एक्स्प्लोर

तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे; अमित ठाकरेंच्या पत्रावरुन उदय सामंतांचा टोला

हा जल्लोष नाही, तिरंगा यात्रा काढून अख्खा देश सैनिकांसोबत आहे. भारतीय सैन्याच्या कामगिरीला आम्ही मानवंदना देत आहोत.

रत्नागिरी: मनसेचे नेते आणि राजपुत्र अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra modi) पत्र लिहून देशभरात सुरू असलेल्या तिरंगा रॅलीवर प्रश्न उपस्थित केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आपण जिंकलेलं नाही, तर या युद्धजन्य परिस्थितीला युद्धविराम मिळाला आहे. त्यामुळे, हा जल्लोष करणे योग्य नसल्याचे सांगत अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी भाजपकडून सुरू असलेल्या तिरंगा रॅलीवर प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत हा जल्लोष थांबवण्याची विनंतीही केली आहे. आता, शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी अमित ठाकरेंच्या आक्षेपावर प्रतिक्रिया दिली आहे. तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नसून भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढविण्यासाठी तिरंगा रॅली काढली जात असल्याचं सामंत यांनी सांगितलं.  

हा जल्लोष नाही, तिरंगा यात्रा काढून अख्खा देश सैनिकांसोबत आहे. भारतीय सैन्याच्या कामगिरीला आम्ही मानवंदना देत आहोत. भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी जर नागरिकांनी रस्त्यावर येऊन मानवंदना देण्याचा निर्णय घेतला तर त्यात गैर काही नाही. जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नाही, तिरंगा रॅली म्हणून हा कार्यक्रम होत आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच, तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा यात्रा एक विधायक रॅली आहे, असेही सामंत म्हणाले. दरम्यान, युद्ध अजून संपलेलं नाही… अशा मथळ्याखाली अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. 

उद्धव ठाकरेंवर टीका

ठाकरे गटाने जबाबदारी दिलेले किती लोक त्यांच्यासोबत निवडणुकीपर्यंत राहतील मी पाहतो आहे, कितीही पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली तरी मी दाव्याने सांगतो की मुंबई महानगरपालिकेपासून ते थेट रत्नागिरी नगरपरिषदेपर्यंत ते सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीची सत्ता येईल, असेही उदय सामंत यांनी म्हटले. 

गोगावलेंचा टॉवेल कायम खांद्यावर

दरम्यान, सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची नक्कल केली होती. याप्रकरणी उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. भरतशेठ गोगावले यांच्या खांद्यावर रुमाल नसतोच, गोगावले यांचा रुमाल वर्षानुवर्षे खेळमध्ये असतो. खांद्यावर रुमाल टाकणारा नेता कोण आहे हे मला शोधावे लागेल. अजून कितीही निवडणुका झाल्या तरी भरत शेठ गोगावले तिथून निवडून येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. आमचे भरतशेठ आत्मविश्वासानं टॉवेल काखेत ठेवतात. त्यामुळे, भरत शेठ गोगावले यांची नक्कल केली असे मी मानत नाही. कारण ते कधीच खांद्यावरती टॉवेल टाकत नाहीत, असे सामंत यांनी म्हटले.  

हेही वाचा

सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, रोहित पवार अन् जयंत पाटलांना राज्यात संधी; लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget