एक्स्प्लोर

Narendra Modi: मेट्रो फ्री करा, मंत्र्यांचे ताफे कमी करा...; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर नागरिक संतापले, काय काय म्हणाले?

Narendra Modi: पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

Narendra Modi: पेट्रोल-डिझेलचा (Diesel-Petrol) वापर कमी करा आणि मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना (Narendra Modi 9 Suggestions) केलं. मात्र नरेंद्र मोदींच्या या आवाहनावर आता सामान्य नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर नागरिक काय काय म्हणाले? (Mumbaikar React On Narendra Modi Appeal)

एबीपी माझाने मुंबईतील पेट्रोल पंपांवर नागरिकांशी संवाद साधला असता, सर्वसामान्यांनी पेट्रोल कमी वापरावं म्हणण्याआधी मंत्र्यांचे ताफे कमी करा... एका नेत्यामागे दहा-दहा गाड्या फिरतात, छोट्या अंतरासाठीही हेलिकॉप्टरचा वापर होतो, ते आधी बंद करा, अशा तीव्र शब्दांत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे, मेट्रोचा वापर करा म्हणता, पण मेट्रोचे भाडे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. सरकारने मेट्रो फ्री करावी किंवा भाड्यात मोठी कपात करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर आता सामान्य नागरिकांच्या या प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहेत.

लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित- (Narendra Modi 9 Suggestions)

देशात नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासियांना मोठं आवाहन केलं आहे. पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा (Diesel-Petrol) वापरही कमीत कमी करावा असं आवाहन त्यांनी केलं. हैदराबादमधील एका जाहीर सभेतून मोदींनी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याबद्दल नरेंद्र मोदींनी मतं मांडली. आखाती युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या अपुऱ्या पुरवठा होतोय, ज्यामुळे अनेक देशांत इंधन दराचा भडका उडाला आहे. त्यामुळे मोदींच्या आवाहनामुळे पुढील काळात नेमकी काय परिस्थिती ओढावणार आहे, याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

नरेंद्र मोदींनी देशवासियांना कोणती 9 आवाहनं केली? (Narendra Modi 9 Suggestions)

  1. पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा कारण दर खूप वाढले आहेत.
  2. खाद्यतेलाचा वापर मर्यादित जपून करा...
  3. पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका...
  4. वर्षभर परदेशी प्रवास टाळा...
  5. कच्च तेल वाचवण्यावर भर द्यायचा आहे.
  6. परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे, परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही
  7. जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा...
  8. वर्क फ्रॉम होम वर भर द्या, ऑनलाईन बैठकांवर भर द्या...
  9. परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा...

संबंधित बातमी:

Shailendra Deolankar On Narendra Modi: सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, मोदींचं आवाहन; आता हादरवणारं कारण आलं समोर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Bhagirath Chaudhary: भाजपच्या केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी आपल्याच मंत्रालयाकडून शेतीच्या अनुदानपोटी 99 लाख लाटले, बोभाटा होताच नाईलाजाने केले परत
भाजपच्या केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी आपल्याच मंत्रालयाकडून शेतीच्या अनुदानपोटी 99 लाख लाटले, बोभाटा होताच नाईलाजाने केले परत
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Embed widget