एक्स्प्लोर

... तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला; निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर ठाकरे बंधूंची मागणी, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही सहमती

बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यातील घोळ आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

मुंबई : राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयुक्तांची (Election commission) भेट घेऊन मतदार यादी आणि बोगस नावावरुन आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर संवाद साधला. त्यानंतर, या सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, मतदार यादीसंदर्भातील घोळ संपुष्टात आल्याशिवाय आगामी निवडणुका घेऊ नका, अशी मागणी या नेत्यांनी केली. पत्रकार परिषदेत जयंत पाटील, राज ठाकरे (Raj Thackeray), बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मतदार याद्यातील (Voter list) घोळ आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत, भाजपला सुद्धा आम्ही पत्र दिलं होत, पण ते आले नाहीत. विधानसभा निवडणुका झाल्या त्याआधी नोव्हेंबर 2024 ला एक पत्र दिला होतं, त्यात भाजपची काही लोक मतदार याद्याशी खेळताय आणि हवे ते लोक घुसवाताय हे आम्ही सांगितलं होतं. आयुक्त म्हणून त्यांना अधिकार आहे की ते कटपुतळे आहेत, जे वरून त्यांना कोणी हलवतय, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. मी तर म्हणालोय इलेक्शन असं घ्यायचं असेल तर इलेक्शन न घेता सिलेक्शन करून टाका. पण, आम्ही हुकूमशाही सहन करणार नाही. राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला बाप कोण? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. कालच मतदार याद्याचा कार्यक्रम जाहीर केला, जोपर्यंत मतदार याद्या सुधारत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं आम्ही सांगितलं आहे. दोन्ही अधिकारी होते, त्यांनी आम्ही सांगितलं की, याचा सकारात्मक विचार करू, अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली. 117 आणि 124 वर्षे वयाची मतदार असतील, तर जगातील सर्वात चांगलं हवामान आपल्याकडे आहे. कारण दीर्घ आयुष्याचे मतदार इथं आहेत. निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे, त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास असला पाहिजे, नाहीतर हे मतदार हयात आहेत, पण त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतलेला आहे, डिलिट केलेला आहे. म्हणून, त्यांच्यावर सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

आणखी 6 महिने निवडणुका नाही झाल्या तर फरक पडत नाही - राज ठाकरे

5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत, आता आणखी 6 महिने त्या झाल्या नाहीत तर काय फरक पडतो? मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगांच्या प्रतिनिधींना भेटलो. आज राज्य आणि केंद्री निवडणूक आयगाच्या प्रतिनिदीना भेटलो. निवडणूक म्हटलं की, राजकिय पक्ष आले मतदार आले.निवडणूक आयोग हे फक्त निवडणूक घेतात मात्र राजकिय पक्ष ते लढवतात. मात्र राजकिय पक्षांना निवडणूक आयोग यादया दाखवत नसेल तर इकडे घोळ आहे, असं राज ठाकरे म्हणाले. 2024 नंतर यादी जाहीर केली यात नाव आहेत फोटो नाही. दोघांना भेटलो हे आमच्यात येत नाही असं सांगतात. मतदार यादया न दाखवून काय भेटणार आहे? या मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका, असं राज ठाकरेंनी सांगितले. 5 वर्ष निवडणूका झाल्या नाहीत, आणखी 6 महिने नाही झाल्या, तर काय फरक पडतो. उद्या-परवामध्ये काय निर्णय घेतात ते पाहू, नंतर सर्व आम्ही आमचा निर्णय सांगू, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

पुराव्यासह बोगस मतदारांचा लेखाजोखा मांडला - जयंत पाटील

आम्ही कालच राज्याचे निवडणूक आयुक्त यांना भेटून निवेदन दिलं, मतदार यादीतील अनंत चुका दाखवल्या. सीओंनी आम्हाला आश्वासित केलं की, केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून दुरुस्त्या केल्या जातील. दोघांचे प्रश्न म्हणून आम्ही आजही भेट घेतली, काही महत्वाच्या पुरावे सहीत आम्ही माहिती दिली. पुराव्यांसोबत पत्रही दिली, मतदार यादीत मतदारांचे पत्ते चुकीचे आहेत, प्रत्यक्षात मतदार त्या पत्यावर राहात नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी काही उदाहरणं देखील संदर्भासहीत दिली. त्यामध्ये, मुरबाडमध्ये बुथ क्र 8 मध्ये 400 मतदाराचं एक घरं आहे, तिथे डॅश आहे. वडनेरामध्ये कामटीमध्ये घर क्रमांकचं नाही. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार आहे. एपीक नंबर एकच असतो. मात्र मतदार यादीत अनेक असल्याचे आम्ही आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. नालासोपारामध्ये सुषमा गुप्ता महिलेचे नाव 6 वेळा नोंदवले आहे, 12 ऑगस्टला आमच्या कार्यकर्त्याने हे दुपारी दाखवलं. त्यानंतर, 6 वाजता त्या महिलेचे नाव काढलं, आपण एका चॅनेलमधून बातमी दाखवतो दुपारी 3 वाजता ती नावं असतात, पण 6 वाजता नावं काढतात. निवडणूक आयोगाला आम्ही विचारलं ही नावं कोणाच्या सांगण्यावर काढली, तक्रार कोणी केली. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचं सर्वर दुसरं कोणी तरी चालवतो. राज्य किंवा केंद्राच्या हातात ही यंत्रणा नसून बाहेरूनच कोणी तरी हे चालवतं आहे. पुण्यात 869 मतदारांची नोंद आहे, दर तासाला मतदार यादी जाहीर होत कोणी कुठे किती मतदान केलं, विधानसभेला हे सिस्टम तोडलं, थेट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मतदान टक्केवारी जाहीर केली. आम्ही विधानसभेला याद्या वाचल्या, हेच स्थानिक स्वराज्य संस्था निवणुकीत चालू राहिलं तर कठीण आहे. मुदत वाढवून चालणार नाही, मतदार याद्या तपासा. बोगस मतदार काढून टाका. एक खासदार सांगतात 20 हजार मतदार बाहेरून आणल्याने माझा विजय झाला ही नोंद घ्या, अशी मुद्देसूद मांडणी जयंत पाटील यांनी केलीय.

1 जुलैच्या मतदार यादीत कुठलीही दुरुस्ती नाही - थोरात

निवडणूक आयोग सीईओ यांना आम्ही काल भेटलो, आज आयुक्तांना भेटलो. आम्ही आधीच सांगितलं होत की, मतदार याद्यांमध्ये दोष आहे. दोष असताना सुद्धा निवडणूक घेतली गेली, बाहेरून मतदार आले आणि मतदान केलं. विधानसभेच्या मतदार यादीमध्ये दोष होते. 1 जुलै रोजी मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केली, त्यामध्ये कुठलीही दुरुस्ती केली नाही. दोषासह ही यादी आता अंतिम केली, यावर राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांना भेटलो. मात्र, आम्ही जे विचारले त्यावरील उत्तराने आमचं समाधान झालेलं नाही, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

हेही वाचा

गंभीर पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी 'तो' जोक मारला, उद्धव ठाकरेंसह जयंत पाटील, आव्हाड सर्वजण हसतच राहिले!

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
Shiv Sena Symbol Case : शिवसेनेवर निकाल देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नव्हताच, ठाकरेंच्या वकिलांचा दावा; शिवसेना सुनावणीतील सर्वात मोठे 25 मुद्दे
शिवसेनेवर निकाल देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नव्हताच, ठाकरेंच्या वकिलांचा दावा; शिवसेना सुनावणीतील सर्वात मोठे 25 मुद्दे

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
Embed widget