एक्स्प्लोर

Nirmala Sitaraman in Pune : सगळ्या पुणेकरांना... निर्मला सीतारमण यांनी केली मराठीतून भाषणाला सुरुवात, सभागृहात टाळ्यांचा कडकडाट

अर्थमंत्री निर्मला सीतारमण मराठीतून भाषण सुरु करत पुणेकारांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सगळ्या पुणेकर बंधू भगिनींना माझा नमस्कार, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणाला त्यांनी सुरुवात केली.

Nirmala sitaraman Pune : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitaraman) पुणे (Pune) आणि बारामती (Baramati) दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांसाठी बैठका आणि विविध योजना आखण्यासाठी त्याचा हा दौरा आहे. पुण्यात आल्यावर पहिल्याच दिवशी मराठीतून भाषण सुरु करत सगळ्या पुणेकारांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सगळ्या पुणेकर बंधू भगिनींना माझा नमस्कार, तुम्ही सगळे कसे आहात?, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणाला त्यांनी सुरुवात केली. त्यावेळी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात व्यवस्था परिवर्तनाची वीस वर्षे या विषयावर त्यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात कशाप्रकारे परिवर्तन केलं, याबाबत त्यांनी भाष्य केलं.

निर्मला सीतारामण या बारामतीचा दौरा करणार आहेत. ग्रामीण लोकांशी संवाद साधणार आहेत. बारामती, पुरंदर आणि शिरुर या भागातील लोकांसमोर त्या आपले विचार मांडणार आहेत. मात्र ग्रामीण भागातील जनतेला त्यांची भाषा सहजपणे समजेल, असा टोला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला होता. मात्र सीतारमण यांनी थेट मराठीतून भाषण सुरु करत त्यांनी सगळ्यांना धक्का दिला आहे. 

भारतात पद्म पुरस्काराला विशेष महत्व आहे. यापूर्वी हे पुरस्कार कोणालाही दिले जात होते. मात्र काही वर्षांपासून हा पुरस्कार उत्तम कामगिरी करणाऱ्यांना आणि महत्वाचं म्हणजे सर्वसामान्यांना दिले जात आहेत. देशातील जनतेचा विकासावर विश्वास आहे त्याचबरोबर मोदींवरही त्यांचा विश्वास आहे, असंही त्या म्हणाल्या. पंतप्रधान मोदींनी भारताला वेगळ्या उंचीवर नेले आहे. भारत भ्रष्टाचारमुक्त करण्यात त्याचा महत्वाचा वाटा आहे. काही वर्षांपूर्वी डिजीटल इंडियाचं धोरण आखलं होतं तेव्हा अनेक मंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र योग्य नियोजन करुन त्यांनी डिजीटल इंडियाचं धोरण पूर्ण केलं. त्यांच्यामुळे आता सगळं एका क्लिकवर उपलब्ध आहे, असंही म्हणत त्यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि विचार परिवार समन्वय यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली. ही बैठक धनकवडी येथील छत्रपती शिवराय मंगल कार्यालयात घेतली. आगामी निवडणुकीचं धोरणं आखण्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जाते. यात शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि काही स्वयंसेवक उपस्थित होते.

बारामती दौऱ्यादरम्यान जेजुरीचं दर्शन घेणार
उद्या सकाळी निर्मला सीतारमण जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिराला भेट देणार आहेत. देवस्थानच्या वतीने निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्याची तयारी सुरु केली आहे. निर्मला सीतारमण या जेजुरी संस्थानच्या पदाधिकऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यावेळी देवस्थानच्या वतीने निर्मला सीतारमण यांना निवेदन देण्यात येणार आहे. या निवेदनात जेजुरी गडाला पर्यटनाचा दर्जा मिळावा, वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळावा तसेच जेजुरी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबवाव्यात, अशी मागणी जेजुरी संस्थानच्या वतीने अर्थमंत्र्यांना करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Ajit Pawar and Jay Pawar: अजितदादांनी उद्घाटन केलेल्या 'त्या' सिटीस्कॅन मशीननेच शेवटी त्यांचा मृतदेह स्कॅन केला, जय पवारांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
अजितदादांनी उद्घाटन केलेल्या 'त्या' सिटीस्कॅन मशीननेच त्यांचा मृतदेह स्कॅन केला, जय पवारांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
Ajit Pawar Birth Anniversary: अजित पवारांची पहिली शासकीय जयंती; राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी, पिंपरी पालिकेत नेमकं काय घडलं?
अजित पवारांची पहिली शासकीय जयंती; राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी, पिंपरी पालिकेत नेमकं काय घडलं?
Rajendra Pawar : लाल दिव्याच्या गाड्या, पोहणं, फुफाट्यात लोळणं, घाबरवणं, रोहित दोन महिन्यांचा असताना....; अजितदादांसोबत जगलेलं बालपण ते आत्तापर्यंतचा काळ राजेंद्र पवारांनी सांगितला
लाल दिव्याच्या गाड्या, पोहणं, फुफाट्यात लोळणं, घाबरवणं, रोहित दोन महिन्यांचा असताना....; अजितदादांसोबत जगलेलं बालपण ते आत्तापर्यंतचा काळ राजेंद्र पवारांनी सांगितला

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Embed widget