एक्स्प्लोर

मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आरक्षण दिले मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारलेत का? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

दिल्लीमध्ये पण भाजप सरकार आणि महाराष्ट्रात देखील भाजप सरकार आहे. त्यामुळे भाजपने आता हा मराठा आरक्षणाचा  प्रश्न सोडवला पाहिजे असेही चव्हाण म्हणाले.

सांगली : मराठवाड्यातल्या मराठा समाजाला (Maratha Reservation)  मागासवर्गीय आरक्षण दिले तर मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारले  आहे का असा सवाल करत आताच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत फारच चुकीचा निर्णय घेतला असल्याची टीका  माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. विटा मध्ये काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेदरम्यान ते माध्यमाशी बोलत होते.  पृथ्वीराज  चव्हाण देखील दिल्लीतून आले मग त्यांनी का आरक्षण दिले नाही या अजित पवार यांनी केलेल्या  टिकेवर देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिले.

आज अजित पवारांना पक्षांतरामुळे विसर पडलेला दिसतोय की मी मुख्यमंत्री असताना आपण सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले आणि त्यावेळी  ते माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते असे चव्हाण म्हणाले. ज्यांच्याकडे निजामकालीन कागदपत्र,दाखले पुरावे आहेत त्याला ओबीसीमध्ये आरक्षण द्यायच  आणि ज्यांच्याकडे पुरावे नाहीत असे गरीब लोक ज्यांना राहायला घर नाही ते पुरावा कुठे सांभाळत बसणार.अशा पध्दतीने आता मराठवाड्यातल्या  मराठा समाजाचे दोन भाग सरकारने केलेले आहेत. आज सरकार निजामकालीन कागदपत्र , पुरावे दाखले ग्राह्य  धरतेय पण शाहू महाराजांचे दाखले सरकार ग्राह्य का धरत नाही, हा कोणता न्याय आहे असे म्हणत यावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतलाय. आता दिल्लीमध्ये पण भाजप सरकार आणि महाराष्ट्रात देखील भाजप सरकार आहे. त्यामुळे भाजपने आता हा मराठा आरक्षणाचा  प्रश्न सोडवला पाहिजे असेही चव्हाण म्हणाले.

आम्ही आरक्षण दिले आणि त्यावेळी कोणीतरी कोर्टात गेलं आणि ऑक्टोबरमध्ये आमचे सरकार गेलं. मात्र नंतर जे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आलं त्यांनी मात्र कोर्टामध्ये या केसचा पाठपुरावा ज्या ताकदीने करायला हवा तसा केला नाही. खरं म्हणजे कोर्टाला आणखी मुदत मागायला पाहिजे होती. मात्र त्यांनी आरक्षणचा  पराभव होऊ दिला, हा स्पष्ट आक्षेप आहे  असेही चव्हाण म्हणाले. 

मराठ्यांना आरक्षण देण्याचा कायदा झाला ही निव्वळ फसवणूक

या सगळ्यानंतर मराठाआरक्षण हा सगळं प्रश्न गुंतागुंतीचा बनला  आहे. पण  50 वर्षानंतर पहिल्यांदा मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही हाती घेतला आता. पण त्यामध्ये काही त्रुटी असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी त्या दूर करायला पाहिजे होत्या. पण 2018 साली देवेंद्र फडणीस यांनी जी आरक्षण दिलं ते फसवणूक करणार आरक्षण होतं. कारण  महाराष्ट्रामध्ये कायदा करण्याच्या आधीच दिल्लीने राज्यघटनेमध्ये 102 वी घटनादुरुस्ती केली होती आणि त्यामुळे मागासवर्गीय समाजाला आरक्षण देण्याचे सर्व अधिकार हे राष्ट्रपतीने स्वतःच्या हातात घेतले होते. राज्य सरकारकडे कुठलाही अधिकार राहिला नव्हता आणि त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याचा कायदा झाला ही निव्वळ फसवणूक होती असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

हे ही वाचा :

Maratha Reservation : मराठा समाजाच्यावतीने आज 'ठाणे बंद'चे आवाहन; जालन्यातील लाठीचार्जचे पडसाद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran Vs Israel War: इराण- अमेरिका युद्धामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट, सांगलीची हजारो टन हळद मुंबईतील बंदरात पडून, भावही कोसळला
इराण- अमेरिका युद्धामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट, सांगलीची हजारो टन हळद मुंबईतील बंदरात पडून, भावही कोसळला
Sangli News: पंचायत समिती सदस्य बनल्याचा आनंद ठरला काही दिवसाचा, तृतीयपंथी सदस्याचा हृदयविकाराने दुर्दैवी अंत
पंचायत समिती सदस्य बनल्याचा आनंद ठरला काही दिवसाचा, तृतीयपंथी सदस्याचा हृदयविकाराने दुर्दैवी अंत
कराडमध्ये खळबळजनक घटना, प्रेम संबधातून 45 वर्षीय प्रियकराचा खून; प्रेयसीकडून कुऱ्हाडीने वार, महिलेस अटक
कराडमध्ये खळबळजनक घटना, प्रेम संबधातून 45 वर्षीय प्रियकराचा खून; प्रेयसीकडून कुऱ्हाडीने वार, महिलेस अटक
Sharad Ponkshe On Hinduism: 'टिपू सुलतानचा फोटो, तरी हिंदू जागेच व्हायला तयार नाहीत..'; मालेगावच्या उपमहापौरांच्या 'त्या' कृत्यावर शरद पोंक्षेंचा घणाघात
'टिपू सुलतानचा फोटो, तरी हिंदू जागेच व्हायला तयार नाहीत..'; मालेगावच्या उपमहापौरांच्या 'त्या' कृत्यावर शरद पोंक्षेंचा घणाघात

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget