एक्स्प्लोर

... तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला; निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर ठाकरे बंधूंची मागणी, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही सहमती

बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यातील घोळ आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

मुंबई : राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयुक्तांची (Election commission) भेट घेऊन मतदार यादी आणि बोगस नावावरुन आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर संवाद साधला. त्यानंतर, या सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, मतदार यादीसंदर्भातील घोळ संपुष्टात आल्याशिवाय आगामी निवडणुका घेऊ नका, अशी मागणी या नेत्यांनी केली. पत्रकार परिषदेत जयंत पाटील, राज ठाकरे (Raj Thackeray), बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मतदार याद्यातील (Voter list) घोळ आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत, भाजपला सुद्धा आम्ही पत्र दिलं होत, पण ते आले नाहीत. विधानसभा निवडणुका झाल्या त्याआधी नोव्हेंबर 2024 ला एक पत्र दिला होतं, त्यात भाजपची काही लोक मतदार याद्याशी खेळताय आणि हवे ते लोक घुसवाताय हे आम्ही सांगितलं होतं. आयुक्त म्हणून त्यांना अधिकार आहे की ते कटपुतळे आहेत, जे वरून त्यांना कोणी हलवतय, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. मी तर म्हणालोय इलेक्शन असं घ्यायचं असेल तर इलेक्शन न घेता सिलेक्शन करून टाका. पण, आम्ही हुकूमशाही सहन करणार नाही. राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला बाप कोण? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. कालच मतदार याद्याचा कार्यक्रम जाहीर केला, जोपर्यंत मतदार याद्या सुधारत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं आम्ही सांगितलं आहे. दोन्ही अधिकारी होते, त्यांनी आम्ही सांगितलं की, याचा सकारात्मक विचार करू, अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली. 117 आणि 124 वर्षे वयाची मतदार असतील, तर जगातील सर्वात चांगलं हवामान आपल्याकडे आहे. कारण दीर्घ आयुष्याचे मतदार इथं आहेत. निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे, त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास असला पाहिजे, नाहीतर हे मतदार हयात आहेत, पण त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतलेला आहे, डिलिट केलेला आहे. म्हणून, त्यांच्यावर सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

आणखी 6 महिने निवडणुका नाही झाल्या तर फरक पडत नाही - राज ठाकरे

5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत, आता आणखी 6 महिने त्या झाल्या नाहीत तर काय फरक पडतो? मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगांच्या प्रतिनिधींना भेटलो. आज राज्य आणि केंद्री निवडणूक आयगाच्या प्रतिनिदीना भेटलो. निवडणूक म्हटलं की, राजकिय पक्ष आले मतदार आले.निवडणूक आयोग हे फक्त निवडणूक घेतात मात्र राजकिय पक्ष ते लढवतात. मात्र राजकिय पक्षांना निवडणूक आयोग यादया दाखवत नसेल तर इकडे घोळ आहे, असं राज ठाकरे म्हणाले. 2024 नंतर यादी जाहीर केली यात नाव आहेत फोटो नाही. दोघांना भेटलो हे आमच्यात येत नाही असं सांगतात. मतदार यादया न दाखवून काय भेटणार आहे? या मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका, असं राज ठाकरेंनी सांगितले. 5 वर्ष निवडणूका झाल्या नाहीत, आणखी 6 महिने नाही झाल्या, तर काय फरक पडतो. उद्या-परवामध्ये काय निर्णय घेतात ते पाहू, नंतर सर्व आम्ही आमचा निर्णय सांगू, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

पुराव्यासह बोगस मतदारांचा लेखाजोखा मांडला - जयंत पाटील

आम्ही कालच राज्याचे निवडणूक आयुक्त यांना भेटून निवेदन दिलं, मतदार यादीतील अनंत चुका दाखवल्या. सीओंनी आम्हाला आश्वासित केलं की, केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून दुरुस्त्या केल्या जातील. दोघांचे प्रश्न म्हणून आम्ही आजही भेट घेतली, काही महत्वाच्या पुरावे सहीत आम्ही माहिती दिली. पुराव्यांसोबत पत्रही दिली, मतदार यादीत मतदारांचे पत्ते चुकीचे आहेत, प्रत्यक्षात मतदार त्या पत्यावर राहात नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी काही उदाहरणं देखील संदर्भासहीत दिली. त्यामध्ये, मुरबाडमध्ये बुथ क्र 8 मध्ये 400 मतदाराचं एक घरं आहे, तिथे डॅश आहे. वडनेरामध्ये कामटीमध्ये घर क्रमांकचं नाही. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार आहे. एपीक नंबर एकच असतो. मात्र मतदार यादीत अनेक असल्याचे आम्ही आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. नालासोपारामध्ये सुषमा गुप्ता महिलेचे नाव 6 वेळा नोंदवले आहे, 12 ऑगस्टला आमच्या कार्यकर्त्याने हे दुपारी दाखवलं. त्यानंतर, 6 वाजता त्या महिलेचे नाव काढलं, आपण एका चॅनेलमधून बातमी दाखवतो दुपारी 3 वाजता ती नावं असतात, पण 6 वाजता नावं काढतात. निवडणूक आयोगाला आम्ही विचारलं ही नावं कोणाच्या सांगण्यावर काढली, तक्रार कोणी केली. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचं सर्वर दुसरं कोणी तरी चालवतो. राज्य किंवा केंद्राच्या हातात ही यंत्रणा नसून बाहेरूनच कोणी तरी हे चालवतं आहे. पुण्यात 869 मतदारांची नोंद आहे, दर तासाला मतदार यादी जाहीर होत कोणी कुठे किती मतदान केलं, विधानसभेला हे सिस्टम तोडलं, थेट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मतदान टक्केवारी जाहीर केली. आम्ही विधानसभेला याद्या वाचल्या, हेच स्थानिक स्वराज्य संस्था निवणुकीत चालू राहिलं तर कठीण आहे. मुदत वाढवून चालणार नाही, मतदार याद्या तपासा. बोगस मतदार काढून टाका. एक खासदार सांगतात 20 हजार मतदार बाहेरून आणल्याने माझा विजय झाला ही नोंद घ्या, अशी मुद्देसूद मांडणी जयंत पाटील यांनी केलीय.

1 जुलैच्या मतदार यादीत कुठलीही दुरुस्ती नाही - थोरात

निवडणूक आयोग सीईओ यांना आम्ही काल भेटलो, आज आयुक्तांना भेटलो. आम्ही आधीच सांगितलं होत की, मतदार याद्यांमध्ये दोष आहे. दोष असताना सुद्धा निवडणूक घेतली गेली, बाहेरून मतदार आले आणि मतदान केलं. विधानसभेच्या मतदार यादीमध्ये दोष होते. 1 जुलै रोजी मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केली, त्यामध्ये कुठलीही दुरुस्ती केली नाही. दोषासह ही यादी आता अंतिम केली, यावर राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांना भेटलो. मात्र, आम्ही जे विचारले त्यावरील उत्तराने आमचं समाधान झालेलं नाही, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

हेही वाचा

गंभीर पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी 'तो' जोक मारला, उद्धव ठाकरेंसह जयंत पाटील, आव्हाड सर्वजण हसतच राहिले!

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
BJP : विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, तर स्मृती इराणींना अखेर मोठी जबाबदारी; भाजपची नवी टीम
विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, तर स्मृती इराणींना अखेर मोठी जबाबदारी; भाजपची नवी टीम
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget