एक्स्प्लोर

मी जळगावला नोकरी करायचे,  बाळासाहेबांभोवती गराडा असायचा, भेट व्हायची नाही, अंजली आणि प्रकाश आंबेडकरांची हटके Love Story

Prakash Ambedkar : अभिनेते संदीप कुलकर्णी आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांची एकत्रितपणे मुलाखत घेतली. यावेळी अंजली आंबेडकरांनी त्यांच्या लवस्टोरीबाबत अनेक खुलासे केले आहेत.

Prakash Ambedkar : मी जळगावला नोकरी करायचे, बाळासाहेबांभोवती गराडा असायचा, भेट व्हायची नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजली आंबडेकर यांच्या हटके लवस्टोरीची गोष्ट एका मुलाखतीदरम्यान अंजली आंबेडकर यांनी  सांगितली आहे. अभिनेते संदीप कुलकर्णी आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  आणि अंजली आंबेडकर (Anjali Ambedkar) यांची एकत्रितपणे मुलाखत घेतली. यावेळी अंजली आंबेडकरांनी त्यांच्या लवस्टोरीबाबत अनेक खुलासे केले आहेत. यावेळी प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजली आंबेडकरांसह सुजात आ़ंबेडकरांनी अनेक राजकीय गौप्यस्फोट केलेय. 

प्रश्न : सावित्रीसारखाच संघर्ष तुमच्या आयुष्यात आला का?

अंजली आंबेडकर (Anjali Ambedkar)  : आमच्या लग्नामुळे मला आंबेडकरी चळवळीचा भाग होता आलं याचं फार मोठं समाधान आणि आनंद

प्रश्न : या महाराष्ट्राला आतापर्यंत महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही. वंचितला सत्ता मिळाली तर तो चेहरा कोण असेल?. 

अंजली आंबेडकर : ज्या दिवशी वंचित घटकातील महिला मुख्यमंत्री बनेल तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस. (लोकांमधून अंजली आंबेडकरांचं नाव) 

प्रश्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असुनही एव्हढं साधं कसं वागता? 

प्रकाश आंबेडकर : यासंदर्भात लोकांचा दृष्टीकोन बदलणं आवश्यक आहे. मी वेगळा आहे हे वाटणं हे कृत्रिम जगणं.

प्रश्न : सध्या दहशतीचे वातावरण असतांना एक व्यक्तीच बोलत असतो. कोणतीही सुरक्षा नसते. 

प्रकाश आंबेडकर: तुमचं म्हणणं प्रामाणिक असेल. कोणता हेतू नसेल तर विरोधकही तुम्हाला स्विकारतात. मी स्वायत्त. माझा राजा मीच. नियम पाळणं हे मला जगण्यापुरते बाकी माझा राजा मीच. आपण स्पष्ट असलो तर कुणाचीच भिती बाळगण्याची गरज नाही. कलबुर्गी, दाभोळकर त्यांना जे वाटतं ते मांडायचे. शेवटी कुणाला पटत नाही म्हणून मांडणं थांबवायचे का?. शेवटी समाजामध्ये आपल्याला जे घडवावे वाटते ते घडवले पाहिजे. त्यासाठी किंमत मोजायलाही तयार असलं पाहिजे. त्यामुळे आपण लढत रहायचं हे ठरवलं.

प्रश्न : राज्यसभेचा खासदार म्हणून संसदेची पहिली पायरी चढतांना मनात काय भावना होती?. 

प्रकाश आंबेडकर : मी जेंव्हा संसदेमध्ये पाऊल ठेवणार होतो, तेंव्हा चालत गेलो. तेंव्हा संसदेची स्वत:ची सुरक्षा व्यवस्था होती. त्यांनी गेल्याबरोबर सुरक्षा रक्षकांनी स्वागत केल्यानं अवाक झालो. एक इतिहास समोर न्यावा लागेल अशी भावना होती. राज्यसभेच्या कार्पेटचा रंग लाल असल्याने त्याला लाल बावटा म्हणायचो. लोकसभेचा रंग हा हिरवा असल्याने तिथे जातांना ते नैसर्गिक अधिवासात आल्यासारखं वाटलं.

प्रश्न : संविधान योग्य लोकांच्या हाती आहे का?. सत्ताधारी-विरोधकांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं. 

प्रकाश आंबेडकर : दोघांचाही कामाबद्दल खुश नाही. दोघांमधील रेष पुसट. ही रेष कॉम्परमाईज झाल्यासारखं वाटतं.

प्रश्न : संविधान धोक्यात आहे का? 

प्रकाश आंबेडकर  : 1950 साली ज्या संघटनांनी संविधान मानत नाही, अशी भूमिका घेतली त्या संघटना आजही कार्यरत. त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं का?. सरदार पटेलांनी जी भिती व्यक्त केली ती भिती आजही आहे.  जरांगेंचं उपोषण सोडवायला न्यायधीश जात असेल हे वेगळे प्रकरण. ते समुहाचे प्रश्न घेऊन उपोषणाला बसले होते.

बाळासाहेबांच्या कुटुंबाचा संघर्ष?  (Prakash Ambedkar)

प्रकाश आंबेडकर   : माझे वडील, काका कधी दहावी पास झाले नाहीत. बाबासाहेबांच्या आंदोलनामुळे त्यांना अभ्यासाला कदाचित वेळ मिळाला नव्हता.

प्रश्न : एकत्र कुठला सिनेमा पाहिला. 

अंजली आंबेडकर (Anjali Ambedkar) : तो आठवत नाही. दोघांनीही मात्र शर्मिला टागोरचा एकही सिनेमा चुकवला नाही.

प्रश्न : घरात भांडणं होतात का?

अंजली आंबेडकर : टूटपेस्टची कॅप का लावली नाही येथपासून तर वंचितच्या निर्णयापर्यंत अनेक विषयांवर आम्ही भांडतो. अनेकदा सुजात आणि बाळासाहेबांमध्ये मुद्द्यांवर भांडणं होतात. ती अर्ध्या तासापेक्षा जास्त नसते.

प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ 

इतर महत्वाच्या बातम्या 

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, आमदार संजय शिरसाटांचा मोठा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget