एक्स्प्लोर

बहुमत असतानाही मंत्रिमंडळ स्थापन होऊ शकलं नाही हे दुर्दैव, अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल 

23 तारखेला निवडणुकीचा निकाल लागून जवळपास 20 ते 22 दिवस झाले. बहुमत असताना मंत्रिमंडळ स्थापन होऊ शकलं नाही. हे दुर्दैव असल्याचे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले. 

Ambadas Danve : मंत्रीमंडळ विस्ताराबाबतच्या बातम्या येत आहेत. पण मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत कुठलीही माहिती नाही. आत्ताच प्रशासनाकडून चौकशी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथ विधीची तयारी केली असली, तरी अधिकारीकरित्या कोणालाही सांगितलेलं नसल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. कामकाजाला न्याय द्यायचा असेल तर मंत्रिमंडळ विस्तार करावा लागेल. आताच्या घडीला 23 तारखेला निकाल लागूनही जवळपास 20 ते 22 दिवस झाले. बहुमत असताना मंत्रिमंडळ स्थापन होऊ शकलं नाही. हे दुर्दैव असल्याचे दानवे म्हणाले. 

तीन आठवड्याचे अधिवेशन व्हायला पाहिजे होतं

शेतकऱ्यांचे (Farmers) प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, बोगस औषधाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सरकारने निवडणुकीच्या काळात अनेक योजना लागू केल्या आहे, रेवड्या वाटण्याचं काम केलं. मात्र तिजोरीत काय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका मांडू असेही दानवे म्हणाले. खरंतर विदर्भाचे मुख्यमंत्री झाल्यावर विदर्भात तीन आठवड्याचे अधिवेशन व्हायला पाहिजे होतं, फॉर्मॅलिटी म्हणून सातत्याने अधिवेशन घेतलं जातं ही सत्यस्थिती नाकारता येत नाही. विदर्भातील अधिवेशन विदर्भातील जनतेला न्याय देण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी व्हायला पाहिजे. पण यातून उद्दिष्ट सार्थ होताना दिसून येत नाही हे दुर्दैव असल्याचे दानवे म्हणाले. 

भाजप त्यांच्या मनासारखं करत आहे

कोणत्याही मंत्र्याला हेच विभाग असलं पाहिजे, तेच खातं हाती असलं पाहिजे असा आग्रह का? जनतेची सेवा करताना कुठलेही खाते असले, तरी काम करता येते. सत्तेच्या स्पर्धेमुळे मैत्री बाजूला ठेवून खाते मिळवण्यासाठी यांच्यात स्पर्धा सुरू झाली असल्याची टीका देखील दानवे यांनी केली. 
एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री  व्हावे, त्यासाठी त्यांना विनवण्या करावा लागल्या. खाते वाटपासाठी विनवण्या करावा लागत आहेत. भाजप त्यांच्या मनासारखं करत आहे. भाजपला जे वाटते, ते केल्याशिवाय राहणार नाही असं वाटत असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. उद्या विरोधी पक्ष नेत्यांची बैठक होईल, त्यात आम्ही सगळ्या मुद्द्यांवर स्पष्टपणे विचार करु असेही दानवे म्हणाले. दरम्यान, दादरमधील हनुमान मंदिराच्या संदर्भात देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे 80 वर्ष जुने मंदीर आहे. हिंदुत्वाचं सरकार असताना मंदिर पाडण्याचा निर्णय होत असेल तर दुर्दैव आहे. हिंदुत्ववादी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका ही मंदिर वाचवण्याची असल्याचे अंबादास दानवे म्हणाले.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
Embed widget