![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Anil Patil : कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प राबविण्यासाठी 1032 कोटी रुपयांची तरतूद, मंत्री अनिल पाटलांची माहिती
कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प राबविण्यासाठी 1032 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
![Anil Patil : कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प राबविण्यासाठी 1032 कोटी रुपयांची तरतूद, मंत्री अनिल पाटलांची माहिती Provision of Rs 1032 crore to implement Konkan Disaster Project says Minister Anil Patal informed Anil Patil : कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प राबविण्यासाठी 1032 कोटी रुपयांची तरतूद, मंत्री अनिल पाटलांची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/1d947b10e30777c8d1df9a895b4b0fba1663418005936488_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Minister Anil Patil : रायगड (Raigad) जिल्ह्यातील दरडप्रवण गावे, पूरप्रवण गावांमध्ये उद्भवणाऱ्या आपत्कालीन व्यवस्थापनासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प राबविण्यासाठी 1032 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Minister Anil Patil) यांनी विधानपरिषदेत दिली. रायगड जिल्ह्यातील 355 गावांना पावसाळ्यात पूर आणि दरडी कोसळण्याचा धोका असल्याबाबत सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्री पाटील बोलत होते.
रायगड जिल्ह्यात वरिष्ठ भू-वैज्ञानिक तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार डोंगरमाथ्यावर व डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या 103 गावांना दरडीपासून धोका लक्षात घेता यामधील 9 अती धोकेदायक, 11 मध्यम स्वरुप धोकेदायक आणि 83 कमी धोकादायक, अशी गावे आहेत. यामधील दरडप्रवण गावे, पूर प्रवण गावे, या ठिकाणी आपत्कालीन बाब उद्भवल्यास तात्पुरत्या स्थलांतरासाठी शाळा, समाजमंदिरे इत्यादी ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली असल्याची अनिल पाटील म्हणाले.
रायगड जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये 24/7 तास तालुका नियंत्रण कक्ष कार्यान्वित
आपत्तीस तत्काळ प्रतिसाद देण्याकामी गावनिहाय तलाठी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी सेवक, कोतवाल, पोलीसपाटील, आपदा मित्र, सखी, स्थानिक स्वयंसेवी संस्थामधील सदस्य मिळून पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच कोणत्याही आपत्तीस तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये 24/7 तास तालुका नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच आपत्कालीन व्यवस्थापनासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प राबविण्यासाठी 1032 कोटी रुपयांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यात 211 दरडप्रवण गावे आहेत. या गावातील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी 300 प्रशिक्षित आपदा मित्र नेमण्यात आले आहेत. सर्व गावांमध्ये नोडल ऑफिसर नेमण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
CM Eknath Shinde : दरड कोसळण्याच्या घटनांवर मुंबई IIT उपाययोजना सुचवणार, मुख्यमंत्र्यांची माहिती; मुंबई-पुणे महामार्गावरील आडोशी बोगद्याची केली पाहणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)