एक्स्प्लोर

Kiran Samant: ऐन मतदानाच्या दिवशी किरण सामंत नॉट रिचेबल, भाजप-शिंदे गटाची धाकधूक वाढली, चर्चांना उधाण

Maharashtra Politics: बारामतीनंतर आता रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात ट्विस्ट, किरण सामंत नॉट रिचेबल, भाजप-शिंदे गटाची धाकधूक वाढली. रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात किरण सामंत यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

रत्नागिरी: कोकणातील लक्षवेधी लढत असणाऱ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) रिंगणात आहेत. नारायण राणे यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावत रत्नागिरी-सिंधुदुर्गातून मोठ्या विजयाचा दावा केला. मात्र, त्याचवेळी एका गोष्टीमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीची धाकधूक वाढली आहे. आज सकाळपासून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) हे नॉट रिचेबल आहेत.

किरण सामंत यांचे कार्यकर्ते हे सकाळपासून त्यांना फोन लावत आहेत. मात्र, अद्याप कोणाचाही किरण सामंत यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते. त्यासाठी सामंत बंधूंनी शेवटच्या क्षणापर्यंत किल्ला लढवला होता. मात्र, शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या पारड्यात दान टाकल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळाली होती. यानंतर किरण सामंत आणि उदय सामंत महायुतीचा धर्म पाळत कामाला लागले होते. परंतु, आता सर्वकाही सुरळीत सुरु असताना  ऐन मतदानाच्या दिवशीच किरण सामंत नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे सध्या भाजप आणि शिंदे गटाच्या गोटातील धाकधूक वाढली आहे.

रत्नागिरीत सामंत बंधुंची ताकद राणेंसाठी महत्त्वाचे

नारायण राणे हे भाजपचे उमेदवार असल्याने त्यांच्या पाठीशी पक्षाची अजस्त्र यंत्रणा आहे. याशिवाय, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांचे वर्चस्व आहे, असे म्हटल्यास अगदीच वावगे ठरणार नाही. परंतु, रत्नागिरी जिल्ह्यात राणेंची ताकद कमी पडते. याठिकाणी उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचे वर्चस्व आहे. गेल्या अनेक वर्षांपासून किरण सामंत हे उदय सामंत यांच्यासाठी निवडणुकीच्या काळात जबाबदारी सांभाळत आहेत. उदय सामंत हे मंत्री असल्यामुळे सातत्याने मुंबईत किंवा फिरतीवर असतात. या काळात रत्नागिरीत त्यांच्या कार्यकर्त्यांशी किरण सामंत हे संपर्कात असतात. त्यामुळे किरण सामंत यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. अनेकवर्षे उदय सामंत यांच्यासाठी निवडणुकीची यंत्रणा राबवण्याचा किरण सामंत यांना अनुभव आहे. त्यामुळे किरण सामंत यांच्या एका भूमिकेने रत्नागिरीतील राजकीय समीकरणं आणि मतदानाचा पॅटर्न 180 अंशाच्या कोनात फिरू शकतो. 

याच गोष्टीमुळे किरण सामंत हे नॉट रिचेबल असणे, ही गोष्ट महायुतीची चिंता वाढवणारी आहे. किरण सामंत हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेटही घेतली होती. सामंत बंधू हे नारायण राणेंच्या उमेदवारीसाठी राजी नव्हते तोपर्यंत रत्नागिरीत राणे यांच्या बैठका आणि सभांना शून्य प्रतिसाद मिळत होता. अखेर किरण सामंत यांनी मनधरणी केल्यानंतर नारायण राणे यांच्या प्रचाराचा गाडा सुरळीत झाला होता. परंतु, आता ऐन मतदानाच्या दिवशी किरण सामंत यांच्या नॉट रिचेबल होण्याचा नेमका अर्थ काय,याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.  

आणखी वाचा

किरण सामंत यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी मागितली, कामाला लागा; उदय सामंत यांचा कार्यकर्त्यांना आदेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक, गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं भाजपचे षडयंत्र; वर्षा गायकवाडांचा आरोप
मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक, गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं भाजपचे षडयंत्र; वर्षा गायकवाडांचा आरोप
VIDEO : ... तर मला संग्रामबापूमधील बापू शब्द काढून संग्राम भंडारे व्हावे लागेल; बाळासाहेब थोरातांना पुन्हा इशारा
... तर मला संग्रामबापूमधील बापू शब्द काढून संग्राम भंडारे व्हावे लागेल; बाळासाहेब थोरातांना पुन्हा इशारा
Raj Thackeray : मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ, त्याकडे बारीक लक्ष द्या; राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, पालिका निवडणुकीसाठी कानमंत्रही दिला
मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ, त्याकडे बारीक लक्ष द्या; राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, पालिका निवडणुकीसाठी कानमंत्रही दिला
Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींची कोणतीही योजना बंद होणार नाही, राज्यात एक कोटी लखपती दीदी करणार: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहिणींची कोणतीही योजना बंद होणार नाही, राज्यात एक कोटी लखपती दीदी करणार: देवेंद्र फडणवीस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक, गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं भाजपचे षडयंत्र; वर्षा गायकवाडांचा आरोप
मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक, गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं भाजपचे षडयंत्र; वर्षा गायकवाडांचा आरोप
VIDEO : ... तर मला संग्रामबापूमधील बापू शब्द काढून संग्राम भंडारे व्हावे लागेल; बाळासाहेब थोरातांना पुन्हा इशारा
... तर मला संग्रामबापूमधील बापू शब्द काढून संग्राम भंडारे व्हावे लागेल; बाळासाहेब थोरातांना पुन्हा इशारा
Raj Thackeray : मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ, त्याकडे बारीक लक्ष द्या; राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, पालिका निवडणुकीसाठी कानमंत्रही दिला
मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ, त्याकडे बारीक लक्ष द्या; राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, पालिका निवडणुकीसाठी कानमंत्रही दिला
Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींची कोणतीही योजना बंद होणार नाही, राज्यात एक कोटी लखपती दीदी करणार: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहिणींची कोणतीही योजना बंद होणार नाही, राज्यात एक कोटी लखपती दीदी करणार: देवेंद्र फडणवीस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2025 | शनिवार
धरालीनंतर आता थराली; उत्तराखंडमध्ये आभाळ फाटण्याची मालिका सुरुच, 70 ते 80 घरे गाळाने भरली, लष्कराला पाचारण
धरालीनंतर आता थराली; उत्तराखंडमध्ये आभाळ फाटण्याची मालिका सुरुच, 70 ते 80 घरे गाळाने भरली, लष्कराला पाचारण
Indian Post : ट्रम्प यांच्या नवीन नियमाचा भारताला फटका, अमेरिकेकडे जाणारी टपाल सेवा तात्पुरती बंद, भारतीय पोस्टची घोषणा
ट्रम्प यांच्या नवीन नियमाचा भारताला फटका, अमेरिकेकडे जाणारी टपाल सेवा तात्पुरती बंद, भारतीय पोस्टची घोषणा
Akola News : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही, पाशा पटेलांच्या वक्तव्यावर महादेव जानकरांची प्रतिक्रिया, सरकारी पदावरील व्यक्तीने...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही, पाशा पटेलांच्या वक्तव्यावर महादेव जानकरांची प्रतिक्रिया, सरकारी पदावरील व्यक्तीने...
Embed widget