एक्स्प्लोर

राज ठाकरेंवर सुपाऱ्या फेकणारे आमचे कार्यकर्ते पण ती पक्षाची भूमिका नाही :संजय राऊत

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर  जे बसले आहेत ते लोटांगण घालूनच बसले आहेत. महाराष्ट्राच्या गादीवर लोटांगणवीर असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

मुंबई : बीडमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) गाडीवर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. या आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, पण त्या आंदोलनाशी पक्षाचा संबंध नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेबव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी म्हटलंय. मात्र मनसेने आम्हाला इशारे वगैरे देऊ नये असंही त्यांनी सुनावले आहे. महाराष्ट्राच्या गादीवर लोटांगणवीर बसले आहेत, असे म्हणत  राऊतांनी टीका केली आहे. राऊत  मुंबईत माध्यमांशी बोलत होते. 

 संजय राऊत म्हणाले, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही जणांनी सुपारी फेकल्या त्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात . पण त्या आंदोलनाशी शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही.मराठा कार्यकर्त्यांचे आरक्षणासंदर्भातील ते आंदोलन होते.  सध्या महाराष्ट्रात विशेषत: मराठवाडा आणि बीडमध्ये जे आंदोलन सुरू आहे. त्यात  राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केले. त्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातील तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. त्यात मनसेचे लोकही असू शकतात. कारण मराठा आंदोलन हे पक्षविरहीत आंदोलन आहे. जेव्हा या संदर्भात एक मराठा लाख मराठा असे म्हणते मोठमोठे मोर्चे निघाले.  तेव्हाचे आमचे मंत्री, आमच्याच नाही  तर इतर पक्षांचे नेते सगळे एकत्र होते. आता सुद्धा या आंदोलनामध्ये कदाचीत बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील. परंतु ते सर्वांचे आंदोलन होते

आम्हाला इशारे वगैरे देऊ नका.. राऊतांचा मनसेला इशारा

 राज ठाकरेच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत ठाकरे गटाला इशारा दिला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्हाला इशारे वगैरे देऊ नका.. ते भाजपला, फडणवीसांना, महाराष्ट्रद्रोह्यांना द्या... मी माझ्या पक्षाची, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भूमिका सांगत आहे. बीडमध्ये हा प्रकार घडला. त्यावेळी आम्ही दिल्लीत होतो. बातमी समोर आल्यानंतर आम्ही लगेच माहिती घेतली. 

महाराष्ट्राच्या गादीवर लोटांगणवीर : संजय राऊत 

राजकारणात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. तसेच विरोध करण्याचा देखील अधिकार आहे. विरोध करताना निषेधाच्या पद्धती वेगळ्या असतात.  महाराष्ट्रात सध्या ज्या पद्धतीने वातावरण बिघडवलं जात आहे, भविष्यात सर्वच राजकीय पक्षांनी या विषयावर संयम राखणे गरजेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

महाराष्ट्रातले राज्यकर्ते जे दिल्लीच्या दारात पायपुसणे : संजय राऊत 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर  जे बसले आहेत ते लोटांगण घालूनच बसले आहेत. महाराष्ट्राच्या गादीवर सध्या लोटांगणवीर बसले आहेत. आता पर्यंतचे जेवढे मुख्यमंत्री दिल्लीला गेले नसतील तेवढे हे एक मुख्यमंत्री लोटांगण घालण्यासाठी गेले. दिल्ली ही देशाची राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत लोंटागण घालायला गेले होते का? पेशव्यांनी दिल्ली जिंकली ते काय लोटांगण घालायला गेले होते का? ठाकरेंनी मोदी, शाहांच्या जुलमी कारभाराशी  झुंज दिली त्याला लोटांगण नाही तर त्याला  स्वाभिमानी लढा म्हणतात. आज महाराष्ट्रातले राज्यकर्ते जे दिल्लीच्या दारात पायपुसणे म्हणून बसले त्याला लोटांगण म्हणतात, असे संजय राऊत म्हणाले.  

फडणवीसांनी  महाराष्ट्राचे राजकारण नासवले : संजय राऊत

परमबीर सिंह हे आरोपी आहे त्यामुळे त्यांच्या बद्दल मला काही बोलयचे नाही.  हा विषय आमच्यासाठी संपला आहे . देवेंद्र फडणवीसांनी  महाराष्ट्राचे राजकारण नासवले आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

हे ही वाचा :

मोठी बातमी :राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या भिरकावल्या, सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु, ठाकरेंच्या शिवसेनेला मनसेचा इशारा

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget