एक्स्प्लोर

मी जळगावला नोकरी करायचे,  बाळासाहेबांभोवती गराडा असायचा, भेट व्हायची नाही, अंजली आणि प्रकाश आंबेडकरांची हटके Love Story

Prakash Ambedkar : अभिनेते संदीप कुलकर्णी आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांची एकत्रितपणे मुलाखत घेतली. यावेळी अंजली आंबेडकरांनी त्यांच्या लवस्टोरीबाबत अनेक खुलासे केले आहेत.

Prakash Ambedkar : मी जळगावला नोकरी करायचे, बाळासाहेबांभोवती गराडा असायचा, भेट व्हायची नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजली आंबडेकर यांच्या हटके लवस्टोरीची गोष्ट एका मुलाखतीदरम्यान अंजली आंबेडकर यांनी  सांगितली आहे. अभिनेते संदीप कुलकर्णी आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  आणि अंजली आंबेडकर (Anjali Ambedkar) यांची एकत्रितपणे मुलाखत घेतली. यावेळी अंजली आंबेडकरांनी त्यांच्या लवस्टोरीबाबत अनेक खुलासे केले आहेत. यावेळी प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजली आंबेडकरांसह सुजात आ़ंबेडकरांनी अनेक राजकीय गौप्यस्फोट केलेय. 

प्रश्न : सावित्रीसारखाच संघर्ष तुमच्या आयुष्यात आला का?

अंजली आंबेडकर (Anjali Ambedkar)  : आमच्या लग्नामुळे मला आंबेडकरी चळवळीचा भाग होता आलं याचं फार मोठं समाधान आणि आनंद

प्रश्न : या महाराष्ट्राला आतापर्यंत महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही. वंचितला सत्ता मिळाली तर तो चेहरा कोण असेल?. 

अंजली आंबेडकर : ज्या दिवशी वंचित घटकातील महिला मुख्यमंत्री बनेल तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस. (लोकांमधून अंजली आंबेडकरांचं नाव) 

प्रश्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असुनही एव्हढं साधं कसं वागता? 

प्रकाश आंबेडकर : यासंदर्भात लोकांचा दृष्टीकोन बदलणं आवश्यक आहे. मी वेगळा आहे हे वाटणं हे कृत्रिम जगणं.

प्रश्न : सध्या दहशतीचे वातावरण असतांना एक व्यक्तीच बोलत असतो. कोणतीही सुरक्षा नसते. 

प्रकाश आंबेडकर: तुमचं म्हणणं प्रामाणिक असेल. कोणता हेतू नसेल तर विरोधकही तुम्हाला स्विकारतात. मी स्वायत्त. माझा राजा मीच. नियम पाळणं हे मला जगण्यापुरते बाकी माझा राजा मीच. आपण स्पष्ट असलो तर कुणाचीच भिती बाळगण्याची गरज नाही. कलबुर्गी, दाभोळकर त्यांना जे वाटतं ते मांडायचे. शेवटी कुणाला पटत नाही म्हणून मांडणं थांबवायचे का?. शेवटी समाजामध्ये आपल्याला जे घडवावे वाटते ते घडवले पाहिजे. त्यासाठी किंमत मोजायलाही तयार असलं पाहिजे. त्यामुळे आपण लढत रहायचं हे ठरवलं.

प्रश्न : राज्यसभेचा खासदार म्हणून संसदेची पहिली पायरी चढतांना मनात काय भावना होती?. 

प्रकाश आंबेडकर : मी जेंव्हा संसदेमध्ये पाऊल ठेवणार होतो, तेंव्हा चालत गेलो. तेंव्हा संसदेची स्वत:ची सुरक्षा व्यवस्था होती. त्यांनी गेल्याबरोबर सुरक्षा रक्षकांनी स्वागत केल्यानं अवाक झालो. एक इतिहास समोर न्यावा लागेल अशी भावना होती. राज्यसभेच्या कार्पेटचा रंग लाल असल्याने त्याला लाल बावटा म्हणायचो. लोकसभेचा रंग हा हिरवा असल्याने तिथे जातांना ते नैसर्गिक अधिवासात आल्यासारखं वाटलं.

प्रश्न : संविधान योग्य लोकांच्या हाती आहे का?. सत्ताधारी-विरोधकांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं. 

प्रकाश आंबेडकर : दोघांचाही कामाबद्दल खुश नाही. दोघांमधील रेष पुसट. ही रेष कॉम्परमाईज झाल्यासारखं वाटतं.

प्रश्न : संविधान धोक्यात आहे का? 

प्रकाश आंबेडकर  : 1950 साली ज्या संघटनांनी संविधान मानत नाही, अशी भूमिका घेतली त्या संघटना आजही कार्यरत. त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं का?. सरदार पटेलांनी जी भिती व्यक्त केली ती भिती आजही आहे.  जरांगेंचं उपोषण सोडवायला न्यायधीश जात असेल हे वेगळे प्रकरण. ते समुहाचे प्रश्न घेऊन उपोषणाला बसले होते.

बाळासाहेबांच्या कुटुंबाचा संघर्ष?  (Prakash Ambedkar)

प्रकाश आंबेडकर   : माझे वडील, काका कधी दहावी पास झाले नाहीत. बाबासाहेबांच्या आंदोलनामुळे त्यांना अभ्यासाला कदाचित वेळ मिळाला नव्हता.

प्रश्न : एकत्र कुठला सिनेमा पाहिला. 

अंजली आंबेडकर (Anjali Ambedkar) : तो आठवत नाही. दोघांनीही मात्र शर्मिला टागोरचा एकही सिनेमा चुकवला नाही.

प्रश्न : घरात भांडणं होतात का?

अंजली आंबेडकर : टूटपेस्टची कॅप का लावली नाही येथपासून तर वंचितच्या निर्णयापर्यंत अनेक विषयांवर आम्ही भांडतो. अनेकदा सुजात आणि बाळासाहेबांमध्ये मुद्द्यांवर भांडणं होतात. ती अर्ध्या तासापेक्षा जास्त नसते.

प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ 

इतर महत्वाच्या बातम्या 

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, आमदार संजय शिरसाटांचा मोठा दावा

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर लिखित 'देवाभाऊ' या पुस्तकाचे प्रकाशन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर लिखित 'देवाभाऊ' या पुस्तकाचे प्रकाशन
Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
Embed widget