एक्स्प्लोर

Sharad Pawar on PM Modi : मोदी घटना बदलणार नाही म्हणतात, मग खासदार वेगळं कसं काय बोलतात? शरद पवारांचा सवाल

पीएम मोदी घटना बदलायची नाही म्हणतात आणि खासदार असे वेगळे कसे काय बोलतात? असा सवाल त्यांनी मोदींना केला. आता पुन्हा सत्ता आल्यावर हे देखील करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

शिराळा : पंतप्रधान मोदी घटना बदलायची नाही म्हणतात आणि खासदार असे वेगळे कसे काय बोलतात? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शिराळ्यात हातकणंगले लोकसभा उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी तोफ डागली. 

घटना बदलायची आहे असे मोदीचेच खासदार सांगतात

शरद पवार सभेला संबोधित करताना म्हणाले की, देशाची घटना बदलायची आहे असे मोदींचेच खासदार सांगतात. उत्तर प्रदेशमधील खासदार 400 पेशा जागा द्या, म्हणजे घटना बदलता येईल असे म्हणाले. मोदी घटना बदलायची नाही म्हणतात आणि खासदार असे वेगळे कसे काय बोलतात? असा सवाल त्यांनी मोदींना केला. आता पुन्हा सत्ता आल्यावर हे देखील करू शकतात, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्वांनी मविआला मदत करण्याची गरज असून मविआचे खासदार संसदेत जास्तीत जास्त गेले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. 

ते पुढे म्हणाले की,या देशात वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. देश मोदींच्या हातात गेला आहे. 2014 मध्ये सत्तेतवर आले तेव्हा पेट्रोलचे दर कमी करू असे म्हटले होते. त्यावेळी 71 रुपये असणारा दर आता शंभर रुपयांच्या वर गेले आहेत. सिलेंडरचे दर कमी करू म्हटले, पण ते ही दर कमी झाले नाहीत. त्यांनी सांगितले की, दिल्लीचा मुख्यमंत्री चांगले काम करून देखील आज तुरुंगात आहे, दिल्लीचा चेहरा केजरीवाल यांनी बदलला. अटक करण्याची काय आवश्यकता होती? आपण हुकुमशाहीच्या दिशेने चाललो आहे का? विचारणा त्यांनी केली.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मागे महाराष्ट्र ताकद लावतोय

दरम्यान, या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, ही निवडणूक आपण जिंकू शकतो. सत्यजित पाटील विजयी होतील हा विश्वास लोक देत आहेत. देशातील परिस्थिती पाहत असून शरद पवार यांना प्रतिसाद मिळत आहे.  शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मागे महाराष्ट्र आपली ताकद लावत असल्याचे म्हणाले.  

जयंत पाटील यांनी सांगितले की, मतदान झालेल्या ठिकाणी मविआच्या बाजूने निकाल लागेल असा अंदाज आहे. सत्यजित पाटील यांना शिराळा, वाळवा तालुक्यात चांगले मताधिक्य मिळेल. ते पुढे म्हणाले की, मोदींमुळे नव्हे तर पवारांमुळेच एफआरपी वाढली आहे. शरद पवार कृषिमंत्री झाले तेव्हा ऊस उत्पादकांसोबत एक फॉर्म्युला तयार केला आहे. ज्यामुळे दरवर्षी एफआरपी वाढत आहे. भाजपने शेती उत्पादनाबाबत अडचणी आणल्या आणि कमी म्हणून शेती अवजारावर कर लावल्याचा टीकाही त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात! ऊसतोड कामगारांना 50 हजार घरे मिळणार, विक्रमी वेळेत काम पूर्ण
बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात! ऊसतोड कामगारांना 50 हजार घरे मिळणार, विक्रमी वेळेत काम पूर्ण
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण, सोन्याच्या दराची अपडेट काय, जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण, सोन्याच्या दराची अपडेट काय, जाणून घ्या नवे दर
IND vs AUS : विराट कोहली ॲडिलेडचा किंग, दमदार रेकॉर्डचा ऑस्ट्रेलियाला धसका, दुसऱ्या वनडेत टीम इंडिया कमबॅक करणार?
किंग कोहली ॲडिलेडचा राजा, विराटच्या रेकॉर्डचा ऑस्ट्रेलियाला धसका, टीम इंडिया कमबॅक करणार? 
WI vs BAN : वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम, पुरुष वनडे मॅचमध्ये 50 ओव्हर फिरकीपटूंनी टाकल्या, क्रिकेट इतिहासात पहिली घटना
ऐकावं ते नवल...वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम,  बांगलादेश विरुद्ध 300 बॉल फिरकीपटूंनी टाकले  
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati Fire: बारामतीतील भंगार गोदामाला भीषण आग, धुराच्या लोटामुळे वाहतुकीवर परिणाम
Nalasopara Fire: नालासोपारा पूर्वेकडील गोदामांना भीषण आग, चार गोदामं जळून खाक
UP BJP Leader: 'त्या तरुणाला जमिनीवर नाक घासायला लावलं', Meerut मधील भाजपा नेत्याची भररस्त्यात गुंडगिरी
Diwali Temple : विठ्ठल मंदिराला 2 टन फुलांची सजावट, शिर्डी-कोल्हापुरातही भाविकांची अलोट गर्दी
Maratha Reservation : 'सरकारचे कपडे फाडावे लागतील', मनोज जरांगेंचा शेतकऱ्यांसाठी नव्या आंदोलनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात! ऊसतोड कामगारांना 50 हजार घरे मिळणार, विक्रमी वेळेत काम पूर्ण
बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात! ऊसतोड कामगारांना 50 हजार घरे मिळणार, विक्रमी वेळेत काम पूर्ण
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण, सोन्याच्या दराची अपडेट काय, जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण, सोन्याच्या दराची अपडेट काय, जाणून घ्या नवे दर
IND vs AUS : विराट कोहली ॲडिलेडचा किंग, दमदार रेकॉर्डचा ऑस्ट्रेलियाला धसका, दुसऱ्या वनडेत टीम इंडिया कमबॅक करणार?
किंग कोहली ॲडिलेडचा राजा, विराटच्या रेकॉर्डचा ऑस्ट्रेलियाला धसका, टीम इंडिया कमबॅक करणार? 
WI vs BAN : वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम, पुरुष वनडे मॅचमध्ये 50 ओव्हर फिरकीपटूंनी टाकल्या, क्रिकेट इतिहासात पहिली घटना
ऐकावं ते नवल...वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम,  बांगलादेश विरुद्ध 300 बॉल फिरकीपटूंनी टाकले  
PHOTO : विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलाने सजले, परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला
PHOTO : विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलाने सजले, परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
Asia Cup Trophy : मोहसीन नक्वीचं नवं नाटक, BCCI च्या कोणत्याही प्रतिनिधीला ट्रॉफी देणार, भारत ICC कडे जाणार
बीसीसीआयच्या कोणत्याही प्रतिनिधीनं दुबईत यावं, माझ्या हातानं ट्रॉफी देतो, मोहसीन नक्वीचा नवा डाव, भारत ICC कडे दाद मागणार
Tata Trust : टाटा ट्रस्टमध्ये मतभेद असताना मोठी अपडेट, वेणू श्रीनिवास यांची आजीव ट्र्स्टी म्हणून निवड, मेहली मिस्त्रींचं काय होणार
टाटा ट्रस्टमध्ये मतभेद असताना मोठी अपडेट, वेणू श्रीनिवास यांची आजीव ट्र्स्टी म्हणून निवड
Embed widget