एक्स्प्लोर
Advertisement
लेखक उत्तम तुपे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून पाच लाखांची मदत
उत्तम बंडू तुपे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहेच पण उतारवयातील पॅरालिसिसमुळे त्यांची प्रकृतीही ढासळली आहे. त्यांच्या पत्नीलाही पक्षघात झाल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखीच भर पडली आहे. हे पैसे आम्हा दोघा नवरा-बायकोच्या आजारपणासाठी वापरणार असल्याचं उत्तम बंडू तुपे यांनी यावेळी सांगितलं.
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांच्या बिकट यांच्या हलाखीची परिस्थिती 'एबीपी माझा'ने जगासमोर आणल्यानंतर त्यांना आता मदतीचा ओघ सुरु झाला होता. राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी काल (17 जानेवारी) पुण्यातील त्यांच्या घरी भेट देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून पाच लाखांची मदत केली. त्यांना पाच लाख रुपयांचा चेक सुपूर्द करण्यात आला.
उत्तम बंडू तुपे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहेच पण उतारवयातील पॅरालिसिसमुळे त्यांची प्रकृतीही ढासळली आहे. त्यांच्या पत्नीलाही पक्षघात झाल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखीच भर पडली आहे. हे पैसे आम्हा दोघा नवरा-बायकोच्या आजारपणासाठी वापरणार असल्याचं उत्तम बंडू तुपे यांनी यावेळी सांगितलं.
'एबीपी माझा'च्या बातमीनंतर तुपे यांच्या मदतीसाठी अनेक व्यक्ती आणि संस्था पुढे येत आहेत. त्याआधी मातंग समाजातर्फे उत्तम बंडू तुपे यांना एक लाख रुपयांची मदत करण्यात आली. त्यांच्याकडे एका लाखांचा देण्यात आला आहे. या मदतीमुळे तुपे यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील अशी अपेक्षा आहे.
साहित्य अकादमीपासून अनेक पुरस्करांचे मानकरी ठरलेल्या उत्तम तुपे यांची राज्य सरकाराने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य म्हणून देखील निवड केली आहे. मात्र त्यांच्या हलाखीच्या परिस्थतीकडे मात्र कोणाचं लक्ष नाही.
समाजातील जळजळीत वास्तव, अनुभवांची दाहकता आयुष्यभर लेखणीवाटे साहित्यात उतरवणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांना उतारवयात मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. घरातील साहित्य कमी आणि त्यांनी लिहलेल्या साहित्यामुळे मिळालेल्या पुरस्कार आणि पदकांची संख्याच जास्त आहे. हे पुरस्कार नीट ठेवायलाही त्यांच्याकडे पुरेशी जागा नाही.
लेखक उत्तम तुपे यांना मातंग समाजातर्फे एक लाखांची मदत
आयुष्यभर सरकारी कार्यालयात शिपाई म्हणून काम करताना तुपेंनी लिहलेलं साहित्य त्यांना मान सन्मान तर भरपूर देऊन गेलं. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती मात्र काही बदलली नाही. त्यांनी लिहलेल्या पुस्तकांवरील रॉयल्टीही त्यांना प्रकाशकांकडून मिळत नसल्याचं ते सांगतात.
उत्तम बंडू तुपे यांची साहित्य संपत्ती
कादंबरी, कथा, नाटक अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील तब्बल 52 पुस्तके उत्तम तुपेंच्या नावावर आहेत. झुलवा, भस्म, आंदण, पिंड, माती आणि माणसं, काट्यावरची पोटं, लांबलेल्या सावल्या, शेवंती ही त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांपैकी काही नावं. झुलवा ही जोगतिणींच्या आयुष्यावरील कांदबरी लिहिण्यासाठी ते स्वतः वेष बदलून जोगतीण बनले आणि जोगतिणींच्या वाट्याला येणारे अनुभव त्यांनी कागदावर उतरवले.
भस्म या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा तर काट्यावरची पोटं या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य सरकारचा साहित्य सर्वोत्कृष्ट आत्मचरित्रासाठीचा पुरस्कारही मिळाला आहे. पण आज यापैकी एकही पुस्तक त्यांच्याकडे दाखवायला देखील नाही. तिसरीपर्यंत शिकलेल्या तुपेंनी लिहलेली पुस्तके विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवडली गेली. ती आठवून आजही जुने विद्यार्थी त्यांना भेटायला येतात.
पाहा स्पेशल रिपोर्ट
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement