एक्स्प्लोर

Raj Thackeray: मराठी माणूस एकटवला तर काय होतं सरकारला कळालं, आमचा मोर्चा निघाला असता तर... राज ठाकरेंकडून मराठी जनतेचं अभिनंदन

Raj Thackeray News: हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रातील राजकीय पक्ष त्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची, यांनी आम्हाला पाठिंबा दिला.

Raj Thackeray Press conference: राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही जीआर महाराष्ट्र सरकारने रद्द केले किंवा त्यांना ते रद्द करायला भाग पाडलं. त्यासाठी मी महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेचे अभिनंदन करेन, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. हिंदी सक्तीचे जीआर रद्द करण्यासाठी सर्व बाजूने रेटा आला. आम्ही याविरोधात 5 जुलैला मोर्चा काढणार होतो. हा मोर्चा निघाला असता तर तो न भूतो न भविष्यती अशा स्वरुपाचा झाला असता. आज ज्यांचे वय 70 ते 75 आहे, त्या लोकांना संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता, असे राज यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात वातावरण निर्माण झाले होते. मराठी माणूस एकटवला तर काय होते, हे सरकारला कळाले. सरकार आता पुन्हा असल्या भानगडीत पडणार नाही, ही अपेक्षा आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे माझ्याकडे आले होते तेव्हा ते म्हणत होते, तुम्ही आमचं ऐकून तर घ्या. मी त्यांना तेव्हाच सांगितलं की, 'मी ऐकून घेईन, पण ऐकणार नाही'. या विषयात तडजोड करणार नाही . हे एकप्रकारचं स्लो पॉयझनिंग आहे. हळूहळू एखादी गोष्ट पेरायची, असा हिंदी सक्तीचा विषय होता. त्यांनी हा प्रयत्न केला, पण त्यांच्या अंगाशी आला. आता जीआर मागे घेतला. आता सरकार समिती नेमणार आहे. समितीच्या निर्णयाशी आम्हाला देणंघेणं नाही, पण परत ही गोष्ट होणार नाही. आम्ही कोणतीही गोष्टी मान्य करणार नाही. आम्ही जे शिक्षण घेतलं त्यामध्ये पाचवीनंतर आणि सहावीनंतर संस्कृत, हिंदी होतं. मुळात हिंदी आणण्याचा प्रयत्न का, यांना येतं म्हणून का?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Thackeray Brothers: ठाकरे बंधू एकत्र येणारच

राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेऊन ठाकरे बंधुंकडून 5 जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे प्रयोजन नष्ट केले होते. त्यामुळे राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली. याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, काल राज्य सरकारच्या निर्णयानंतर मला संजय राऊतांचा फोन आला. त्यांनी विचारलं, आपल्याला काय करायचं आहे? मी त्यांना म्हटलं की, मोर्चा तर रद्द करावा लागेल. त्यावर संजय राऊत म्हणाले की, विजयी मेळावा घेतला पाहिजे. मी त्याला होकार दिला. 5 तारखेला विजयी मेळावा घेऊयात, असेही बोललो. फक्त ठिकाण जाहीर नको करायला, असे मी संजय राऊतांना सांगितल्याचे राज यांनी म्हटले.

या विजयी मेळाव्याला पक्षीय लेबलं लावण्यात अर्थ नाही. हा मराठी माणसाचा विजय आहे. त्या दृष्टीकोनातून बघितलं पाहिजे. मात्र, मराठी प्रसारमाध्यमांनी आणि सगळ्यांनी हा विषय लावून धरला, याचा मनला आनंद आहे. अशाबाबतीत सर्वांनी जागृत असले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

आणखी वाचा

राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्याआधी सरकारने निर्णय रद्द केला; आदित्य ठाकरे म्हणाले, दोन भाऊ...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 May 2026: आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! श्रीविठ्ठलाच्या कृपेने आयुष्यात मोठे बदल, आजचे राशीभविष्य
आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! श्रीविठ्ठलाच्या कृपेने आयुष्यात मोठे बदल, आजचे राशीभविष्य
नांदेडमधील माष्टी गावात दोन गटांमध्ये वाद, 34 जणांवर गुन्हा दाखल, गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त 
नांदेडमधील माष्टी गावात दोन गटांमध्ये वाद, 34 जणांवर गुन्हा दाखल, गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त 
CBI च्या नव्या संचालकांच्या नियुक्तीवर महत्त्वाची बैठक, महाराष्ट्राच्या महासंचालकांचे नाव चर्चेत; राहुल गांधींचा विरोध, Note of Dissent सादर
CBI च्या नव्या संचालकांच्या नियुक्तीवर महत्त्वाची बैठक, महाराष्ट्राच्या महासंचालकांचे नाव चर्चेत; राहुल गांधींचा विरोध, Note of Dissent सादर
एअर इंडियानं उचललं मोठं पाऊल, तब्बल 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ, नेमकं कारण काय? 
एअर इंडियानं उचललं मोठं पाऊल, तब्बल 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ, नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget