एक्स्प्लोर

NCP Crisis: पक्षाच्या अध्यक्षांनी नऊ मंत्र्याचं निलंबन केलं, मग विधानसभा अध्यक्ष कशाची वाट पाहत आहेत? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

Prithviraj Chavan: अजित पवार यांच्या बंडानंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Prithviraj Chavan On NCP Crisis: राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्या नऊ मंत्र्यांचं निलंबन केलं आहे, मग विधानसभा अध्यक्ष त्यांना अपात्र का ठरवत नाहीत असा सवाल करत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. विधानसभा अध्यक्ष कशाची वाट पाहत आहेत असा सवाल त्यांनी विचारला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करुन सत्ताधारी भाजपशी (BJP) हातमिळवणी केली. त्यानंतर लगेच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहेत, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नक्की काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? 

राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या गटात 36 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सिद्ध झाल्यास त्या गटाला दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. असं झालं तरच त्यांचं निलंबन रद्द होईल, असं कायदा सांगत असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले. आतापर्यंत फुटीर गटाकडे 36 आमदार दिसत नाहीत, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तर काही आमदार अटी टाकून फुटीर गटाकडे जात असल्याचंही ते म्हणाले.

पक्षाध्यक्षांकडून 9 आमदारांचं निलंबन

राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षांनी नऊ मंत्र्याचं निलंबन केलं आहे, मग विधानसभा अध्यक्ष कशाची वाट पाहत आहेत? असा सवाल करत हा संपूर्ण पक्षपातीपणा असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. फुटीर गटाकडे 36 आमदार नसतील तर मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सध्याच्या राजकारणात सुरू असलेलं प्रकरण हा फक्त राष्ट्रवादीचा प्रश्न नसून हा राज्याचा प्रश्न आहे, असं पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

आधी खोक्यांची भाषा, आता मंत्रीपदाची भाषा

विधानसभा अध्यक्षांना शिवसेना निलंबनाबाबत 10 ऑगस्टपर्यंत निकाल द्यावा लागणार आहे, असं देखील पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले. राज्यात वैध सरकार आहे की अवैध सरकार आहे हे यावरून ठरणार आहे, असंही ते म्हणाले. आधी खोक्यांची भाषा वापरली, आता आमदारांना पक्षात घेण्यासाठी मंत्रीपदाची भाषा वापरली जात असल्याचंही चव्हाण म्हणाले.

राज्याच्या प्रश्नाकडे कोणाचंच लक्ष नाही

सध्याचं राजकारण इतक्या खराब पातळीवर गेलं आहे की, राज्याच्या प्रश्नाकडे कोणाचंच लक्ष राहिलं नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. या सगळ्याला परिस्थितीला नरेंद्र मोदी (Narendra Modi) जबाबदार आहेत, असंही ते म्हणाले. सत्तेत राहण्यासाठी भ्रष्टाचार करणाऱ्यांना विविध पक्ष साथ देत असल्याचंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

हेही वाचा:

Highest Average Salary in India: सर्वाधिक पगाराच्या सर्व्हेमध्ये सोलापूर टॉपला, मुंबई आणि बंगळुरूलाही टाकलं मागे; पण वस्तूस्थिती वेगळीच दिसतेय

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget