर्षांचे पाप मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने धुवून काढले असे सांगत देशाला विश्वात महसत्ता बनविण्यासाठी 2024 मध्ये महाराष्ट्रात 45 प्लस खासदार निवडून देण्याचे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेवटी केले.तर या प्रसंगी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी अयोध्या येथील रामजन्मभूमी मंदिर दर्शनासाठी भिवंडी लोकसभा क्षेत्रातील 50 हजार नागरिकांना घेवून जाण्याचा संकल्प बोलून दाखविला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यात सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पसंती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची प्रतिष्ठा उंचावली असून, सर्वच स्तरांमधून नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा यावेत, ही भाजपाची गरज नसून जनतेची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांच्या विकासयोजना राबविण्यात आल्या आहेत. त्याचा जनतेला लाभ होत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

ही बातमी वाचा: 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोशल मीडियावर गॅस तुटवड्याच्या अफवा, पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये, मिरा भाईंदरमध्ये थेट गॅस एजन्सीमध्येच दाखल 
सोशल मीडियावर गॅस तुटवड्याच्या अफवा, पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये, मिरा भाईंदरमध्ये थेट गॅस एजन्सीमध्येच दाखल 
Bhiwandi Fire  : भिवंडीत गॅस लायटर कंपनीला भीषण आग, संपूर्ण कंपनी जळून खाक
Bhiwandi Fire  : भिवंडीत गॅस लायटर कंपनीला भीषण आग, संपूर्ण कंपनी जळून खाक
KDMC : ऐकावं ते नवलंच! काही नागरिकांनी मालमत्ता कर नं भरलामुळे संपूर्ण सोसायटीचाच पाणीपुरवठा बंद; कल्याण डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांची अजब कारवाई
ऐकावं ते नवलंच! काही नागरिकांनी मालमत्ता कर नं भरलामुळे संपूर्ण सोसायटीचाच पाणीपुरवठा बंद; कल्याण डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांची अजब कारवाई
साताऱ्यानंतर ठाणे महापालिका, भाजप आमदाराने हिशोब काढला; विधानसभेत भाजप-शिवसेनेत पुन्हा 'सामना'
साताऱ्यानंतर ठाणे महापालिका, भाजप आमदाराने हिशोब काढला; विधानसभेत भाजप-शिवसेनेत पुन्हा 'सामना'

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, यूनियन बँक, बँक ऑफ बडोदा आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
यूनियन बँक, बँक ऑफ बडोदा आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
Gold Price Crash : सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
Iran War Update : होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
UPI Rule : यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
Gold Price Update : एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
Embed widget