एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : दोन तृतियांश खासदार घटनेत बदल करता येतात का यासाठी पाहिजेत, उद्धव ठाकरेंनी धाराशिवमध्ये संविधानातील बदलाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांना दोन तृतियांश खासदार घटनेत बदल करता येतो का ते पाहण्यासाठी हवे असल्याचं म्हटलं.

धाराशिव : उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील सभेत बोलताना ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला. याच सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील सरकारला दोन तृतियांश बहुमत मिळवून घटनेत बदल करता येतात का ते पाहायचं आहे, असा दावा देखील केला आहे. उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील सभेतून संविधान बदलाचा मुद्दा पुन्हा समोर आणला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला फुटलेल्या खासदारांबाबत काय निर्णय घेतात हे देखील पाहणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.  

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे काय म्हणाले?

भाजपला महाराष्ट्रात एकही स्वाभिमानी शिल्लक ठेवायचा नाही, हा स्वाभिमान केव्हा संपेल, जेव्हा शिवसेना संपेल, ठाकरे संपेल तेव्हा त्यांना मुक्तद्वार मिळेल ते एवढं करुन देखील ठाकरे का संपत नाहीत यासाठी फोडाफोडी सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे आमच्या ह्रदयात जोपर्यंत आहेत तोपर्यंत ठाकरे तुमच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी महाराष्ट्रातून, देशातून आणि कोणाच्या मनातून संपवू शकत नाहीत. आम्ही तुमच्याबरोबर जोडले गेलो आहोत,  म्हणून इतकी वर्ष होऊन, एवढी फोडाफोडी करुन सुद्धा शिवसेना का संपवावी लागते. 40 आमदार फोडले 9 खासदार आले. परत त्यातील 6 खासदार फोडले, मग समोर काय आहे, हे दिसतंय ते काय आहे.ही खरी शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आमदार, खासदारांच्या संख्येमध्ये मोजता येत नाही. ती घराघरात आणि मनामनामध्ये, ह्रदयात घर करुन बसलेली आहे. नुसती मन की बात करुन नाही चालत, दिल की बात करावी लागते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

राज्यघटनेत बदल करता येतात का त्यांना पाहायचंय: उद्धव ठाकरे

आतासुद्धा हे लटकणार आहेत. दोन दिवसांपूर्वी आपले दोन खासदार ओम बिर्लांना जाऊन भेटून आले आहेत. त्यांना घटनेचं एक पुस्तक दाखवलं आहे, त्याच्यातील एक नियम दाखवलं आहे. ते म्हणतात नऊ पैकी 6 झाले म्हणजे दोन तृतियांश झाले आहेत. माझ्या कानावर आलं त्यांचं कधीच ठरलं होतं, फक्त इथला जरा अडून बसला होता, कारण त्याला माहिती होतं, पाच झालेत, सहा झालेत तोपर्यंत दोन तृतियांश होत नाहीत, ताणून धरलं, भाव वाढवला मग गेला. कायद्यात जे लिहिलंय, घटनेत जे लिहिलंय, त्यानुसार दोन तृतियांश संख्येनं इकडून तिकडे गेले तरी पक्षात विलीन होण्याचा निर्णय पक्षानं घ्यावा लागतो आणि त्याला दोन तृतियांशनं पाठिंबा द्यावा लागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

आता पाहूया ओम बिर्ला काय करतात, लोकसभेवेळी आम्ही जे सांगत होतो त्यामुळं तुम्ही इथला खासदार निवडून दिलात. आता सुद्धा दोन तृतियांश बहुमत पाहिजे, कारण त्यांना घटना पायदळी तुडवायची होती. आता सुद्धा दोन तृतियांश बहुमत करुन घटनेत बदल करता येतात का हे त्यांना पाहायचं आहे, म्हणून त्यांना दोन तृतियांश बहुमत पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Thacekray: काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
Mumbai Pune Missing Link Land Slide: 13. 3 किमी रस्त्यांसाठी 7120 कोटींचा चुराडा; अरे प्रतिदिन 100 कोटींप्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते; मिंसिंग लिंकला भगदाड पडताच सुषमा अंधारेंनी गणित मांडलं
13. 3 किमी रस्त्यांसाठी 7120 कोटींचा चुराडा; अरे प्रतिदिन 100 कोटींप्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते; मिंसिंग लिंकला भगदाड पडताच सुषमा अंधारेंनी गणित मांडलं
Mumbai Local Train Rain: देवेंद्र फडणवीसांनी जी भीती बोलून दाखवली तेच घडलं, प्लॅस्टिक उडत आलं अन् ओव्हरहेड वायरवर पडलं, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
देवेंद्र फडणवीसांनी जी भीती बोलून दाखवली तेच घडलं, प्लॅस्टिक उडत आलं अन् ओव्हरहेड वायरवर पडलं, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
Devendra Fadnavis On Maharashtra Rain: रस्ते जलमय, नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली; मुंबई, पुण्यासह अनेक जिल्हे ठप्प; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं एकमेव कारण!
रस्ते जलमय, नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली; मुंबई, पुण्यासह अनेक जिल्हे ठप्प; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं एकमेव कारण!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Embed widget