एक्स्प्लोर

शरद पवारांचे म्हणणे खरे करुन दाखवले; विकास लवांडेंवरील हल्ल्यानंतर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, दावनेंकडूनही निषेध

सुषमा अंधारे यांनी ट्विट करुन विलास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे शरद पवारांचे वक्तव्य सत्य असल्याचं उघड झाल्याच म्हटलं.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lawande Attack) यांच्यावर स्वत:ला वारकरी, महाराज म्हणणाऱ्या संग्राम भंडारे यांच्याकडून शाईफेक हल्ला केल्याची घटना घडली. यावेळी आपणास धमकीही देण्यात आल्याचे लवांडे यांनी म्हटले. या शाईफेकीचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यानंतर, शाईफेक करणारे संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे या घटनेवरुन राजकीय वातावरणही तापलं आहे. मंत्री नितेश राणे आणि आमदार संग्राम जगताप यांनी संग्राम भंडारेंचं समर्थन केलंय. तर, महाविकास आघाडीतील नेत्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी विकास लवांडेंचं अभिनंदन केलंय. 

सुषमा अंधारे यांनी ट्विट करुन विलास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे शरद पवारांचे वक्तव्य सत्य असल्याचं उघड झाल्याच म्हटलं. सुषमा अंधारे म्हणाल्या की, कामक्रोधमधमोहमत्सर या पासून संत संप्रदाय प्रचंड लांब असतो. संत तुकोबाराय संत ज्ञानेश्वर यांचा सांप्रत समाजाने अतोनात छळ केला मात्र उपरोक्त संतांनी कधीही कुणाचे अहित चिंतले नाही. माणूस विकार मुक्त झाला पाहिजे यासाठी ते कायम सम्यक विचार मांडत राहिले. आज आपल्या सोबत जे काही आळंदीत घडले हा एका अर्थाने आपला विजय आहे. कारण वारकरी संप्रदायाच्या नावाखाली झालेली घुसखोरी आणि ज्यांना वारकरी संप्रदायाचा नेमका विचारच कळला नाही अशा नकली लोकांचे बुरखे फाडण्यात आपण यशस्वी झाला, असे सुषमा अंधारे यांनी म्हटलं.        

शरद पवारांचे म्हणणे खरे ठरले (Sushma andhare on vikas lawande)

वारकरी संप्रदायामध्ये हिंसक विचारांच्या लोकांची घुसखोरी झाली आहे हे पवार साहेबांचे म्हणणे या मंडळींनी पुन्हा एकदा खरे करून दाखवले. आता आपण अजून एक काम करूया. अशा लोकांवर पोलीस कारवाई व्हावी किंवा कायदेशीर त्याच्यावर गुन्हे दाखल  व्हावे अशी कुठलीही अपेक्षा मागणी आपण कुणीही करू नये. कारण जिथे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा एफ आय आर लिहून घेतला जाऊ शकत नाही आणि यावर त्यांच्याच पत्नी असणाऱ्या उपमुख्यमंत्री, किंवा खासदार मुलगा , चकार शब्दाने बोलू शकत नाही अशा राज्यात आपण आपली एफ आय आर व्हावी यासाठी प्रयत्न करणे शुद्ध वेडेपणा आहे. 
       
उलट जे जे लोक अशा पद्धतीच्या कृती करतात त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या समारंभांमध्ये पहिल्या रांगेच्या खुर्च्यांमध्ये बसवावे.  त्यांचे पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन सत्कार समारंभ घडवून आणावेत. शक्य झालं तर सत्तेतल्या काही लाभाच्या जागा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देता येतात का? हे सुद्धा बघावे. प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकणारे असतील किंवा हनुमंत पवारला मारहाण करणारे असतील किंवा तुम्हाला दहापेक्षा दाखवणारे लोक असतील अशा सगळ्या लोकांना अधिकाधिक राजाश्रय कसा मिळेल आणि त्यांचा सत्कार सन्मान कसा होईल यासाठी उलट आपण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे सगळे मिळून मागणी करूया, असे सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

विकास लवांडेंची भूमिका योग्य, दानवेंकडून समर्थन

विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा प्रकार चुकीचा आहे, विकास लवांडे यांची भूमिका चुकीची नाही. वारकरी संप्रदाय हा वेगळ्या विचारांचा संप्रदाय आहे. मात्र, आत्ताच्या घडीला वारकरी संप्रदायात काही प्रतिगामी शक्ती आल्या आहेत, त्यांना सगळे समान असायला हवे. संताची भूमिका आता सांभाळली जात नाही, या भूमिकेत काही चूक वाटत नाही, असे म्हणत अंबादास दानवे यांनी विलास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेचा निषेध करत लवांडे यांचं समर्थन केलंय. वारकरी संप्रदायातील अनेकजण भाजपची चाकरी करतात, असेही दानवे यांनी म्हटलं.  

हेही वाचा

विकास लवांडे शाईफेक प्रकरणात पोलिसांची पहिली मोठी कारवाई; संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यावर गुन्हा दाखल

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri Crime liquor poisoning: पोलिसांकडे वारंवार तक्रारी, मात्र हप्ते मिळत असल्याने केवळ नावाला कारवाई; पुण्यातील दारुकांड प्रकरणी स्थानिकांचा गंभीर आरोप
पोलिसांकडे वारंवार तक्रारी, मात्र हप्ते मिळत असल्याने केवळ नावाला कारवाई; पुण्यातील दारुकांड प्रकरणी स्थानिकांचा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यानांही लक्ष घालण्याची विनंती
Pimpri Crime liquor poisoning: पुण्यात हादरवणारं दारुकांड! उद्योगनगरी हादरली, 13 मृत्यू, सख्ख्या भावांनी गमावला जीव, वडिलांनी डोळे गमावले
पुण्यात हादरवणारं दारुकांड! उद्योगनगरी हादरली, 13 मृत्यू, सख्ख्या भावांनी गमावला जीव, वडिलांनी डोळे गमावले
Pimpri Crime liquor poisoning: पुण्यातील विषारी दारुकांड नेमकं उघडकीस कसं आलं, आतापर्यंत किती मृत्यू? A टू Z माहिती
पुण्यातील विषारी दारुकांड नेमकं उघडकीस कसं आलं, आतापर्यंत किती मृत्यू? A टू Z माहिती
Devendra Fadnavis on Pune Alcohol Case: पुण्यात विषारी दारूमुळे 13 जणांचे बळी, देवेंद्र फडणवीसांचे कडक कारवाईचे निर्देश; म्हणाले...
पुण्यात विषारी दारूमुळे 13 जणांचे बळी, देवेंद्र फडणवीसांचे कडक कारवाईचे निर्देश; म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
Loan vs Investment : कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
Embed widget