एक्स्प्लोर

Mumbai BEST Election Result: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू का हरले? 'या' गोष्टीने उद्धव ठाकरेंचा घात केला

Mumbai BEST Election Result: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत 21 जागांपैकी 14 जागांवर शशांक राव पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलला 7 जागा, ठाकरे बंधूंना एकही जागा मिळाली नाही.

Mumbai BEST Election Result: राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आल्यामुळे यंदाची बेस्ट पतपेढीची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि महायुतीच्या पॅनेलमध्ये मुख्य लढाई होईल, असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज चुकवत शशांक राव यांच्या पॅनेलने 21 पैकी 14 जागा जिंकत बाजी मारली. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलने 7 जागांवर विजय मिळवला. तर ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही. त्यासाठी ठाकरे गटाची गेल्या काही वर्षातील बेस्टमधील निष्क्रियता कारणीभूत असल्याची चर्चा आता रंगली आहे.

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाला हा तेवढ्यापुरताच मर्यादित असला तरी विजय हा विजयअसतो. ठाकरे गटाने बेस्ट प्रशासनातील जुनी माणसं बदलणं आणि नवीन माणसांना पुढे आणण्यात कमालाची निष्काळजीपणा दाखवला. बेस्टमध्ये मनसेचे अस्तित्व फार नव्हतेच. या सगळ्याचा फटका ठाकरे बंधूंना बसला, असे मत ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांनी व्यक्त केले. ते बुधवारी 'एबीपी माझा'शी बोलत होते.

शशांक राव यांच्या पॅनेलने सर्वांचा अंदाज चुकवत 14 जागा जिंकल्या. शशांक राव यांचे वडील शरद राव हे कामगार नेते होते. मुंबई महानगरपालिकेत 25 वर्षे शिवसेना-भाजपची सत्ता असताना आणि बाळासाहेब ठाकरे व गोपीनाथ मुंडे हयात असतानाही पालिकेच्या अंतर्गत कामगार संघटनेत शरद राव यांचे वर्चस्व कायम राहिले होते. शशांक राव यांनीही त्यांच्या वडिलांप्रमाणे कामगार संघटनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं केली आहेत. त्यांनी बेस्टमध्ये अनेक आंदोलनं केली. त्यामुळे बेस्टचा कर्मचारी वर्ग त्यांच्यासोबत राहिला. शशांक राव भाजपमध्ये असले तरी त्यांनी या निवडणुकीत स्वत:चे स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. त्यांना 14 जागांवर विजय मिळाला. भाजपच्या प्रसाद लाड, शिंदे गटाचे किरण पावसकर आणि नितेश राणे यांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या सहकार समृद्धी पॅनेलला 7 जागा मिळाल्या. तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचं पानिपत झालं. या गोष्टीचा ठाकरे बंधुंना विचार करावा लागेल. विशेषत: उद्धव ठाकरे यांना विचार करावा लागेल. बेस्टमध्ये जुनी माणसं बदलणं आणि नवीन लोक देणं आणि संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या कामांचा नियमित आढावा घेणे, याबाबत उद्धव ठाकरे यांनी हलगर्जीपणा केला. ते पूर्णपणे निष्काळजी राहिले. यामुळेच बेस्टमध्ये ठाकरे गटाला उतरती कळा लागली, असे मत संदीप आचार्य यांनी व्यक्त केले.

Raj Thackeray & Uddhav Thackeray: मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधूंना विचार करण्याची गरज

 बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल पाहता आता आगामी मुंबई महानगरापलिकेच्यादृष्टीनेही ठाकरे बंधूंना विचार करावा लागेल. महानगरपालिका निवडणुकीत प्रचार कसा करायचा, हे ठरवावे लागेल. मुंबई महानगरपालिकेवर 25 वर्षे शिवसेना-भाजपची सत्ता असताना आतमध्ये शरद राव यांच्या म्युन्सिपल मजदूर युनियनची ताकद होती. या संघटनेतील मराठी लोक होते, ते आतमध्ये शरद राव यांना साथ द्यायचे आणि बाहेर पालिका आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला मतदान करायचे. शरद राव आणि शशांक राव यांना बेस्टच्या अंतर्गत राजकारणातही मराठी माणसानेच साथ दिली. पण ठाकरे गट बेस्टमध्ये निष्क्रिय राहिला. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हक्कांसाठी भांडणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्या शशांक राव यांना साथ दिली. मात्र, बेस्ट आणि मुंबईचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्यामुळे या निकालाच महापालिका निवडणुकीवर विशेष परिणाम होणार नाही. त्याठिकाणी वेगळे चित्र पाहायला मिळू शकते, असे मत ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांनी व्यक्त केले. 

आणखी वाचा

बेस्ट निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्ट, मध्यरात्री पुन्हा मतं मोजली अन् निकाल बदलला, नेमकं काय झालं?

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget