एक्स्प्लोर

Sharad Pawar : लोकशाहीला अजूनही धोका कायम, लढाई एकजुटीने लढू, मविआच्या मेळाव्यात शरद पवारांचा एल्गार

Sharad Pawar : देशावरच संकट अद्याप गेलेले नाही. लोकशाहीला अजूनही धोका कायम आहे. राज्याचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला आहे.

मुंबई : देशावरच संकट अद्याप गेलेले नाही. लोकशाहीला (Democracy) अजूनही धोका कायम आहे. राज्याचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही लढाई एकजुटीने लढू, असा एल्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) महामेळाव्यातून ते बोलत होते.  

शरद पवार म्हणाले की, आपण स्वातंत्र्य दिवस साजरा केला. उद्याची महाराष्ट्राची दिशा काय राहणार आहे?महाराष्ट्रावर जे काही संकट आहे त्यातून राज्याची सुटका कशी करता येईल हे या सभेचे माध्यमातून पोहचवण्यासाठी ही सभा आहे. महाराष्ट्राचा विचार करावा लागेल. मात्र, देशावरच संकट अद्याप गेलेले नाही. लोकसभेला आपण संविधान बदलण्याबाबत भूमिका मांडली होती. संविधानावरील संकट अजूनही गेलेलं नाही. कारण आत्ताच जे सरकार आहे. त्यांची जी विचारधारा आहे की, त्यांना संविधानाची अडचण असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.  

शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

ते पुढे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या अधिवेशनात पंतप्रधान एक दिवसही सभागृहात आले नाहीत. कालच्या 15 ऑगस्टचा उल्लेख झाला यामध्ये विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांना माग बसवलं होतं. मी विरोधी पक्षनेता होतो त्यावेळी माझी आसनव्यवस्था ही कॅबिनेट मंत्री यांच्या ओळीत होती. आज राहूल गांधी यांची प्रतिष्ठा गेली असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण विरोधी पक्षानेत्यांच्या पदाची गरिमा आहे. तिचा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सुषमा स्वराज यांना पहिल्या रांगेत बसवले.  विरोधी पक्ष नेता ही संस्था असते. तिचा मान ठेवायचा असतो, अशी टीका त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधींना पाचव्या रांगेत बसवल्यावरून केली.  

लढाई एकजुटीने लढू

ते पुढे म्हणाले की, राज्याचे चित्र बदलायचे असेल तर इथलं सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही. रस्त्यावर आंदोलन करणाऱ्याबाबत एक कायदा आणायचा प्रयत्न आपण सरकारचा हाणून पाडला आहे. कारण या कायद्यामुळे रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला 5 ते 7 वर्ष तुरुंगात टाकण्याचे प्रयोजन होतं. मात्र आपण ते होऊन दिलं नाही.  आम्ही तिघेही सन्मानाने सर्वांना सामावून घेऊन एक चांगलं सरकार पूढे आणू. ही लढाई एकजुटीने लढू, असे शरद पवार यावेळी म्हणाले. 

आणखी वाचा 

सुप्रियांच्या लाडक्या भावाने रंग बदलला, पिंक झाला पण रंग तर सरडा बदलतो; संजय राऊतांचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Port Blair Renamed Sri Vijaya Puram : देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'विजयपूरम'
देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'विजयपूरम'
Bangladesh Crisis : रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेशात काय घडतंय?
रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेशात काय घडतंय?
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सEknath Khadse : मुलीशी चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे होती : खडसेMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 13 Sep 2024Eknath Khadse Majha Katta: भाजप की राष्ट्रवादी? एकनाथ खडसे यांचे 'माझा कट्टा'वर खळबळजनक गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Port Blair Renamed Sri Vijaya Puram : देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'विजयपूरम'
देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'विजयपूरम'
Bangladesh Crisis : रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेशात काय घडतंय?
रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेशात काय घडतंय?
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?
कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?
Eknath Khadse on Majha Katta : एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
Manoj Jarange : 'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी'; मनोज जरांगे पाटलांचं जोरदार टीकास्त्र
'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी'; मनोज जरांगे पाटलांचं जोरदार टीकास्त्र
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य
Embed widget