एक्स्प्लोर

Pune Water : दिलासादायक! शहराची पाण्याची चिंता मिटली; खडकवासला धरणक्षेत्रात पाणीसाठा वाढला, वाचा आजची आकडेवारी

Pune Water : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहराची पिण्याची पाण्याची चिंता आता मिटली आहे. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

पुणे: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहराची पिण्याची पाण्याची चिंता आता मिटली आहे. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस (Pune Rain) झाल्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली  आहे. खडकवासला धरणक्षेत्रातील वरसगाव, टेमघर आणि पाणशेत या धरण परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. धरण परिसरात झालेल्या चांगल्या पावसामुळे (Pune Rain) खडकवासला धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. 

हवामान विभागाने मुसळधार पावसाची (Pune Rain) शक्यता व्यक्त केल्यामुळे लवकरच धरणसाठी पुर्णत: भरण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणक्षेत्रात पाणीसाठा वाढल्याने पुणेकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. खडकवासला धरण क्षेत्रातील वरसगाव टेमघर पानशेत आणि चार धरणामध्ये आठवडाभरापासून झालेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढल्यामुळे पाण्याचं संकट कमी झालं आहे. 

खडकवासला क्षेत्रात आता 11.79 टीएमसी पाणीसाठा आहे. तर गेल्या वर्षी त्याच वेळी हा पाणीसाठा 9.52 टीएमसी इतका होता. पुणे शहराची पाण्याची चिंता मिटली असून  हवामान खात्याकडून अजूनही चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने लवकरच धरणसाठा पूर्णपणे भरेल अशी शक्यता आहे.

पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट 

आज पुणे शहराला पावसाचा पावसाचा (Pune Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह  पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्येही अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये घाट परिसरात अतिमुसळधार तर इतर भागांत मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज


मोसमी पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे सुरू असलेल्या जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. चालू आठवड्याच्या सुरूवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतल्याचं दिसून येत आहे. 

शेतीच्या कामांना वेग


पुण्यासह राज्याच्या काही काही भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणींच्या कामांना सुरूवात केल्याचं चित्र आहे. दरम्यान, अनेक भागात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. त्या भागात चांगल्या पावसाची गरज आहे. शेतकरी पावसाची प्रतिक्षा करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Pune Crime News: सोशल मीडियावरील ओळख झाली; पैसे कमावण्याच्या अमिषाला बळी पडले अन् 'सिया'ने पुण्यातील पोलीस पाटलाला 56 लाखांचा घातला गंडा, नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावरील ओळख झाली; पैसे कमावण्याच्या अमिषाला बळी पडले अन् 'सिया'ने पुण्यातील पोलीस पाटलाला 56 लाखांचा घातला गंडा, नेमकं काय घडलं?
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Embed widget