एक्स्प्लोर

Udayanraje Bhosale: मराठ्यांना डावलून वंजारी, माळी, धनगरांना आरक्षण दिलंय; एकदाची जातनिहाय जनगणना करुन टाका: उदयनराजे भोसले

Maharashtra Politics: साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे मराठा आरक्षणाच्या मुद्दायवर भाष्य

सातारा: राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी जातनिहाय जनगणनेची (Caste Census) मागणी केली आहे. मी जात पात मनात नाही. पण मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) 23 मार्च 1994 चा अध्यादेश हा कळीचा मुद्दा आहे. त्यात मराठ्यांना डावलून माळी, धनगर, वंजारी (Vanjari) असे सर्वांना आरक्षण देण्यात आले. त्यामुळे सध्या जातीजातीत तेढ निर्माण झाला असून दिवसेंदिवस जाती जातीत दुफळी माजत असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव येथे आपल्या भाषणात सांगितलं आहे. त्यामुळे एकदाची जातनिहाय जनगणना करून ज्यांना त्यांना वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाकावे, अशी रोखठोक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली. 

सध्या जालन्यातली वडीगोद्री येथे सध्या लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे. त्यांना भेटण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले आहे. या शिष्टमंडळात छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अुतल सावे यांच्यासह 12 जणांचा समावेश आहे. हे सर्वजण आता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची मनधरणी करणार आहेत.  तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हेदेखील आक्रमक झाले आहेत. आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी बलिदान देऊ, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सरकार मराठा समाजाला फसवत आहे: अंबादास दानवे

सरकार मराठ्यांना फसवत आहे आणि दुटप्पी भूमिका घेत आहे.  सग्यासोयऱ्यांचे नोटिफिकेशन काढले परंतु ते झाल्याने जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी झाली नाही म्हणून मराठ्यांना न्याय मिळाला नाही, असे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले. ज्यांच्या नोंदी मिळत आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे आणि त्या आधीपासून मिळतात. पाच नातेवाईकांचे नाव ओबीसीमध्ये असल्यास ओबीसींचे प्रमाणपत्र मिळते, सरकारने यामध्ये नवीन काही केले असे नाही, उलट सरकारने यात मराठ्यांची फसवणूक केली आहे.

लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण हिंसा, गावबंदी करणे चुकीचे आहे, परंतु असे केल्याने उपोषणकर्त्यांचा आंदोलकणाच्या विरोधात जनमत जात असते. हे सरकार आंदोलन पेटवत आहे, मराठयांनी ओबीसी विरोधात आणि ओबीसींना मराठ्याविरोधात आंदोलन केले पाहिजे असे सरकारलाच वाटते, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. 

फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्रमध्ये असा जातीयवाद होणे महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारे आहे. जे कोणी राजकीय नेते आहेत, त्यांनी भूमिका घेताना राजकीय विद्वेष होऊ नये, याची भूमिका घेणे महत्वाचे आहे. ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे ज्या पद्धतीने भूमिका घ्यायचे तशी भूमिका पंकजा मुंडे घेतात का हा माझ्यापुढे प्रश्न आहे. आणि त्याचे परिणाम त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगले भोगायला भेटले आहेत, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले.

आणखी वाचा

संभाजीनगरमध्ये पाऊल ठेवताच भुजबळ गरजले, मनोज जरांगेंना म्हणाले कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते!

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
मुसळधार पावसामुळं साताऱ्यातील आलवडी गावात भूस्खलनाचा धोका,  नागरिकांना स्थलांतर करावं, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मुसळधार पावसामुळं साताऱ्यातील आलवडी गावात भूस्खलनाचा धोका,  नागरिकांना स्थलांतर करावं, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट; वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात
महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; रायगड, नाशिक, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट; वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Embed widget