एक्स्प्लोर

ठाण्यातून कल्याण जिल्हा वेगळा करा, भाजप आमदारांची मागणी; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या की जिल्हा विभाजनाचे पडघम वाजू लागतात. ठाण्यातून पालघर जिल्हा वेगळा करताना देखील बराच खल झाला होता. आता आगमी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण जिल्हा वेगळा करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. 

ठाणे : ठाणे (Thane)  जिल्ह्याचं पुन्हा विभाजन करत कल्याण जिल्हा वेगळा करा अशी मागणी भाजप आमदार किसन कथोरे (Kisan Kathore)  यांनी केली. सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यात पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)  यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात त्यांनी ही मागणी लावून धरली. मात्र अशा पद्धतीने बैठकीत तसा ठराव करता येणार नाही असं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पालघर (Palghar) जिल्हा वेगळा झाला तेव्हाच कल्याण (Kalyan)  जिल्ह्यासाठीही मागणी करण्यात येत होती. मात्र तेव्हा या मागणीला फारसं यश आलं नाही. आता पुन्हा या मागणीने जोर धरला आहे. 

ठाणे जिल्ह्याचं पुन्हा विभाजन करण्यासंदर्भात  सर्व पक्षीयांशी चर्चा करुन वरीष्ठांशी चर्चा करुन त्यानुसार पुढील निर्णय घ्यायचा की नाही? हे निश्चित करता येईल असे स्पष्ट केले. ठाण्यातून पालघर जिल्हा वेगळा होत असतांना त्याच वेळेस कल्याण जिल्हाही वेगळा करावा अशी मागणी लावून धरण्यात आली होती. परंतु अद्यापही त्याला फारसे यश आले नसल्याचेच दिसत आहे. कल्याण ते थेट कर्जत पर्यंत हा जिल्हा असावा असेही यात नमुद करण्यात आले आहे. कर्जत मधील नागरीकांना आपल्या विविध गोष्टींसाठी किंवा शासकीय कामांसाठी अलिबागला जावे लागत आहे. त्यामुळे तो फार लांबचा फेरा पडत आहे. त्यामुळे कल्याण जिल्हा झाल्यास रेल्वेची सुविधा असल्याने येथील नागरीकांना देखील दिलासा मिळणार आहे. त्यामुळे त्या अनुषगांने ही मागणी करण्यात आली होती.

मुख्यमंत्री आणि उपमुखमंत्र्यांसोबत या संदर्भात चर्चा करणार : शंभुराज देसाई

मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ही मागणी लगेच पूर्ण होणार नाही, त्यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय होतो असे सांगितले.  शंभुराज देसाई म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुखमंत्र्यांसोबत या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर कथोरे यांच्या मागणीवर कोणता निर्णय घ्यायचा तो योग्यवेळी घेण्यात येईल. 

निवडणुका जवळ आल्यानंतर जिल्हा विभाजनाचे पडघम 

लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या की जिल्हा विभाजनाचे पडघम वाजू लागतात. ठाण्यातून पालघर जिल्हा वेगळा करताना देखील बराच खल झाला होता. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ असे चार तालुके आहेत.  कल्याण तालुक्याला जोडलेले असून कल्याण शहर हा सगळ्यांचा केंद्रबिंदू आहे.

भौगोलिकदृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करण्याची सरकारची योजना

राज्यात 2014 पासून नवीन जिल्हा तयार झालेला नाही. यामुळे लोकसंख्येनुसार जिल्ह्याचे कामकाज पाहताना प्रशासकीय यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. भौगोलिकदृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार करण्याची योजना राज्य सरकरची आहे. सध्या पालघरचे विभाजन करून जव्हार, ठाणे जिल्हा विभाजन करून मीरा भाईंदर, कल्याण हे दोन नवीन जिल्हे  या मागणीने जोर धरला आहे. 

हे ही वाचा :

कर नाही त्याला डर कशाला? दूध का दूध पानी का पानी होईल, मुख्यमंत्र्यांचा रविंद्र वायकरांवर हल्लाबोल

 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
Mumbai Rain: मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन, जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी
मुंबईत मन्सूनपूर्व पावसाचे आगमन, जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी
Ramdas Athawale : सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
महिला लीग : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ठाणे स्कायरायझर्सच्या जर्सीचे अनावरण
महिला लीग : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ठाणे स्कायरायझर्सच्या जर्सीचे अनावरण

व्हिडीओ

Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
Bal Mane Konkan Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला
WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
BJP : भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर! सतीश पुनिया, तरुण चुग यांच्यासह 'या' बड्या नेत्यांना मिळाली संधी
भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर! सतीश पुनिया, तरुण चुग यांच्यासह 'या' बड्या नेत्यांना मिळाली संधी
PhysicsWallah : फिजिक्सवालाच्या शेअरमध्ये 15 टक्के तेजी, काय आहेत तेजीची प्रमुख कारणं, जाणून घ्या एका क्लिकवर
फिजिक्सवालाच्या शेअरमध्ये 15 टक्के तेजी, काय आहेत तेजीची प्रमुख कारणं, जाणून घ्या एका क्लिकवर
Rishabh Pant : उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या सहायक प्रशिक्षकानं मौन सोडलं, फलंदाजीवर सल्ला देत म्हणाले... 
उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकानं मौन सोडलं, नेमकं काय म्हटलं?
Vidhan Parishad : कारखाना समिती बरखास्त करणार, ठाकरेंच्या उमेदवाराला नोटीस; देवयानी डोनगावकरांनी उमेदवारी मागे का घेतली? Inside Story
कारखाना समिती बरखास्त करणार, ठाकरेंच्या उमेदवाराला नोटीस; देवयानी डोनगावकरांनी उमेदवारी मागे का घेतली? Inside Story
Embed widget