... असा माणूस पुन्हा होणे नाही, अजितदादा पुन्हा होऊ शकत नाहीत, अशी माणसं दुर्मिळ असतात : एकनाथ शिंदे
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या शोकसभेत बोलताना भावना व्यक्त केल्या. अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्र कर्तबगार मुख्यमंत्र्याला मुकला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या मुंबईतील शोकसभेत भावना व्यक्त केल्या. अजित पवार यांना आदरांजली देण्याची अशी वेळ आपल्यावर इतक्या लवकर येईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. अजित पवारांनी अनेक वर्ष काम केलं. 1991 पासून ते काम करत होते. अजित पवार आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री सुद्धा झाले. स्पष्टवक्ता आपली परखड मते मांडणरा नेता अजित पवार होते, अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
एकनाथ शिंदे पुढं म्हणाले की अजितदादा काम होणार असेल तर हो म्हणणार, नसेल होणार तर नाही म्हणायचे. अजितदादांसारखा चटका लावून जाणारा नेता महाराष्ट्राने पाहिला. आमच्या तिघांच बाँडिंग चांगलं होतं, आम्हाला एकमेकांच्या मनातलं कळायचं मात्र काळाच्या मनातले आम्ही ओळखू शकलो नाही. 28 जानेवारीला जी घटना घडली ती वेदनादायी आहे त्यामुळं महाराष्ट्र हळहळला.
कार्यकर्त्यांच्या पाठीशी कसं राहायचं ते त्यांच्याकडून शिकायचं. आम्ही कुठेही उद्घाटनाला गेलो तर तिथं वायर निघालेली दिसली तर काम व्यवस्थित कर असं ते सांगायचे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवताना 46 हजार कोटी रुपये लागणार होते. मात्र दादांनी राज्याची आर्थिक घडी हालू दिली नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
आमच बाँडिंग 24/7 होतं. ते पहाटे काम सुरु करायचे देवेंद्र फडणवीस दिवसभर काम करायचे तर मी रात्रभर काम करायचे. आम्ही समृद्धी उद्घाटनाला गेलो होती त्यावेळी देवेंद्र फडणवीस गाडी चालवत होते ते मागे बसले होते त्यांनी गाडीच स्पीड वाढवू दिलं नाही. सोबत म्हणाले होते की माझी बॅक सिट फिक्स आहे, अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी सांगितली.
महाराष्ट्र होणाऱ्या कर्तबगार मुख्यमंत्र्याला मुकला : एकनाथ शिंदे
मला वडिलकीचा सल्ला द्यायचे. माझ्या पेक्षा ते मोठे होते. प्रशासनावर त्यांची चांगली पकड होती, असा माणूंस पुन्हा होणे नाही. पुन्हा अजितदादा होणे नाही, अशी माणसं दुर्मिळ आहेत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
अजितदादांच्या मनात मुख्यमंत्री व्हाव असं होतं, नशिबाने साथ दिली असती तर नक्कीच ते देखील झालं असतं. 6 वेळा उपमुख्यमंत्री झाल्यावर कुणालाही ते वाटलं असतं. महाराष्ट्र एका होणाऱ्या कर्तबगार मुख्यमंत्र्याला मुकला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
दु: ख काय असते ते मी पाहिलं आहे. माझी 2 मुलं गेली, माझे गुरु आनंद दिघे अपघातात गेले त्यामुळे दु:ख पाहिलं आहे, मी दुःख भोगलं आहे. दादांनी महाराष्ट्राला परिवार मानलं होतं. दादानी जे विचार केले होते ते पुढे आम्ही घेऊन जाऊ, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

























