एक्स्प्लोर

महाराष्ट्रातील सरकारबाबत या आठवड्यात आम्हाला हवं असणारं नवं काहीतरी घडेल : रामदास आठवले

सध्याच्या वातावरणावरुन असं वाटतंय की या आठवड्यात काहीतरी नक्की घडेल, असे आठवले म्हणाले. आम्हांला हवं असणारं या आठवड्यात घडेल, अशी माझी माहिती आहे. माझी माहिती अशी आहे की मी दिलेल्या फॉर्म्युल्याचा विचार सुरू आहे, असेही आठवले म्हणाले.

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारबाबत या आठवड्यात आम्हाला हवं असणारं नवं काहीतरी घडेल, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. सोबतच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सावरकरांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे राहुल गांधींनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि माफी मागावी अशी मागणी  रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी कॉंग्रेसला सल्ला देत ते म्हणाले की, शिवसेनेसोबत इतके टोकाचे मतभेद असतील तर त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा काढून घ्यावा. तसेच शिवसेनेला देखील राहुल गांधींच्या वक्तव्याची आठवण करून देतं त्यांनी सरकारमधून बाहेर पडत भाजपसोबत सरकार बनवावं, असा सल्ला देखील दिला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सेनेने सरकार बनवलं आहे परंतु अद्याप त्यांना मंत्रिमंडळ बनवता न आल्याची टीका देखील त्यांनी केली. आठवले म्हणाले की, राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली. याला शिवसेनेने देखील विरोध केला आहे. ते नाराज आहेत. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही असं मला वाटतं. मला वाटतं भाजपने मी दिलेला तीन- दोन वर्षांचा फॉर्म्युला मान्य करावा. जर त्यांनी तो मान्य केला असता तर राज्यात आत्ता आमचं सरकार असतं. सध्याच्या वातावरणावरुन असं वाटतंय की या आठवड्यात काहीतरी नक्की घडेल, असे आठवले म्हणाले. आम्हाला हवं असणारं या आठवड्यात घडेल, अशी माझी माहिती आहे. माझी माहिती अशी आहे की, मी दिलेल्या फॉर्म्युल्याचा विचार सुरू आहे, असेही आठवले म्हणाले. शिवसेना आणि काँग्रेसची विचारधारा परस्पर विरोधी आहे. या पक्षांची युती अनैसर्गिक आहे. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करीत असताना शिवसेनेने मलूल भूमिका घेऊ नये. शिवसेना वाघाचा बच्चा आहे हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे, असे आठवले म्हणाले. शिवसेनेने काँग्रेसला धडा शिकविला पाहिजे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाघासारखी आहे. राहुल गांधींना इशारा देणारी डरकाळी शिवसेने आता फोडली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे. शिवसेनेने काँग्रेस सोबतचे सरकार बरखास्त केल्यास भाजप सोबत पुन्हा महाराष्ट्रात सरकार स्थापन करावे. शिवसेना भाजप महायुतीचे सरकारच स्थिर टिकाऊ सरकार ठरेल, असेही आठवले म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Update : आभाळ फाटलं, मुंबई तुंबली! राज्यात पावसाचा हाहाकार, कुठे झाडं पडली, तर कुठे रस्ते पाण्याखाली! मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
आभाळ फाटलं, मुंबई तुंबली! राज्यात पावसाचा हाहाकार, कुठे झाडं पडली, तर कुठे रस्ते पाण्याखाली! मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
भर पावसात दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी अंगलट, मारुती स्विफ्ट कार वाळूत बसली रुतून 
भर पावसात दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी अंगलट, मारुती स्विफ्ट कार वाळूत बसली रुतून 
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्याबाबत हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्याबाबत हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
Embed widget