Pune Crime News : शाळेतून घरी आला, कपडे बदलून खेळायला गेला अन्..., नंतर शेतात संशयास्पद स्थितीत आढळली बॉडी, नेमकं काय घडलं?
Pune News : घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत साई मांजरे हा तळेगाव ढमढेरे येथील शाळेत शिक्षण घेत होता.

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात, (Pune News) हे अद्याप स्पष्ट झाले नसून मृत्यू झालेल्या मुलाच्या डोक्यावर खोल जखम आढळून आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत साई मांजरे हा तळेगाव ढमढेरे येथील शाळेत शिक्षण घेत होता. (Pune News). घटनेनंतर मुलाचा मृतदेह घटनास्थळावरून हलविण्यात आलेला नसून पंचनामा व पुढील तपास प्रक्रिया सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रशांत घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच वनविभागाची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून सर्व बाजूनी तपास केला जात आहे.(Pune News)
शाळेमधून घरी आला त्यानंतर कपडे बदलून खेळायला गेला
मिळालेल्या माहितीनुसार, साई मांजरे हा मुलगा शाळेमधून घरी आला त्यानंतर कपडे बदलून खेळायला गेला होता. त्यानंतर अचानक त्याचा मृतदेह शेतात सापडला. शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्तीत ही घटना घडली आहे. सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या घटनेने ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत. साई हा तळेगाव ढमढेरे येथील शाळेत शिक्षण घेत होता. (Pune News)
साईचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला, त्यावरून अनेक शंका
नेहमीप्रमाणे तो शाळेतून घरी आला. त्यानंतर कपडे बदलून तो खेळण्यासाठी शेताच्या दिशेने गेला होता. मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने शोधाशोध सुरू झाली. अखेर शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. साईचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला, त्यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अआहे. त्यामुळे ही हत्या असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच दहिवडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या घटनेचा पूर्ण उलगडा होत नाही आणि तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. जोपर्यंत दोषींना पकडले जात नाही, तोपर्यंत पोलीस प्रशासनाला सहकार्य करणार नसल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.






















