एक्स्प्लोर

Raj Thackeray : उद्धव ठाकरेंचं भाषण संपताच राज ठाकरे पुन्हा बोलायला उभे राहिले, मराठी भाषेच्या लढ्यातील सहभागी पक्षांच्या नेत्यांना मंचावर बोलावलं अन्....

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी वरळी डोम येथील विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यानंतर पुन्हा बोलायला उभं राहत उपस्थित सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना मंचावर बोलावलं.

मुंबई : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारनं पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर वरळीतील डोममध्ये विजयी मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर मराठीवर प्रेम करणारे लोक मुंबईतील वरळीतील डोममध्ये दाखल झाले होते. या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणं झाली. राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात सन्माननीय उद्धव ठाकरे म्हणत केली. यानंतर त्यांनी मराठीच्या संदर्भातील मुद्यांवर सविस्तर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांचं भाषण संपल्यानंतर राज ठाकरे पुन्हा बोलायला उभे राहिले अन् मुख्य भाषणावेळी राहिलेली गोष्ट त्यांनी दुरुस्त केली. 

राज ठाकरे पुन्हा भाषणाला उभे राहिले अन् ... 

राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचं भाषण संपल्यानंतर पुन्हा बोलायला उभे राहिले आणि म्हणाले, मला माफ करा, मगाशी माझ्या भाषणात ओघात या लढ्यात जे जे पक्ष सहभागी झाले त्यांची नावं घ्यायला विसरलो. माझी विनंती आहे म्हणत राज ठाकरे यांनी कॉ. प्रकाश रेड्डी, सुप्रियाताई सुळे, कॉ. अजित नवले, जितेंद्र आव्हाड, महादेवराव जानकर, शेकापचे जयंत पाटील, भालचंद्र मुणगेकर यांना मंचावर बोलावलं. मराठी भाषा केंद्राचे दीपक पवार, विनोद निकोले यांना मंचावर बोलावलं. यानंतर सर्वांनी मराठी भाषेच्या लढ्यासाठीचा जल्लोष केला. यानंतर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना देखील मंचावर बोलावण्यात आलं.यानंतर संजय राऊत यांना देखील मंचावर बोलावण्यात आलं. 

या ऐतिहासिक क्षणाच्या वेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय देखील मंचावर आले आणि त्यांनी एकत्रित फोटो काढले. 

मोर्चा निघायला पाहिजे होता : राज ठाकरे 

सन्माननीय उद्धव ठाकरे, जमलेल्या सर्व तमाम मराठी भगिनींनो बांधवांनो मातांनो, खरंतर दोघांची भाषणं संपली की एकत्र आरोळ्या ठोका, खरंतर आज मोर्चा निघायला पाहिजे होता, मराठी माणूस कसा सर्व बाजूनं एकवटतो याचं चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं, नुसत्या मोर्चाच्या चर्चेनं माघार घ्यावी लागली, असं राज ठाकरे म्हणाले. 

राज ठाकरे म्हणाले की एका मुलाखतीत म्हटलं होतं की, कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव व्यासपीठावर एकत्र येत आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, बऱ्याच चॅनेलचे कॅमेरे जमले आहेत, संध्याकाळी सगळं सुरु होईल, काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती, कोणी हसलं का, काय बोलतात का?मूळ विषय सोडून इतर गोष्टीत इंटरेस्ट असतो, असं राज ठाकरे म्हणाले. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
Dadar Power Cut : ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची  अंधारात विक्री
ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची अंधारात विक्री
Parbhani Accident : मुंबईतील निवासी उपजिल्हाधिकाऱ्याच्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जण जखमी
मुंबईतील महसूल विभागाच्या शासकीय अधिकाऱ्याच्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जण जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thane Ashok Saraf: अशोक सराफांच्या उपस्थितीत अंबरनाथमध्ये नाट्यगृहाचं लोकार्पण
Black Diwali : बेरोजगार तरुणांची काळी दिवाळी, ठाण्यात आंदोलन
Mira Road Accident: मीरा रोडमध्ये भीषण अपघात, चिमुकलीचा जागीच मृत्यू
Panvel Water Crisis: पाणीटंचाईमुळे पनवेलमध्ये नवीन बांधकामांवर बंदी घालण्याची मागणी
Worli Fire: वरळीतील महाकाली नगरमध्ये भीषण आग, झोपडपट्टीला आग, सिलेंडरचा स्फोट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
Dadar Power Cut : ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची  अंधारात विक्री
ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची अंधारात विक्री
Parbhani Accident : मुंबईतील निवासी उपजिल्हाधिकाऱ्याच्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जण जखमी
मुंबईतील महसूल विभागाच्या शासकीय अधिकाऱ्याच्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जण जखमी
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
पडक्या घरातच पूरग्रस्त लाडक्या बहिणीनं केलं पालकमंत्र्याचं स्वागत; जयकुमार गोरे म्हणाले घर बांधून देतो
पडक्या घरातच पूरग्रस्त लाडक्या बहिणीनं केलं पालकमंत्र्याचं स्वागत; जयकुमार गोरे म्हणाले घर बांधून देतो
बदलापुरात शहराबाहेरील 17 हजार मतदार; शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख पुढे, म्हणाले, बोगस लोकांना चोप देऊ
बदलापुरात शहराबाहेरील 17 हजार मतदार; शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख पुढे, म्हणाले, बोगस लोकांना चोप देऊ
FPI: दिवाळीपूर्वी भारतासाठी गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, तीन महिन्यानंतर शेअर बाजारात मोठी गुंतवणूक
दिवाळीपूर्वी भारतासाठी गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, 3 महिन्यानंतर शेअर बाजारात कोट्यवधी गुंतवले
Embed widget