एक्स्प्लोर
तुमच्या बदलीसाठी गरजेचं आहे ते सर्व करु, दिव्यांग डॉक्टरच्या पत्राला थेट मुख्यमंत्र्यांचं उत्तर

पुणे : दिव्यांग असलेल्या डॉ. अलकनंदा वैद्य यांच्या एका पत्राची दखल थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. दिव्यांग असूनही घरापासून तब्बल 100 किलोमीटरवर बदली केली जात असल्याच्या विरोधात डॉ. अलकनंदा यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी डॉ. अलकनंदा वैद्य यांची बदली योग्य ठिकाणी करण्याचं आश्वासनही दिलं आहे. डॉ. अलकनंदा यांच्या पत्राला हजारो जणांचा पाठिंबा डॉ. अलकनंदा वैद्य यांनी 'change.org' या वेबसाईटवर मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक पत्र स्वरुपात पेटिशन अपलोड केली. या पेटिशनला आतापर्यंत 83 हजार जणांना सपोर्ट केलं आहे. या पेटिशनची दखल आता थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन, योग्य ठिकाणी बदलीचं आश्वासन देत संबंधित अधिकाऱ्यांबाबत माहिती सांगण्याची विनंती केली आणि झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे. डॉ. अलकनंदा यांनी पत्रात काय म्हटलं आहे? "मी 90 टक्के दिव्यांग आहे आणि त्यांना माझ्याकडून रोज 100 किलोमीटर प्रवास अपेक्षित आहे. मी डॉक्टर आहे आणि एका मुलीची आईही आहे. मी प्रतिष्ठेने जगण्याचा प्रयत्न करत आहे. जवळपास 6 वर्षांपूर्वी एका घटनेनं माझं संपूर्ण आयुष्य बदललं. एका अपघातामुळे कंबरेखालील भाग निकामी झाला. मात्र, मी एक सक्षम स्त्री आहे आणि या संकटातूनही स्वत:ला सावरण्याचं ठरवलं. मला 11 वर्षांची मुलगी आहे आणि तिच्यासाठी मीच सर्वकाही आहे. मला माहितंय, तिच्यासाठी मला संघर्ष करावा लागणार आहे आणि त्यासाठी मी सक्षमही आहे. यातूनच मी सरकारी नोकरीसाठी अर्ज केला आणि सुदैवाने माझी निवडही झाली. सरकारी नोकरी मिळाल्यानं मला खूप आनंद झाला. कारण मी माझ्या मुलीला आर्थिकदृष्ट्या सपोर्ट करु शकते. मात्र, आता मला माझ्या मूळ घरापासून म्हणजेच पुण्यातून थेट बारामतीत म्हणजेच 100 किलोमीटर लांब बदली केली जातेय. जे माझ्यासाठी योग्य ठरणार नाही. मी पूर्णपणे अवलंबून असते. माझ्यासोबत कायम मदतनीस असते. तिच्या मदतीनेच उठते, बसते, बाथरुमला जाते. व्हिलचेअरच्या मदतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. माझी ज्या शहरात बदली केली जाणार आहे, त्या बारामतीत माझं कुटुंब नाही. माझ्या आई आणि मुलीपासून दूर करण्यासाठी एकप्रकारे जबरदस्तीच केली जातेय. शासनाच्या नियमांप्रमाणे दिव्यांग व्यक्तींची बदली ती राहत असलेल्या ठिकाणापूसन केवळ 10 किलोमीटरच्या अंतरातच व्हायला हवी. मी कायदेशीररित्या काही विनंत्या करुन पाहिल्या. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. मला तुमची मदत हवीय. मुख्यमंत्र्यांकडून डॉ. अलकनंदा वैद्य यांच्या पत्राची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अलकनंदा वैद्य यांच्या पत्राची दखल घेत, आपल्या ट्विटर हँडलवरुन डॉ. अलकनंदा यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे.
बदलीबाबत विनंती नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती देण्याची विनंती मुख्यमंत्री केली असून, उद्याच तुमची योग्य ठिकाणी बदली करतो, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. शिवाय, झाल्या प्रकाराची दिलगिरीही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
बदलीबाबत विनंती नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती देण्याची विनंती मुख्यमंत्री केली असून, उद्याच तुमची योग्य ठिकाणी बदली करतो, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. शिवाय, झाल्या प्रकाराची दिलगिरीही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आणखी वाचा
























