एक्स्प्लोर

महाबीज बियाणांची दरवाढ तात्काळ मागे घ्या : विखे पाटील

मुंबई : दुष्काळात शेतकरी होरपळत असताना, महाबीजने केलेली बियाणांची दरवाढ अन्यायकारक आणि जखमेवर मीठ चोळणारी आहे. ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. एबीपी माझाच्या वेबसाईटवर याबाबतची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर, राजकीय वर्तुळाने याची तातडीने दखल घेतली आहे.   ऐन हंगामात शेतकऱ्यांना दणका शेतकऱ्यांसाठी स्वस्त आणि रास्त दरात बियाणे उपलब्ध करून देण्याचं हक्काचं ठिकाण म्हणून राज्य बियाणे महामंडळ अर्थातच महाबीजची ओळख आहे. पण शेतकऱ्यांच्या हक्काच्या या महामंडळाने यावर्षी ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. महाबीजने डाळवर्गीय बियाण्यांमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी दरवाढ केली आहे.   बाजारात सर्वच खाजगी बियाणे विक्रेत्यांनी बियाण्यांत दरवाढ केली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्याऐवजी सरकार शेतकऱ्यांकडूनच नफा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांमधून या भाववाढीचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.   पीक विम्याआधी बियाण्यांची दरवाढ मागच्या वर्षीच्या खरीप हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बियाण्याला केलेला खर्चदेखील निघाला नव्हता. शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमादेखील अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. राज्यासाठी मंजूर झालेल्या पीकविम्याचं वाटप अनेक ठिकाणी अजून चालूच आहे.   सरकारने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना युद्धपातळीवर पीक विमा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याऐवजी महाबीज या सरकारी संस्थेने संधीचं सोनं करण्याचे प्रयत्न सुरु केलं आहेत.   डाळीचे वाढते भाव पाहता शेतकऱ्यांचा यावर्षी तूर, उडीद, मूग अशा डाळवर्गीय पिकांकडे कल आहे. मात्र बाजारात डाळवर्गीय बियाण्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे महाबीजने शेतकऱ्यांच्या या गरजेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.   बियाण्यांमध्ये झालेली दरवाढः   सोयाबीनः सोयाबीन बियाण्याच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. जेएस-335 या वाणाची 30 किलोची किंमत पूर्वी 1875 रुपये होती तर आता ती 2040 रुपये आहे. सोयाबीनच्या जेएस-9305 या वाणामध्येही 375 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शिवाय इतर वाणांची देखील दरवाढ करण्यात आली आहे.   मूगः मूगाच्या जवळपास सर्वच वाणांमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. कोपरगाव वाणाच्या किंमतीत किलोमागे 75 रुपयांची वाढ केली आहे, तर उत्कर्ष वाणाच्या 5 किलोमागे 300 रुपये दरवाढ केली आहे.   उडीदः उडीदाच्या टीएयू-1 या वाणाच्या 5 किलोमागे 600 रुपये दरवाढ केली आहे.   तूरः डाळीच्या वाढत्या मागणीमुळे शेतकरी यावर्षी तूर पिकाकडे वळल्यामुळे तुरीच्या बियाण्यांचा बाजारात मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तुरीचा आयसीपी 8863 हा वाण प्रति किलो 80 रुपयांनी महागला आहे. तर बीडीएन 708 हा वाण प्रति दोन किलोमागे 190 रुपयांनी महागला आहे.   हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर बळीराजा खरीप हंगामासाठी पावसाची अतुरतेने वाट पाहत आहे. गेल्या चार वर्षांच्या दुष्काळात अनेक शेतकऱ्यांचा बियाण्याचा खर्च देखील निघालेला नाही. त्यातच महाबीजने अचानक केलेल्या या दरवाढीमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.

संबंधित बातमी 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli-Rohit Sharma : निवृत्तीतून कमबॅक? विराट-रोहितच्या रिटायरमेंटवर नवा ट्विस्ट; बीसीसीआयला धाडलं पत्र..., धक्कादायक सत्य आलं समोर
निवृत्तीतून कमबॅक? विराट-रोहितच्या रिटायरमेंटवर नवा ट्विस्ट; बीसीसीआयला धाडलं पत्र..., धक्कादायक सत्य आलं समोर
Hanuman Jayanti 2026 Wishes : 'जय बजरंगबली की जय'! हनुमान जयंतीनिमित्त मित्र परिवाराला द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा; पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
'जय बजरंगबली की जय'! हनुमान जयंतीनिमित्त मित्र परिवाराला द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा; पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय
राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय
Zim vs Ind T20I Series Schedule : BCCI कडून झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेसाठी तारखा जाहीर; टीम इंडिया कधी, कुठे अन् किती सामने खेळणार? वाचा संपूर्ण Schedule
BCCI कडून झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेसाठी तारखा जाहीर; टीम इंडिया कधी, कुठे अन् किती सामने खेळणार? वाचा संपूर्ण Schedule

व्हिडीओ

Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News: भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
Narhari Zirwal : माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
Mumbai News: एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
Mohammed Shami: फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय
राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय
Embed widget