एक्स्प्लोर

Sharad Pawar on PM Modi : मोदी घटना बदलणार नाही म्हणतात, मग खासदार वेगळं कसं काय बोलतात? शरद पवारांचा सवाल

पीएम मोदी घटना बदलायची नाही म्हणतात आणि खासदार असे वेगळे कसे काय बोलतात? असा सवाल त्यांनी मोदींना केला. आता पुन्हा सत्ता आल्यावर हे देखील करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

शिराळा : पंतप्रधान मोदी घटना बदलायची नाही म्हणतात आणि खासदार असे वेगळे कसे काय बोलतात? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शिराळ्यात हातकणंगले लोकसभा उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी तोफ डागली. 

घटना बदलायची आहे असे मोदीचेच खासदार सांगतात

शरद पवार सभेला संबोधित करताना म्हणाले की, देशाची घटना बदलायची आहे असे मोदींचेच खासदार सांगतात. उत्तर प्रदेशमधील खासदार 400 पेशा जागा द्या, म्हणजे घटना बदलता येईल असे म्हणाले. मोदी घटना बदलायची नाही म्हणतात आणि खासदार असे वेगळे कसे काय बोलतात? असा सवाल त्यांनी मोदींना केला. आता पुन्हा सत्ता आल्यावर हे देखील करू शकतात, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्वांनी मविआला मदत करण्याची गरज असून मविआचे खासदार संसदेत जास्तीत जास्त गेले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. 

ते पुढे म्हणाले की,या देशात वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. देश मोदींच्या हातात गेला आहे. 2014 मध्ये सत्तेतवर आले तेव्हा पेट्रोलचे दर कमी करू असे म्हटले होते. त्यावेळी 71 रुपये असणारा दर आता शंभर रुपयांच्या वर गेले आहेत. सिलेंडरचे दर कमी करू म्हटले, पण ते ही दर कमी झाले नाहीत. त्यांनी सांगितले की, दिल्लीचा मुख्यमंत्री चांगले काम करून देखील आज तुरुंगात आहे, दिल्लीचा चेहरा केजरीवाल यांनी बदलला. अटक करण्याची काय आवश्यकता होती? आपण हुकुमशाहीच्या दिशेने चाललो आहे का? विचारणा त्यांनी केली.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मागे महाराष्ट्र ताकद लावतोय

दरम्यान, या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, ही निवडणूक आपण जिंकू शकतो. सत्यजित पाटील विजयी होतील हा विश्वास लोक देत आहेत. देशातील परिस्थिती पाहत असून शरद पवार यांना प्रतिसाद मिळत आहे.  शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मागे महाराष्ट्र आपली ताकद लावत असल्याचे म्हणाले.  

जयंत पाटील यांनी सांगितले की, मतदान झालेल्या ठिकाणी मविआच्या बाजूने निकाल लागेल असा अंदाज आहे. सत्यजित पाटील यांना शिराळा, वाळवा तालुक्यात चांगले मताधिक्य मिळेल. ते पुढे म्हणाले की, मोदींमुळे नव्हे तर पवारांमुळेच एफआरपी वाढली आहे. शरद पवार कृषिमंत्री झाले तेव्हा ऊस उत्पादकांसोबत एक फॉर्म्युला तयार केला आहे. ज्यामुळे दरवर्षी एफआरपी वाढत आहे. भाजपने शेती उत्पादनाबाबत अडचणी आणल्या आणि कमी म्हणून शेती अवजारावर कर लावल्याचा टीकाही त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा
Nashik Mahanagarpalika Election 2026: नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, शहर सरचिटणीस अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात; आमदार अन् शहराध्यक्षांवर सनसनाटी आरोप, म्हणाले, गिरीश महाजन...
नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, शहर सरचिटणीस अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात; आमदार अन् शहराध्यक्षांवर सनसनाटी आरोप, म्हणाले, गिरीश महाजन...
BMC Election 2026: मोठी बातमी : नील सोमय्याविरुद्ध दोन्ही ठाकरेंचा एकही उमेदवार नाही, भाजपचा विजय जवळपास निश्चित, किरीट सोमय्या म्हणाले, God is Great!
मोठी बातमी : नील सोमय्याविरुद्ध दोन्ही ठाकरेंचा एकही उमेदवार नाही, भाजपचा विजय जवळपास निश्चित, किरीट सोमय्या म्हणाले, God is Great!
टीआरपीचा फटका! अवघ्या 8 महिन्यांत प्रेक्षकांची लाडकी मालिका बंद होणार? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
टीआरपीचा फटका! अवघ्या 8 महिन्यांत प्रेक्षकांची लाडकी मालिका बंद होणार? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी : शिंदेंच्या उमेदवाराविरुद्ध ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, आमदारपुत्राची बिनविरोध निवड
मोठी बातमी : शिंदेंच्या उमेदवाराविरुद्ध ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, आमदारपुत्राची बिनविरोध निवड
Embed widget