एक्स्प्लोर

Unmanned boat In Pune: समुद्रातील शत्रूंचा खात्मा अन् प्रत्येक हालचाली बसल्याजागी मिळणार! मानव विरहित बोटींमुळं हे शक्य होणार

मानव विरहित बोट इलेक्ट्रिक आणि मोटारवर चालते. समुद्रात पंचवीस किलोमीटरचं अंतर ती कापू शकते. एकावेळी दहा ते बारा तास ती प्रवास करते. शिवाय शत्रूंना या बोटीचा थांगपत्ता लागू नये, यासाठी विशेष तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे.

Unmanned boat In Pune:  भारताच्या सागरी सीमांवर शत्रू आलेत  आणि या शत्रूंचा खात्मा आपण बसल्याजागी करू शकलो तर किंवा समुद्रातील प्रत्येक हालचाल एका ठिकाणी बसून मिळाली तर ही अतिशयोक्ती वाटत असली तरी मानव विरहित बोटींमुळं हे शक्य होणार आहे. रायगड जिल्ह्यात संशयित बोट आढळल्याची घटना असो किंवा 26/11 सारख्या हल्ल्याची आलेली धमकी असो. या घटना पाहता पुन्हा एकदा सागरी सीमांच्या सुरक्षेचं आव्हान भारतासमोर उभं ठाकलं आहे. हे आव्हान मानव विरहीत बोटींमुळं पेलता येणार आहे. 

रायगड जिल्ह्यात संशयित सशस्त्र बोट आढळल्याने देशात खळबळ उडाली. तर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करणार असा धमकीचा संदेश येताच मुंबईतील समुद्रांना सागर कवच लावण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत जर भारताच्या सैन्य दलात मानव विरहित बोट दाखल झाली आणि त्या बोटीने समुद्रातील प्रत्येक हालचाल आणि वेळ पडल्यास शत्रूचा खात्मा करण्यासाठी बसल्याजागी मदत केली तर सगळे संकटं दूर होतीस. ही अतिशयोक्ती नाही तर हे आता शक्य होणार आहे. पुण्यातील सागर डिफेन्स इंजिनियरिंग कंपनीने अशा मानव विरहित बोटची निर्मिती केली आहे.

बोटीत नेमकं काय विशेष आहे?
सर्व्हीलंस कॅमेरा आणि शस्त्रासह सुसज्ज असणारी ही मानव विरहित बोट समुद्रात सोडली की तिच्यावर रिमोट, कॉम्प्युटर आणि सॅटेलाईटद्वारे नियंत्रण मिळवता येतं. ही बोट ज्या ठिकाणी पाण्यावर तरंगते त्या परिसरातील एक किलोमीटरचा 360 डिग्री व्ह्यू आपल्याला टेहळता येतो. अशावेळी जर एखादी संशयित बोट अथवा हल्लेखोर आढळले तर या कॉम्प्युटरच्या साह्याने त्यांच्यावर फायरिंग करता येतं. यामुळं भारतावर एखादा संभाव्य धोका निर्माण झाला तर तो या तंत्रज्ञानामुळं जागच्याजागी टळू शकतो.

मानव विरहित बोट इलेक्ट्रिक आणि मोटारवर चालते. समुद्रात पंचवीस किलोमीटरचं अंतर ती कापू शकते. एकावेळी दहा ते बारा तास ती प्रवास करते. शिवाय शत्रूंना या बोटीचा थांगपत्ता लागू नये, यासाठी विशेष तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. समुद्रात एखादी दुर्घटना घडली आणि त्यात मनुष्य अडकला तर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सुद्धा या बोटीचा उपयोग होणार आहे.

मानव विरहित ड्रोनने हल्ले झाल्याचं आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे पण आता मानव विरहित बोटींमुळं शत्रूंवर निशाणा साधनं या तंत्रज्ञानामुळं शक्य होणार आहे. भारताच्या सागरी सीमांना नेहमीच सुरक्षेचं आव्हान राहिलं आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळं हे आव्हान पेलताना आपल्या भारतीय सैन्यांना मदत होणार आहे. त्यामुळं भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा आहे.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
Embed widget