एक्स्प्लोर

महाराष्ट्रातील सरकारबाबत या आठवड्यात आम्हाला हवं असणारं नवं काहीतरी घडेल : रामदास आठवले

सध्याच्या वातावरणावरुन असं वाटतंय की या आठवड्यात काहीतरी नक्की घडेल, असे आठवले म्हणाले. आम्हांला हवं असणारं या आठवड्यात घडेल, अशी माझी माहिती आहे. माझी माहिती अशी आहे की मी दिलेल्या फॉर्म्युल्याचा विचार सुरू आहे, असेही आठवले म्हणाले.

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारबाबत या आठवड्यात आम्हाला हवं असणारं नवं काहीतरी घडेल, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. सोबतच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सावरकरांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे राहुल गांधींनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि माफी मागावी अशी मागणी  रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी कॉंग्रेसला सल्ला देत ते म्हणाले की, शिवसेनेसोबत इतके टोकाचे मतभेद असतील तर त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा काढून घ्यावा. तसेच शिवसेनेला देखील राहुल गांधींच्या वक्तव्याची आठवण करून देतं त्यांनी सरकारमधून बाहेर पडत भाजपसोबत सरकार बनवावं, असा सल्ला देखील दिला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सेनेने सरकार बनवलं आहे परंतु अद्याप त्यांना मंत्रिमंडळ बनवता न आल्याची टीका देखील त्यांनी केली. आठवले म्हणाले की, राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली. याला शिवसेनेने देखील विरोध केला आहे. ते नाराज आहेत. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही असं मला वाटतं. मला वाटतं भाजपने मी दिलेला तीन- दोन वर्षांचा फॉर्म्युला मान्य करावा. जर त्यांनी तो मान्य केला असता तर राज्यात आत्ता आमचं सरकार असतं. सध्याच्या वातावरणावरुन असं वाटतंय की या आठवड्यात काहीतरी नक्की घडेल, असे आठवले म्हणाले. आम्हाला हवं असणारं या आठवड्यात घडेल, अशी माझी माहिती आहे. माझी माहिती अशी आहे की, मी दिलेल्या फॉर्म्युल्याचा विचार सुरू आहे, असेही आठवले म्हणाले. शिवसेना आणि काँग्रेसची विचारधारा परस्पर विरोधी आहे. या पक्षांची युती अनैसर्गिक आहे. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करीत असताना शिवसेनेने मलूल भूमिका घेऊ नये. शिवसेना वाघाचा बच्चा आहे हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे, असे आठवले म्हणाले. शिवसेनेने काँग्रेसला धडा शिकविला पाहिजे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाघासारखी आहे. राहुल गांधींना इशारा देणारी डरकाळी शिवसेने आता फोडली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे. शिवसेनेने काँग्रेस सोबतचे सरकार बरखास्त केल्यास भाजप सोबत पुन्हा महाराष्ट्रात सरकार स्थापन करावे. शिवसेना भाजप महायुतीचे सरकारच स्थिर टिकाऊ सरकार ठरेल, असेही आठवले म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चारही रस्त्यावर पाणी, उद्या 12वी बोर्डाचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस, सर्व पुस्तके भिजली .. पूरग्रस्त विद्यार्थ्यांमध्ये चिंता
चारही रस्त्यावर पाणी, उद्या 12वी बोर्डाचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस, सर्व पुस्तके भिजली .. पूरग्रस्त विद्यार्थ्यांमध्ये चिंता
Dhule Crime : बारावीचा फॉर्म भरण्यावरून मोठा वाद, पालकांकडून शाळेच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; धुळ्यातील धक्कादायक घटना
बारावीचा फॉर्म भरण्यावरून मोठा वाद, पालकांकडून शाळेच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; धुळ्यातील धक्कादायक घटना
इटालियन पंतप्रधानांच्या आत्मचरित्राला मोदींची प्रस्तावना; म्हणाले, ही मेलोनींची 'मन की बात', त्यांचं जीवन आपल्यासाठी प्रेरणा
इटालियन पंतप्रधानांच्या आत्मचरित्राला मोदींची प्रस्तावना; म्हणाले, ही मेलोनींची 'मन की बात', त्यांचं जीवन आपल्यासाठी प्रेरणा
39 कोटींच्या विम्यासाठी जन्मदात्या बापाला मारून टाकलं; पहिल्यांदा आईला मारून 22 लाख नंतर बायकोच्या मृत्यूनंतर 80 लाख विमा कंपन्यांकडून वसूल!
39 कोटींच्या विम्यासाठी जन्मदात्या बापाला मारून टाकलं; पहिल्यांदा आईला मारून 22 लाख नंतर बायकोच्या मृत्यूनंतर 80 लाख विमा कंपन्यांकडून वसूल!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चारही रस्त्यावर पाणी, उद्या 12वी बोर्डाचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस, सर्व पुस्तके भिजली .. पूरग्रस्त विद्यार्थ्यांमध्ये चिंता
चारही रस्त्यावर पाणी, उद्या 12वी बोर्डाचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस, सर्व पुस्तके भिजली .. पूरग्रस्त विद्यार्थ्यांमध्ये चिंता
Dhule Crime : बारावीचा फॉर्म भरण्यावरून मोठा वाद, पालकांकडून शाळेच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; धुळ्यातील धक्कादायक घटना
बारावीचा फॉर्म भरण्यावरून मोठा वाद, पालकांकडून शाळेच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; धुळ्यातील धक्कादायक घटना
इटालियन पंतप्रधानांच्या आत्मचरित्राला मोदींची प्रस्तावना; म्हणाले, ही मेलोनींची 'मन की बात', त्यांचं जीवन आपल्यासाठी प्रेरणा
इटालियन पंतप्रधानांच्या आत्मचरित्राला मोदींची प्रस्तावना; म्हणाले, ही मेलोनींची 'मन की बात', त्यांचं जीवन आपल्यासाठी प्रेरणा
39 कोटींच्या विम्यासाठी जन्मदात्या बापाला मारून टाकलं; पहिल्यांदा आईला मारून 22 लाख नंतर बायकोच्या मृत्यूनंतर 80 लाख विमा कंपन्यांकडून वसूल!
39 कोटींच्या विम्यासाठी जन्मदात्या बापाला मारून टाकलं; पहिल्यांदा आईला मारून 22 लाख नंतर बायकोच्या मृत्यूनंतर 80 लाख विमा कंपन्यांकडून वसूल!
Repo Rate : गृह आणि वाहन कर्ज पुन्हा स्वस्त होणार? आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची बैठक सुरु, रेपो रेट 'या' दिवशी जाहीर होणार
गृह आणि वाहन कर्ज पुन्हा स्वस्त होणार? आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची बैठक सुरु, रेपो रेट कधी जाहीर होणार?
Ind Vs Pak Asia Cup: संजय राऊतांनी भारत-पाक सामन्यावरुन रान उठवलं, पण उद्धव ठाकरेंचा एकेकाळचा राईट हँड असणाऱ्या नेत्याला मोह आवरला नाही, नेमकं काय घडलं?
संजय राऊतांनी भारत-पाक सामन्यावरुन रान उठवलं, पण उद्धव ठाकरेंचा एकेकाळचा राईट हँड असणाऱ्या नेत्याला मोह आवरला नाही, नेमकं काय घडलं?
Rinku Singh: आशिया कप फायनलचा विजयी चौकार ठोकणाऱ्या रिंकू सिंहला होणाऱ्या खासदार पत्नीकडून हटके स्टाईलने शुभेच्छा!
आशिया कप फायनलचा विजयी चौकार ठोकणाऱ्या रिंकू सिंहला होणाऱ्या खासदार पत्नीकडून हटके स्टाईलने शुभेच्छा!
Nashik Vadhvan Expressway : आनंदाची बातमी! नाशिक थेट वाढवण बंदराशी जोडले जाणार, फ्रेट कॉरिडॉर’ महामार्ग प्रकल्पाला मान्यता, औद्योगिक आणि शेती विकासासाठी 'गोल्डन रूट' ठरणार
आनंदाची बातमी! नाशिक थेट वाढवण बंदराशी जोडले जाणार, फ्रेट कॉरिडॉर’ महामार्ग प्रकल्पाला मान्यता, औद्योगिक आणि शेती विकासासाठी 'गोल्डन रूट' ठरणार
Embed widget