एक्स्प्लोर

भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला; नवनीत राणांचा पराभव, अमरावतीत राजकीय खलबतं

अमरावतीत नवनीत राणा यांना विजयाचा विश्वास होता. त्यामुळे, निवडणुकांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश घेऊन भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती.

अमरावती : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळ्याच वेळणावर गेल्याचं पाहायला मिळालंय. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात जोरदार लढत झाली. 45 पेक्षा जास्त जागांवर निवडून विजयाचा दावा करणाऱ्या महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने तब्बल 30 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे, राज्यातील महायुतीच्या पराभवाचा स्वीकार करुन आपण उपमुख्यमंत्री पदावरुन पायउतार होण्याची इच्छा व्यक्त करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्यासाठी, आपण भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला विनंती करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. मात्र, फडणवीसांच्या या निर्णयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांचा हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे म्हटले. देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये असायलाच हवेत अशी भूमिका भाजपच्या आमदार व नेत्यांनी घेतली आहे. त्यातच, दुसरीकडे अमरावतीत भाजपच्या (BJP) उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन येथील शहर जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.  
अमरावती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण पोटे यांनी आपल्या शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला असून येथून काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले आहेत. त्यामुळे, येथील पराभवाची जबाबदारी स्वीकारुन भाजपच्या प्रवीण पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, निवडणूक निकालानंतर भाजपात पहिला राजीनामा पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ''उपरोक्त विषयान्वये, मी अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीमध्ये झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी म्हणून अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. तरी राजीनाम्याचा स्विकार करावा, हि विनंती,'' असे पत्र प्रवीण पोटे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांती पराभवाचे परिणाम आता पाहायला मिळत आहेत. 

अमरावतीत नवनीत राणा यांना विजयाचा विश्वास होता. त्यामुळे, निवडणुकांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश घेऊन भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे राणा यांच्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रचारसभा घेतली होती. तर, हिंदू शेरणी म्हणून राणांचा प्रचारही करण्यात आला. मात्र, अमरावतीतील जनतेनं नवनीत राणांना नाकारत काँग्रेसला विजयी केले. दरम्यान, राणा यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच काही जणांनी विरोध केला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी समजूत घातल्यानंतर भाजपमधील हा विरोध मावळला. तरी, प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी राणांविरुद्ध रणशिंग फुंकले होते. आमदार कडू यांनी राणांविरुद्ध उमेदवारही उभा केला होता. 

नवनीत राणांचा 19 हजार मतांनी पराभव

अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांचा विजय झाला. त्यांना एकूण 5 लाख 26 हजार 271 मतं मिळाली. दुसरीकडे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना 5 लाख 65 हजार 40 मते मिळाली आहेत. राणा यांचा 19 हजार 731 मतांनी पराभव झाला आहे. महायुतीचा भाग असलेल्या प्रहार जनशक्ती या पक्षानेही अमावतीतून उमेदवार दिला होता. त्यांच्या बळवंत बुब या उमेदवाराला 85 हजार 300 मते मिळाली आहेत. म्हणजेच प्रहार जनशक्तीच्या उमेदवारामुळे राणा यांना मिळणारी मतं फुटली आहेत.

राज्यात कोणाला किती जागा

महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या असून महायुतीला केवळ 17 जागा जिंकता आल्या आहेत. सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा जिंकल्या, तर शिवसेना ठाकरे गटाला 9 जागांवर विजय मिळाला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा जिंकल्या. दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपने सर्वाधिक 9 जागा जिंकल्या, तर शिंदेंच्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 1 जागा जिंकली. दरम्यान, 13 जागांसह राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget