एक्स्प्लोर

Sharad Pawar vs Devendra Fadnavis : त्यावेळी फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत होते.... देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला शरद पवारांचं खोचक उत्तर

Sharad Pawar vs Devendra Fadnavis : "1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. त्यावेळी फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना त्या काळातील त्यांना काही माहिती नसेल. अज्ञातापोटी ते असं स्टेटमेंट करतात," असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar vs Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी 1977 मधील घडामोडींचा संदर्भ देताना पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं वक्तव्य केलं होतं. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी खोचक शब्दात उत्तर दिलं आहे. "1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. त्यावेळी फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना त्या काळातील त्यांना काही माहिती नसेल. अज्ञातापोटी ते असं स्टेटमेंट करतात," असं शरद पवार म्हणाले. बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी विरोधकांच्या बैठकीसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सोबतच राष्ट्रवादीमधील बदलांबाबतही भाष्य केलं.

देवेंद्र फडणवीसांवर शेलक्या शब्दात भाष्य

देवेंद्र फडणवीस म्हणतात एकनाथ शिंदेंनी केली तर बेईमानी आणि पवारसाहेबांनी केली तरी मुत्सद्देगिरी? असा सवाल विचारला असता शरद पवार म्हणाले की, "कधी केली पवारांनी? कधी केली हे त्यांनी सांगावं. 1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. ते लहान होते त्यावेळी, त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहित नसेल. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी जे सरकार बनवलं ते सगळ्यांना सोबत घेऊन बनवलं. त्यावेळी जनसंघाचे उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर हशू अडवाणी होते आणि काही सदस्य होते. त्यावेळी ते प्राथमिक शाळेत कदाचित असतील. त्यामुळे त्यांना त्या काळातील त्यांना काही माहिती नसेल. अज्ञातापोटी ते असं स्टेटमेंट करतात, यापेक्षा जास्त भाष्य करण्याची गरज नाही." 

फडणवीस काय म्हणाले होते?

चंद्रपूरमध्ये मोदी सरकारच्या 9 वर्षपूर्तीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा उल्लेख करत 1977 च्या घडामोडींचा संदर्भ दिला. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना लक्ष्य करताना 1977 साली त्यांनी स्थापन केलेल्या सरकारचा संदर्भ दिला. "शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. ते सरकार दोन वर्षं चाललं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं तर ते सरकार पाच वर्षं चाललं असतं. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल?" असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला होता.

मॅच्युअर पॉलिटिक्सची कमतरता

बिहारच्या पाटण्यात पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीवर भाजपकडून जोरदार टीक करण्यात येत आहे. 19 पंतप्रधान एकत्र आले होते, असा टोला भाजपने लगावला होता. यावर प्रतिक्रिया देताना अशाप्रकारची भाष्य करणं पोरकटपणा आहे. या संबंध बैठकीत पंतप्रधानपदावर चर्चा देखील झाली नाही. महागाई, बेरोजगारी आणि धार्मिक तेढ या मुद्द्यांवर चर्चा झाली, असं पवारांनी सांगितलं. तसंच लोकशाहीत बैठक घ्यायला परवानगी नाही? असा सवालही शरद पवार यांनी विचारला आहे. पवार म्हणाले की, "गेले दोन दिवस अनेक तथाकथित नेते हे लोक जमले का, त्यांनी बैठक का घेतली, लोकशाहीत बैठक घ्यायला परवानगी नाही? भाजप प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य आलं की बैठकांची गरज का होती. दुसऱ्या दिवशी त्यांचं वक्तव्य आलं की मुंबईत त्यांच्या मित्रपक्षांची बैठक ते घेणार आहेत. तुम्हाला बैठक घेता येतात पण इतरांनी बैठका घेतल्या तर तुम्हाला चिंता का वाटते. माझ्या मते मॅच्युअर पॉलिटिक्स म्हणतात त्याची कमतरता यापेक्षा जास्त काही सांगायची गरज नाही."

'हे फडणवीस यांचं अज्ञान'

राष्ट्रवादीत ओबीसींना फक्त दाखवण्यापुरतं घेतलं जातं, त्यांना कोणत्या पदावर संधी दिली जात नाही, असं देवेंद फडणवीस म्हणाले होते. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, पुन्हा एकदा सांगतो हे फडणवीस यांचं अज्ञान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले महाराष्ट्र अध्यक्ष होते छगन भुजबळ. ते कोण आहेत?  त्यानंतर अध्यक्षपदावर पिचड होते, ते कोण आहेत? त्यानंतर सुनील तटकरे. ही सगळी यादी जर दिली अर्थात त्यांचं वाचन किती आहे याची मला माहिती नाही. पण या सगळ्या गोष्टींची नोंद न घेता वक्तव्य करतात. लोकांना माहित असतं. लोकांना हाही अनुभव आहे त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो वास्तवाला धरुन नाही.

अजितदादांची जबाबदारी बदलणार का, पवार म्हणतात...

आपल्याला दुसरी जबाबदारी द्यावी असं अजितपवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात म्हटलं होतं. आता अजितदादांची जबाबदारी बदलणार का आणि बदलली तर कोणती जबाबदारी देणार या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, "हा निर्णय एकटा घेत नसतो. त्यांच्यासह प्रमुख लोक बसतील आणि त्यासंबंधी निर्णय घेतील. आज पक्षसंघटनेच्या कामात सगळ्यांनी लक्ष द्यावं अशी  भावना आहे. तेच मत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं त्यापेक्षा जास्त काही नाही."

VIDEO : Sharad Pawar Full PC Baramati : Mature Politics ची कमतरता, शरद पवारांचा भाजपला टोला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
Embed widget