एक्स्प्लोर

राज ठाकरे काय म्हणतात याला महत्त्व नाही; ऑपरेशन सिंदूरवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी या घटनेनंतर स्पष्टपणे सांगितलं होत की याचं उत्तर दिलं जाईल.

नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर (Operation sindoor) राबवत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यामुळे, पाकिस्तानला चांगलीच धडकी भरली असून पाकिस्तानी नेते वल्गना करताना दिसून येतात. या हल्ल्यानंतर देशभरातून समाधान आणि आनंद व्यक्त होत आहे. सरकार आणि भारतीय सैन्य दलाच्या पाठिशी असल्याचं सर्वपक्षीय नेते सांगत आहेत. तसेच, भारतीय सैन्य दलाचे अभिनंदनही केलं जात आहे. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी युद्ध हे दहशतवादी हल्ल्ल्याचं उत्तर नसल्याचे सांगत मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले. आता, राज ठाकरेंच्या वक्तव्याला महत्त्व नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ऑपरेशन सिंदूरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी या घटनेनंतर स्पष्टपणे सांगितलं होत की याचं उत्तर दिलं जाईल. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने ताकदवर उत्तर दिलं आहे.  विशेषता मुंबईत ज्यांनी हल्ला केला ते हाफिज आणि डेव्हिडचे अड्डे देखील नष्ट करण्यात आले आहेत. हा नवीन भारत अशा प्रकारे हल्ले सहन करणार नाही, हे पुन्हा एखादा भारताने दाखवून दिलं आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन सिंदूरवर पहिली प्रतिक्रिया दिली.  

जगभरातील विविध देश आपल्या पाठिशी

भारताने जे ऑपरेशन सिंदूर राबवलं आहे, त्या संदर्भात लष्कराचे मी आभार आणि अभिनंदन  करतो. पाकिस्तानात दहशतवाद्यांचे 9 अड्डे उध्वस्त करण्याचे काम सेनेने केले. ज्या प्रकारे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होता, आणि विशेषता पहलगाममध्ये आमच्या बांधवांना मारण्यात आलं, त्याचा संताप संपूर्ण भारतात होत आहे. भारताने गेल्या 14 दिवसात सगळ्या देशाची संपर्क करून पाकिस्तान कसा दोषी आहे ते सांगितले, त्याची माहिती दिली. त्यामुळेच, विविध देश आपल्या पाठीशी आहेत, असेही फडणवीसांनी म्हटले.  

दरम्यान, भाजप पक्षाने कायमच राष्ट्र प्रथम या भूमिकेतूनच काम केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा साऱ्या जगाला ते दाखवून दिलं आहे. आपण जर पाहीलं तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अड्डे उध्वस्त करण्याचं काम लष्कराने केलं आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.  

राज ठाकरेंच्या म्हणण्याला महत्त्व नाही

राज ठाकरे काय म्हणतायत याला महत्त्व नाही. संपूर्ण भारत जनता पाठीशी उभी आहे  आणि झालेल्या कारवाईचे कौतुक करत आहेत. संपूर्ण  जग देखील आपल्या पाठीशी उभे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

हल्ल्यानंतर काय म्हणाले राज ठाकरे

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांना शोधून काढण्यात केंद्र सरकारला अद्याप यश आलेले नाही. दहशतवाद्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही लक्षात राहील, असा धडा शिकवणे गरजेचे होते. अशावेळी पाकिस्तानशी युद्ध करणे किंवा मॉकड्रील आणि एअरस्ट्राईक या गोष्टी फायद्याच्या नाहीत. पाकिस्तान हा अगोदरच बर्बाद झालेला देश आहे. त्यांना आणखी काय बर्बाद करणार? अमेरिकेत दहशतवाद्यांनी ट्विन टॉवर पाडले आणि पँटागॉनवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेन त्या दहशतवाद्यांना शोधून ठार मारले. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे प्रत्युत्तर नसते. त्यामुळे देशात मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा. देशातील आपलेच प्रश्न संपत नाही, अशा परिस्थितीत युद्धाला सामोरे जाणे योग्य गोष्ट नाही, असे परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा

... त्यांचे श्रेय जाते फक्त पवार साहेबांना; ऑपरेशन सिंदूरनंतर श्रेयवादाची लढाई, पण शरद पवारांचा थेट मोदींना फोन

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
Congress : मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget