एक्स्प्लोर

बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया, संदीप देशपांडेंना वरळीत आणूया, आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे पोस्टर्स

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने पोस्टरबाजी (MNS posters) केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या पोस्टरवर आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे बॅनर लावले आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणूक निकालानंतर (Lok Sabha Election result 2024) आणि विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध मनसे (MNS vs Shiv Sena Worli) असा सामना रंगताना दिसत आहे. कारण आता वरळीत मनसे विरुद्ध आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने पोस्टरबाजी (MNS posters) केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या पोस्टरवर आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे बॅनर लावले आहेत. याच पोस्टरच्या माध्यमातून विधानसभेसाठी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना जिंकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. 

आदित्य ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे वरळी विधानसभेतील (Worli Vidhan Sabha) विद्यमान आमदार आहेत. यंदा त्यांच्याविरोधात मनसेकडून संदीप देशपांडे हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीत उतरले होते. ठाकरे गटातील पहिली व्यक्ती निवडणूक लढत असल्याने, राज ठाकरे (Raj Thackeray MNS) यांनी त्यांच्याविरोधात कोणताही उमदेवार दिला नव्हता. 

वरळीतील पोस्टर्सवर नेमकं काय? 

वरळीत मनसेने आदित्य ठाकरे यांच्याविरोधात पोस्टर्स लावले आहेत. त्या पोस्टर्सवर आदित्य ठाकरेंविरोधात उल्लेख करण्यात आला आहे. बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया, जनमनातला आमदार, संदीप वरळीत आणूया. वरळीचे भावी आमदार संदीप देशपांडे सन्माननीय राज ठाकरे यांचा विश्वासू शिलेदार विधानसभेत पाठवूया यंदा वरळीकरांचं ठरलंय, असं या पोस्टर्सवर लिहिलं आहे.

राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्यावरुन टीकास्त्र 

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीविरोधात भूमिका घेत, भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावरुन मविआने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात राज ठाकरेंवर (Raj Thackeray) हल्लाबोल केला होता. 

उघड म्हणजे बिनशर्ट पाठिंबा

उद्धव ठाकरे नको म्हणून काही जणांनी उघड म्हणजे 'बिनशर्ट' पाठिंबा दिला, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर केला.  होता. या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण हे स्पष्ट झालं. फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून काही लोकांनी उघड म्हणजे “बिनशर्ट” पाठींबा दिला, असं म्हणत उध्दव ठाकरेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. 

अमित ठाकरे यांचं उद्धव ठाकरेंना उत्तर

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांनी केलेला विनोद समजायला दहा मिनिटे लागली. मात्र राज ठाकरेंनी (Raj Thackeray) वरळीत बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी मुलगा आदित्य ठाकरेंना आमदार बनवताना काही वाटलं नाही का? असा सवाल अमित ठाकरे यांनी केला होता.  

संबंधित बातम्या 

Amit Thackeray: अमित ठाकरेंचं पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना उत्तर, म्हणाले, वरळीत बिनशर्त पाठिंबा घेतला, मुलाला आमदार केलं, ते विसरु नका!   

Video: मनसे म्हणते, वरळीत तुम्हाला हरवणार, आदित्य ठाकरेंचं उत्तर, म्हणाले आधी शर्ट घालून यायला सांगा! 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Pankaja Munde : मंत्री पंकजा मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य; म्हणाल्या, 'जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसाच....
'जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल'; मंत्री पंकजा मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget