एक्स्प्लोर

CP Radhakrishnan: मराठी न येणाऱ्यांना मारहाण करुन द्वेष पसरवलात तर महाराष्ट्रात गुंतवणूक कोण करेल? राज्यपालांच्या वक्तव्याने नवा वाद पेटला

CP Radhakrishnan: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिंदी-मराठी भाषा वादाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. त्यावरून राजकीय गोंधळ सुरु आहे.

मुंबई: महाराष्ट्रात भाषेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर आली आहे. राज्यपाल राधाकृष्णन यांनी लोकांना भाषिक फरकांवर आधारित द्वेष पसरवण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केलं आहे. अशाप्रकारच्या वृत्ती दीर्घकाळात राज्याचे नुकसान करू शकतात अशीही टिप्पणी केली आहे.

 तामिळनाडूमध्ये खासदार असतानाचा वैयक्तिक अनुभव सांगताना महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन म्हणाले, एकदा मी काही लोकांना एका व्यक्तीला मारहाण करताना पाहिले. जेव्हा मी त्यांना विचारले तेव्हा ते हिंदीत बोलत होते. मग, हॉटेल मालकाने मला सांगितले की त्यांना तमिळ येत नाही आणि स्थानिक लोक त्यांना तमिळ बोला म्हणून मारहाण करत आहेत. जर आपण अशा प्रकारचा द्वेष पसरवला तर गुंतवणूक करण्यासाठी कोण येईल. लाँगरनमध्ये आपण फक्त महाराष्ट्राचे नुकसान करत आहोत. मला हिंदी समजत नाही, म्हणून आपण जास्तीत जास्त भाषा शिकल्या पाहिजेत आणि आपल्या मातृभाषेचा अभिमानही बाळगला पाहिजे, असंही पुढे सीपी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन?

मराठी भाषेच्या वादावर महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणतात, "मी तामिळनाडूमध्ये खासदार असताना, एके दिवशी मी काही लोकांना एकाला मारहाण करताना पाहिले... जेव्हा मी त्यांना समस्या विचारली तेव्हा ते हिंदीत बोलत होते. मग, हॉटेल मालकाने मला सांगितले की ते तमिळ बोलत नाहीत आणि लोक तमिळ बोलण्यासाठी त्यांना मारहाण करत आहेत... जर आपण अशा प्रकारचा द्वेष पसरवला तर गुंतवणूक करण्यासाठी कोण येईल... दीर्घकाळात, आपण महाराष्ट्राचे नुकसान करत आहोत... मला हिंदी समजत नाही, आणि ते माझ्यासाठी एक अडथळा आहे... आपण जास्तीत जास्त भाषा शिकल्या पाहिजेत आणि आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे...", असं मत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मांडल आहे.

हिंदी-मराठी भाषा वाद

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिंदी-मराठी भाषा वादाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. त्यावरून राजकीय गोंधळ सुरु आहे. याच दरम्यान महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राची पहिलीपासून सक्ती करण्यात आल्यानंतर हिंदीविरोधात वाद पेटला होता. शालेय शिक्षणात पाचवी किंवा सहावीनंतर येणारा हिंदी भाषेचा विषय पहिलीपासूच शिकवण्याला विरोधी पक्षांनी तीव्र शब्दांत विरोध केला.
महायुती सरकारच्या निर्णयाला शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी या पक्षांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविला. तूर्तास शासनाने हा निर्णय मागे घेतला आहे. मात्र, असे असले तरीही भाषेवरून वाद सुरूच आहे. या बाबत अनेकांनी आपली मत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Prithviraj Chavan : कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी नावं काढली असती तर कदाचित निकाल वेगळा असता: पृथ्वीराज चव्हाण
कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी लेखी निवेदन दिलेलं पण... : पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget