एक्स्प्लोर

Call Drops : कॉल ड्रॉपमुळे लोकांचे टेन्शन वाढले! दूरसंचार विभागाने विविध दूरसंचार कंपन्यांची घेतली बैठक 

Calling Issues : दूरसंचार कंपन्यांची ही बैठक अशा वेळी झाली, जेव्हा देशभरात 5G नेटवर्क सुरू झाले आहे. आतापर्यंत 50 शहरांमध्ये 5G नेटवर्क आहे

Telecom Department : कॉल डिस्कनेक्शनची (Call Disconnection) वाढती प्रकरणे आणि कॉलिंग गुणवत्ता (Calling Quality) सुधारण्यासाठी दूरसंचार विभागाने (DOT) देशातील मोठ्या दूरसंचार ऑपरेटर्ससोबत सेवा आणि गुणवत्तेशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. ही बैठक अशा वेळी झाली, जेव्हा देशभरात 5G नेटवर्क (5G) सुरू झाले आहे. दरम्यान आतापर्यंत 50 शहरांमध्ये 5G नेटवर्क आहे.

विविध दूरसंचार कंपन्यांचा सहभाग

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दूरसंचार सचिव के. राजारामन उपस्थित होते. यामध्ये भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोनसह विविध दूरसंचार सेवा कंपन्यांनी सहभाग घेतला. सुत्रांच्या माहितीनुसार, बैठकीतील चर्चेत या कंपन्यांना देशातील दूरसंचार सेवांचा दर्जा सुधारण्यास सांगण्यात आले. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत दूरसंचार कंपन्यांनी सेवा गुणवत्तेची सध्याची पातळी आणि मानके यावर तपशीलवार सादरीकरण केले.

 

टेलिकॉम कंपन्यांकडून अॅक्शन प्लॅन मागवला
मोबाईल वापरकर्त्यांना वारंवार कॉल ड्रॉप आणि इंटरनेटचा वेग कमी होण्याचा सामना करावा लागत होता. आता सरकारने या प्रकरणी कठोर पावले उचलली आहेत. दूरसंचार विभागाने कॉल ड्रॉप्स थांबवण्यासाठी आणि डेटा स्पीड वाढवण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांकडून अॅक्शन प्लॅन मागवला आहे. सरकारने टेलिकॉम कंपन्यांना सेवा सुधारण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दूरसंचार सेवांची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने ही कारवाई केली आहे.


दूरसंचार मंत्र्यांनी दिले होते संकेत

या वर्षी सप्टेंबरमध्ये दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संकेत दिले होते की, दूरसंचार सेवेची क्वालिटी स्टॅंडर्ड अधिक कडक केली जाऊ शकतात. उद्योगांना दूरसंचार सेवेच्या गुणवत्तेत आवश्यक सुधारणा कराव्या लागतील. तसेच सरकारने या क्षेत्रात मोठ्या सुधारणाही सुरू केल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

बैठकीचा अजेंडा काय होता?
दूरसंचार सचिव के राजारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडियासह दूरसंचार सेवा कंपन्या उपस्थित होत्या. दूरसंचार कंपन्यांना देशातील दूरसंचार सेवांचा दर्जा सुधारण्यास मदत करणारे धोरण आणि ठोस उपाय ओळखण्यावर चर्चा करण्यात आली.


दूरसंचार सेवांचा दर्जा सुधारण्यावर चर्चा

दूरसंचार विभागाने कॉल डिस्कनेक्शनची वाढती प्रकरणे आणि इतर सेवांबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन कंपन्यांसोबत बैठक घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत कंपन्यांना समस्या संबंधित क्षेत्र ओळखण्यास सांगण्यात आले. विभागातील सूत्रांनी सांगितले की, ते बऱ्याच काळापासून सेवेच्या गुणवत्तेशी संबंधित मुद्द्यांवर विचार करत आहे, तसेच कंपन्यांना समस्या असलेली क्षेत्रे ओळखण्यास तसेच सरकारकडून पावले उचलण्याची सूचना करण्यास सांगण्यात आले आहे. दूरसंचार विभाग कायदेशीर चौकट आणि धोरणात्मक उपाययोजनांवर विचार करत आहे, ज्यामुळे सेवेचा दर्जा अधिक चांगला मिळू शकेल.

इतर बातम्या

Reliance Jio चा धमाका! राज्यातील आणखी दोन शहरांमध्ये 5G सेवा सुरू

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Unveiling Ceremony : एकनाथ Shinde म्हणाले 'ठाण्यातील Vitthal मूर्ती भक्तांसाठी प्रेरणा'
Pigeon Feeding Row: मुंबईत कबूतरांना दाणे टाकण्यावर निर्बंध, फक्त ४ ठिकाणी सकाळी ७ ते ९ परवानगी
Sanjay Raut Health: 'प्रकृतीत गंभीर बिघाड', खासदार Sanjay Raut दोन महिने राजकारणापासून दूर
Maha Local Body Polls: 'पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता'- Ajit Pawar
EVM Protest: 'परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास कारवाई', चंद्रशेखर बावनकुळेंचा MVA-MNS ला थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
Embed widget