Pune Rain News: पुण्यातील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस, खडकवासला धरणातून पाणी सोडणार, नागरिकांना हायलअर्ट
Pune Rain: अनेक धरणं फुल झाली असून काही धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. मुठा नदीकाठी व नदीपात्राच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे.

Pune Rain News: पुणे शहरासह परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर खडकवासला धरण प्रशासनाने आज (दि. 19 ऑगस्ट 2025, मंगळवार) दुपारी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सोडला जाणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सकाळी सुरू असलेला 9,659 क्युसेक विसर्ग दुपारी 1 वाजता वाढवून 11,878 क्युसेक करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील बहुतेक धरणांमधली पाणी पातळी वाढली आहे. पुण्यासह परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाण्यासाठी झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर खडकवासला धरण प्रशासनाने मोठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, पुण्यातील बहुतांश धरण आता भरत आली आहेत. अनेक धरणं फुल झाली असून काही धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. मुठा नदीकाठी व नदीपात्राच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कसा राहतो त्यावर विसर्ग कमी किंवा अधिक केला जाऊ शकतो असे सांगण्यात आले आहे.
प्रशासनाच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
उपविभागीय अभियंता श्री. मोहन शां. भदाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून विसर्गात बदल करण्यात येऊ शकतो. पावसाचा जोर वाढल्यास आणखी पाणी सोडण्याची शक्यता आहे, तर पावसाचा जोर कमी झाल्यास विसर्ग कमी करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, पुणे शहरात आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून, काही भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुठा नदीलगत असलेल्या भागात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने आधीच सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातून वाढीव विसर्ग सोडल्याने नदीपात्रातील पाणीपातळी वाढणार असून, निचांकी भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी अनावश्यक धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे.
पुण्यात परिस्थिती नियंत्रणात; सतर्कतेचा इशारा – जिल्हाधिकारी
पुणे जिल्ह्यातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून सर्व यंत्रणा सतर्क आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. ते म्हणाले, “जर पाऊस असाच सुरू राहिला तर शहरातील काही ठिकाणी पुराची शक्यता आहे. धरणसाखळी क्षेत्रात पाऊस वाढला तर विसर्ग वाढवावा लागू शकतो.” शहरी भागात विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. पूर नियंत्रण रेषेत येणाऱ्या भागातील नागरिकांना गरज भासल्यास स्थलांतरित केले जाईल, असे डुडी यांनी स्पष्ट केले. खडकवासला धरणासह पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणांमधून पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने मुठा नदीकाठी राहणाऱ्यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पुणे महापालिका, पाटबंधारे विभाग व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
पुण्यातल्या इतर धरणांची परिस्थिती काय ?
पुण्यातील बहुतांश धरण आता भरत आली आहेत .काही धरण फुल झाली आहेत .चाकसमान, भाटघर, मुळशी, ठोकरवाडी ही धरण 100% भरली आहेत . पानशेत धरण 97.6% ने भरले आहे तर मीरा देवघर 97.90 तर डिंभे धरण 93.43% झालं आहे .






















