एक्स्प्लोर

Bharatshet Gogawale: आमच्या त्यागामुळेच राज्याचे मुख्यमंत्री पद आणि महायुतीची सत्ता आली; भरत गोगावले यांची प्रतिक्रिया 

Raigad News : आम्ही केलेल्या त्यागामुळे आम्हाला मुख्यमंत्री पद मिळालंय आणि राज्यात महायुतीची सत्ता आली आहे. प्रत्येकाची भूमिका योग्य आहे. अशा शब्दात आमदार भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रायगड : मुख्यमंत्रीपदासाठी भाजपच्या (BJP) राज्यातल्या नेत्यांनी केलेल्या त्यागाची आठवण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah)  मुख्यमंत्री शिंदेंना (CM Eknath Shinde) करून दिली.  जागावाटपाच्या चर्चेत शिंदेंनी मित्रपक्षाला झुकतं माप द्यावं, असा आग्रह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने धरलाय. 'मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं पद आहे. ते तुम्हाला देताना आमच्या माणसांनी तेव्हा त्याग केला' असं अमित शाहांनी शिंदेंना सुनावल्याच्या चर्चांना उधान आले आहे.  यासंदर्भाचे वृत्त मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) फेटाळले आहे. अमित शाह त्यागाबाबत काही म्हणाले नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. असे असले तरी या बाबत आता महायुतीच्या इतर नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार भरत गोगावले (Bharatshet Gogawale) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  

त्यांनी जसा त्याग केला आहे तसा आम्ही देखील त्याग केला आहे. किंबहुना आम्ही केलेल्या त्यागामुळे आम्हाला मुख्यमंत्री पद मिळालंय आणि राज्यात महायुतीची सत्ता आली आहे. प्रत्येकाची भूमिका योग्य आहे. अशा शब्दात आमदार भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कितीही सभा होऊ द्या भरतशेठचं बाजी मारणार! 

राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणायची असेल तर सर्वांनी मिळून मिसळून काम करणं गरजेचं आहे. माझ्या मतदार संघातील जनता हे माझं व्हिजन आहे. एकही गाव, एकही वाडी, एकही वस्ती विकासापासून वंचित नाही. लाभाच्या अनेक योजना जनतेपर्यंत पोहचवल्या असल्याचेही आमदार भरत गोगावले म्हणाले. तर प्रतिस्पर्धी स्नेहल जगताप यांच्यावर भाष्य करताना भरत गोगावले म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीच्या सभांची काळजी घेत नाही. कितीही सभा होऊ द्या भरतशेठचं बाजी मारणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला 

रायगडच्या सातही जागा महायुतीच्याच -भरत गोगावले

विधानसभा निवडणुकित लाडक्या बहीण योजनेचा चांगला प्रभाव पडेल. महाविकास आघाडीने कितीही टीका टिपण्णी केली तरी आमचे कार्यकर्ते त्याला सामोरे जातील. तर  श्रीवर्धन मतदारसंघ महायुती संघर्षावर बोलताना भरत गोगावले म्हणाले की, आम्ही ठरवलंय, रायगडच्या सातही जागा महायुतीच्याच आहे. आपापल्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना सांभाळणे गरजेचे आहे. आम्ही जस खासदारकी ला सांभाळलं, तस त्यांनीही आम्हाला सांभाळावे. काही अडचणी आल्यास आम्ही मिटवू. श्रीवर्धनची जागा आदिती तटकरे यांनाच आम्ही देऊ. आम्ही त्यांच्याविरुद्ध अद्यापही काही बोललो नाही. त्यांनी जर काही केलं तर आम्ही प्रत्युत्तर देऊ. असेही भरत गोगावले म्हणाले. 

हे ही वाचा 


 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा, स्वबळावर मनसेचं कधी किती बळ?Zero Hour  : जागावाटपाच्या चर्चेत शाहांचं वक्तव्य म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंवर दबावतंत्र?Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणूक : सुपरफास्ट बातम्या : 16 OCT 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
New Justice Statue : भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
Solaur vidhansabha : शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
Embed widget