एक्स्प्लोर

Priyanka Gandhi: दरवेळी गांधी परिवारावर टीका करता, 11 वर्षे तुमची सत्ता, आतातरी स्वत:ची जबाबदारी घ्या; प्रियांका गांधींचा भाजपवर हल्लाबोल

Priyanka Gandhi on Operation Sindoor: देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले, युद्ध सुरू होण्यापूर्वीच थांबले. हे थांबवण्याची घोषणा आपल्या सरकार किंवा सैन्याने केली नाही.

Priyanka Gandhi on Operation Sindoor: भाजपला गांधी परिवारावर टीका करण्यासाठी फक्त बहाणा हवा असतात. तो मिळाला की, भाजप गांधी परिवाराचा इतिहास उगाळत बसतो. गेली 11 वर्षे देशावर भाजपची सत्ता आहे. किमान आतातरी नेहरु-गांधींना दोष देण्याऐवजी स्वत:ची जबाबदारी घ्यायला शिका, अशा सडेतोड भाषेत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरबाबत (Operation Sindoor) लोकसभेत आयोजित करण्यात आलेल्या चर्चेवेळी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर आगपाखड केली. ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्याच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित करणारे विरोधक कसे पाकिस्तानधर्जिणे आहे, काँग्रेसच्या काळात नेहरुंच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडे कसा केला, चीनने आपला भूभाग कसा बळकावला, असा काँग्रेसच्या चुकांचा पाढा अमित शाह यांनी वाचला. त्यानंतर प्रियांका गांधी भाषणाला उभ्या राहिल्या आणि त्यांनी या सगळ्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. प्रियांका गांधी यांच्या भाषणावेळी भाजपच्या खासदारांकडून काँग्रेस आणि गांधी घराण्याने काय केलं, असा सवाल विचारण्यात आला. त्यावर प्रियांका गांधी यांनी म्हटले की, 'तुम्ही इतिहास उगाळत बसा, मी वर्तमानात जगणारी आहे'.

आपल्या भाषणात प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारला काही मुलभूत प्रश्न विचारले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अन्य सदस्यांनी केलेली भाषणं मी ऐकली. मात्र, या सगळ्यात मला एकच गोष्ट खटकली. अनेकांनी ऑपरेशन सिंदूर, दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि इतिहासाचे धडे दिले. पण या सगळ्या भाषणांमधून एक गोष्ट निसटली. 22 एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात 26 भारतीयांना मारण्यात आले. तो हल्ला कसा झाला आणि का झाला? पहलगाममध्ये दहशतवादी काय करत होते? केंद्र सरकार  प्रचार करत असते की, काश्मीरमध्ये आता शांतता आहे, दहशतवाद संपला आहे. पंतप्रधान सांगतात की,काश्मीरला जा, तिकडे जमिनी खरेदी करा. मग पहलगाममध्ये दहशतवाद हल्ला कसा झाला? असा हल्ला होणार, याची माहिती देणारी एकही यंत्रणा आपल्याकडे नव्हती का? हे आपल्या यंत्रणांचं अपयश नाही का? हे आपल्या सुरक्षा यंत्रणांचं खूप मोठं अपयश आहे. याची जबाबदारी कोण घेणार?  या हल्ल्याने इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखांनी राजीनामा दिला का? देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला का?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला.

Priyanka Gandhi speech in Loksabha: बैसरन खोऱ्यात कोणतीच सुरक्षाव्यवस्था नव्हती, केंद्र सरकारने नागरिकांना रामभरोसे सोडून दिले: प्रियांका गांधी

प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणात पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या कानपूरचे रहिवासी शुभम द्विवेदी यांचा उल्लेख केला. सहा महिन्यांपूर्वी शुभमचे लग्न झाले होते. त्यांचे कुटुंब गुणागोविंदाने राहत होते. त्यांचा व्हिडीओ पाहून आजही काळीज विदीर्ण होते. शुभम आपल्या पत्नीसोत काश्मीरला गेला होता. 22 एप्रिलला बैसरन व्हॅलीत चांगले वातावरण होते. तिथे जायची वाट सोपी नाही. बैसरन व्हॅलीत जंगलातून आणि डोंगरातून चढत जावे लागते. तिकडे 22 एप्रिलला लहान मुलं खेळत होती. काहीजण झिपलाईन करत होते. लोक मजेत होते. शुभम आणि त्यांची पत्नी एका स्टॉलवर मजेत उभे होते. तेव्हा समोरच्या जंगलातून अचानक दहशतवादी आले आणि त्यांनी शुभमला मारले. त्यानंतर एक तास दहशतवादी बैसरन व्हॅलीत लोकांना टिपून टिपून त्यांच्या कुटुंबीयांसमोर ठार मारत होते. 

शुभम द्विवेदी यांची पत्नी म्हणाली की, 'मी माझं जग डोळ्यांसमोर संपताना पाहिलं आहे. या संपूर्ण वेळात तिथे एकही सुरक्षारक्षक नव्हता. देश आणि सरकारने आम्हाला अनाथ सोडलं होतं. तिथे सुरक्षा का नव्हती? एक सैनिक का नव्हता? सरकारला माहिती नव्हतं का, इथे रोज पर्यटक येतात. इथे येताना जंगलातून यावं लागतं, काही झालं तर लोक बाहेर कसे पडणार, हा विचार सरकारने केला नव्हता का? त्याठिकाणी साध्या प्राथमिक उपचारांची सोय नव्हती, किंबहुना कसलीच व्यवस्था नव्हती. या लोकांना देवाच्या भरवशावर सोडून देण्यात आले होते. नागरिक सरकारच्या भरवशावर तिकडे गेले आणि सरकारनेच त्यांना देवाच्या भरवशावर सोडून दिले. मला विचारायचं आहे की, ही कोणाची जबाबदारी आहे? नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पंतप्रधान, गृहमंत्री आणि एनएसएसची नाही का? पहलगाम हल्ल्यापूर्वी दोन आठवडे आधी गृहमंत्री अमित शहा काश्मीरला गेले होते, कशासाठी तर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घ्यायला', याकडे प्रियांका गांधी यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा

अमित शाहांनी सांगितलं, पहलगाममधील दहशतवाद्यांना ठार केलं; पण प्रियंका गांधींच्या प्रश्नानं संपूर्ण सभागृह शांत, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Embed widget