एक्स्प्लोर

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यू, एक गंभीर

Bhiwandi Building Collapse : भिवंडीच्या ग्रामीण पट्ट्यातील खाडीपार भागात असलेल्या मूलचंद कम्पाऊंड परिसरातील दोन मजली इमारतीचा पहिला मजला पूर्णतः कोसळला. यामुळे तळमजल्यावरील कापडाच्या दुकानात झोपलेल्या एकाचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू झाला.

Bhiwandi Building Collapse : भिवंडी (Bhiwandi) शहरालगतच्या ग्रामीण पट्ट्यातील खाडीपार भागात असलेल्या मूलचंद कम्पाऊंड परिसरातील दोन मजली इमारतीचा पहिला मजला पूर्णतः कोसळला. यामुळे तळमजल्यावरील कापडाच्या दुकानात झोपलेल्या एकाचा ढिगाऱ्याखाली (Debris) दबून जागीच मृत्यू झाला. आज (27 जानेवारी) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मजीद हबीब अन्सारी (वय 35 वर्षे) असं मृतांचं नाव आहे. तर अशरफ नावाच्या 22 वर्षीय तरुणाला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपसारासाठी दाखल करण्यात आलं.  

दुर्घटनाग्रस्त दोन मजली इमारत काटई ग्रामपंचायत हद्दीतील असून 30 ते 35 वर्ष जुनी आहे. या इमारतीमध्ये व्यापारी गाळे आणि कार्यलय, गोदाम होती. यामध्ये कापडाचे गोडाऊन तसंच टेक्स्टाईल कंपन्यांचे कार्यलय होतं. दरम्यान घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांकडून मदतकार्य सुरु असून या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकलं आहे का? याचा शोध ढिगारा हटवून घेत आहेत. विशेष म्हणजे ही घटना दिवसा घडली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती.  

4 वर्षात इमारती कोसळून 57 जणांचा मृत्यू 

भिवंडी महापालिका हद्दीत अतिधोकादायक इमारतींची संख्या 589 असून धोकादायक इमारतींची संख्या 400 एवढी आहे. धोकादायक इमारतींना नोटीस  देऊन देखील काही नागरिक आपल्या परिवाराचे स्थलांतर करत नसल्याने पावसाळ्यात या धोकादायक इमारती कोसळण्याच्या अनेक घटना घडत असून  त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सप्टेंबर 2020 मध्ये शहरातील धामणकर नाका परिसरात असलेली जिलानी इमारत कोसळून झालेल्या  दुर्घटनेत 38 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 25 जण जखमी झाले आहेत. यापूर्वी देखील शहरात धोकादायक आणि अनधिकृत इमारती कोसळून नागरिकांचा  जीव  गेल्याच्या घटना घडल्या आहेत. भिवंडी शहर आणि लगतच्या ग्रामीण पट्ट्यातील धोकादायक इमारतींमध्ये सुमारे 25 हजार कुटुंब राहत असून सुमारे एक लाख   नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तर गेल्या चार वर्षांत विविध ठिकाणी झालेल्या इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यत 57 जणांचा मृत्यू झाला. तर 67 जण जखमी झाले आहेत.  

धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर

कामगारनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहर लगतच्या ग्रामीण पट्ट्यातील कामगार वर्ग मोठ्याप्रमाणात वास्तव्यास आला असल्याने बांधकाम व्यवसायिकांनी शासकीय नियमांना तिलांजली देत छोट्या छोट्या जागेत वाटेल तशा मनमानी कारभार करीत इमारती बांधल्या आहेत. शासनाने दाखल घेऊन अनधिकृत धोकादायक इमारती तोडून टाकण्याच्या निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र पालिका प्रशासनाने कागदावर कारवाई झाल्याचे दाखवून   इमारतीकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत असल्याने पुन्हा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

VIDEO : Bhiwandi Building Collapsed : भिवंडीच्या खाडीपार भागात कोसळली दोन मजली इमारत, एका व्यक्तीचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
Maharashtra Rain Weather News: मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget