Bharat Gogawale VIDEO : नारायण राणेंनी मारामाऱ्या केल्या, जेलमध्ये गेले, मर्डर... सगळं केलं आणि एवढ्या उंचीवर पोहोचले : भरत गोगावले
Bharat Gogawale On Narayan Rane : भानगडी केला नाही तो शिवसैनिक नव्हे असं भरत गोगावले म्हणाले. पण आता भानगडीचे दिवस संपले असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं.

सिंधुदुर्ग : शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहेत. सिंधुदुर्गामध्ये भाषणादरम्यान राणेंनी मारामाऱ्या, मर्डर केल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. नारायण राणे यांना जवळून पाहिलं आहे. त्यांनी अंगावर केसेस घेतल्या, भानगडी केल्या, मर्डर वगैरे सगळं झालं असं भरत गोगावले म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार आणि नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे उपस्थित होते. त्यांच्या वक्तव्यावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याची बैठक कुडाळ पावशी येथे संपन्न झाली. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं. नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत. अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, भानगडी केल्या, मारामारी केल्या, मर्डर सगळं झालं. वेगळं सांगायची आवश्यकता नाही असं ते म्हणाले.
निलेश राणेंना भानगडी करायची गरज नाही
भरत गोगावले म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण गेले अनेक वर्ष पाहतोय. निलेश राणेंच्या रुपाने सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद मिळाली. भानगडी केला नाही तो शिवसैनिक नव्हे. केसरकर भानगडी करणारे नाहीत त्यामुळे अडचण होते. मात्र निलेश राणे जशास तसं उत्तर देणारे आहेत. पण आता भानगडी करायचे दिवस संपले आहेत. निलेश राणे यांनी भानगडी करायची गरज नाही. सगळं जुळवून चालवायचं आहे असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे.
भरत गोगावले म्हणाले की, "आम्हाला तुम्ही निवडून दिलात आता त्याची परत फेड करण्यासाठी आम्ही आलो आहोत. येत्या चार महिन्यात निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवताना अत्यंत सावध रहावे लागते. तुम्हाला लागेल ती ताकद देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. केसरकर साहेब भानगडी करणारे नाहीत. ज्याने भानगड केली नाही तो शिवसैनिक होऊ शकत नाही. काही पक्ष आपण शत प्रतिशत आहोत असं म्हणतात. मग आम्ही पण शत प्रतिशत जाऊ शकत नाही का? कोकणात आज आपला पक्ष नंबर एक आहे."
भरत गोगावले म्हणाले पुढे की, "आम्ही गरिबांचे शेठ आहोत, श्रीमंताचे नाही. आमच्याकडे मनाची श्रीमंती आहे. आम्ही पालकमंत्री पण होऊ, आम्ही काम करतोय. त्याचा मोबदला मागतोय. सगळीकडे महायुती म्हणून जुळेल असंही नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचे दोन तर भाजपाचा एक आमदार आहे. आम्हाला समजून घेतलं तर आम्ही समजून घेऊ. माझ्या खात्यात कोकणाला झुकत माप देऊ."
ही बातमी वाचा:























