एक्स्प्लोर

विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे पूर्णपणे नेस्तनाबूत होतील, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल 

उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पूर्ण संपवण्याचा कट महाविकास आघाडी करत आहे. त्यांना आतातरी बुध्दी यायल हवी अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी केली.

Yogesh Kadam on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पूर्ण संपवण्याचा कट महाविकास आघाडी करत आहे. त्यांना आतातरी बुध्दी यायल हवी अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे दापोली विधानसभा (Dapoli Vidhansabha) मतदारसंघाचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी केली.  2024 च्या विधानसभेचा निकाल लागेल तेव्हा उध्दव ठाकरे पूर्णपणे नेस्तनाबूत झालेले दिसतील असेही योगेश कदम म्हणाले. 

रवींद्र चव्हाणांना प्रचाराला बोलावणार, आले तर ठिक नाही आले तर आम्ही सक्षम 

उद्धव ठाकरेंचा आजारपणाचा फायदा राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न सफल होणार नाही. त्यांना दीर्घायुष्य लाभो असेही योगेश कदम यावेळी म्हणाले. रवींद्र चव्हाण हे महायुतीचे नेते आहेत, त्यांना प्रचाराला नक्की बोलणार आहे, आले तर ठीक नाही आले तर आम्ही सक्षम आहोत असे योगेश कदम म्हणाले. रवींद्र चव्हाण यांच्याबाबत प्रश्न विचारला असता योगेश कदम यांनी उत्तर दिले. 

दापोलीत भाजप आणि शिवसेनेत वाद नाही

निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असल्याचे योगेश कदम म्हणाले. पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर जिंकण्याचा आम्हाला विश्वास असल्याचे कदम म्हणाले. दापोलीत भाजप आणि शिवसेनेत वाद नाहीत. 2019 ला देखील आता विरोध करणाऱ्या लोकांनी माझ्या विरोधात काम केलं. तळागाळातील भाजपचे कार्यकर्ते माझ्यासोबत असून महायुतीचे काम करतील असे योगेश कदम यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरेंना आतातरी बुध्दी यायल हवी. उध्दव ठाकरेंना पूर्ण संपवण्याचा कट मविआ करत असल्याचे कदम म्हणाले. 

कोकणातील प्रमुख आणि महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजे रत्नागिरी. तसं म्हटलं तर राजकीयदृष्ट्या शांत, पण अधिक उलथापालथी होत असलेला हा जिल्हा. अणुऊर्जा प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प, संभाव्य बॉक्साईट उत्खनन यासारख्या प्रकल्पांमुळे प्रसिद्ध असलेला हा जिल्हा. मासेमारी आणि हापूस आंब्यावर देखील याचं मुख्य अर्थकारण. शिवाय, पर्यटनासाठी मिळणारी पर्यटकांची पसंती देखील नजरअंदाज करून चालणार नाही. स्वातंत्र्यानंतर समाजवाद, काँग्रेस आणि सद्यस्थितीत शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची ओळख. राज्याच्या राजकारणात जिल्हा फारसा केंद्रस्थानी नसला तरी मुंबई, कल्याण, ठाणे या ठिकाणी होणाऱ्या किंवा केल्या जाणाऱ्या राजकारणावर कोकणी माणसाचा प्रभाव स्वाभाविकपणे दिसून येतो. त्यामुळे या जिल्ह्यातील विविध भागांमधून मोठ्या शहरांमध्ये होणारं स्थालांतर देखील लक्षणीय. मुंबईसारख्या महानगर क्षेत्रात होणारं राजकारण, त्यावर कोकणी माणसाचा पडणारा प्रभाव, मोठे प्रकल्प यामुळे सध्या या जिल्ह्याला देखील अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे. पण, लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात उलथापालथी होताना दिसून येत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाचे अनेक इच्छुक उमेदवार आमच्या संपर्कात, मनोज जरांगेंसोबतही चर्चा सुरु : राजू शेट्टी

महत्त्वाच्या बातम्या

माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेवक रेखा अंबुरेंचं कुणबी प्रमाणपत्र रद्द, बनावट पुरावे सादर करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप
माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेवक रेखा अंबुरेंचं कुणबी प्रमाणपत्र रद्द, बनावट पुरावे सादर करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Shivsena : शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे आमदार अपात्र, त्या आधारे निवडणूक आयोग अन् राहुल नार्वेकरांचे निर्णय चुकीचे; ठाकरेंच्या वकिलांचा सडेतोड युक्तिवाद, शिवसेना कुणाची याचा निकाल लवकरच
शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे आमदार अपात्र, त्या आधारे निवडणूक आयोग अन् राहुल नार्वेकरांचे निर्णय चुकीचे; ठाकरेंच्या वकिलांचा सडेतोड युक्तिवाद, शिवसेना कुणाची याचा निकाल लवकरच

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
Embed widget