एक्स्प्लोर

महाराष्ट्रातील सरकारबाबत या आठवड्यात आम्हाला हवं असणारं नवं काहीतरी घडेल : रामदास आठवले

सध्याच्या वातावरणावरुन असं वाटतंय की या आठवड्यात काहीतरी नक्की घडेल, असे आठवले म्हणाले. आम्हांला हवं असणारं या आठवड्यात घडेल, अशी माझी माहिती आहे. माझी माहिती अशी आहे की मी दिलेल्या फॉर्म्युल्याचा विचार सुरू आहे, असेही आठवले म्हणाले.

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारबाबत या आठवड्यात आम्हाला हवं असणारं नवं काहीतरी घडेल, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. सोबतच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सावरकरांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे राहुल गांधींनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि माफी मागावी अशी मागणी  रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी कॉंग्रेसला सल्ला देत ते म्हणाले की, शिवसेनेसोबत इतके टोकाचे मतभेद असतील तर त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा काढून घ्यावा. तसेच शिवसेनेला देखील राहुल गांधींच्या वक्तव्याची आठवण करून देतं त्यांनी सरकारमधून बाहेर पडत भाजपसोबत सरकार बनवावं, असा सल्ला देखील दिला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सेनेने सरकार बनवलं आहे परंतु अद्याप त्यांना मंत्रिमंडळ बनवता न आल्याची टीका देखील त्यांनी केली. आठवले म्हणाले की, राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली. याला शिवसेनेने देखील विरोध केला आहे. ते नाराज आहेत. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही असं मला वाटतं. मला वाटतं भाजपने मी दिलेला तीन- दोन वर्षांचा फॉर्म्युला मान्य करावा. जर त्यांनी तो मान्य केला असता तर राज्यात आत्ता आमचं सरकार असतं. सध्याच्या वातावरणावरुन असं वाटतंय की या आठवड्यात काहीतरी नक्की घडेल, असे आठवले म्हणाले. आम्हाला हवं असणारं या आठवड्यात घडेल, अशी माझी माहिती आहे. माझी माहिती अशी आहे की, मी दिलेल्या फॉर्म्युल्याचा विचार सुरू आहे, असेही आठवले म्हणाले. शिवसेना आणि काँग्रेसची विचारधारा परस्पर विरोधी आहे. या पक्षांची युती अनैसर्गिक आहे. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करीत असताना शिवसेनेने मलूल भूमिका घेऊ नये. शिवसेना वाघाचा बच्चा आहे हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे, असे आठवले म्हणाले. शिवसेनेने काँग्रेसला धडा शिकविला पाहिजे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाघासारखी आहे. राहुल गांधींना इशारा देणारी डरकाळी शिवसेने आता फोडली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे. शिवसेनेने काँग्रेस सोबतचे सरकार बरखास्त केल्यास भाजप सोबत पुन्हा महाराष्ट्रात सरकार स्थापन करावे. शिवसेना भाजप महायुतीचे सरकारच स्थिर टिकाऊ सरकार ठरेल, असेही आठवले म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Embed widget